शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होणार काय?

By admin | Updated: June 19, 2017 00:36 IST

खासगी व्यवस्थापनाच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्राथमिक शाळेपासून तर उच्च माध्यमिक शाळेपर्यंत ...

विद्यार्थ्यांची सुरक्षा अंधातरी : शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : खासगी व्यवस्थापनाच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्राथमिक शाळेपासून तर उच्च माध्यमिक शाळेपर्यंत वर्ग पहिली ते १२ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी प्रत्येक शाळेने शाळेत अग्नीशमन यंत्रणेची व्यवस्था करावी, असे शासनाचे निर्देश असताना संबंधित विभागाच्या हेतुपुरस्सर अक्षम्य दुर्लक्षामुळे बऱ्याच शाळामध्ये अग्नीशमन यंत्रणाच कार्यान्वित झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. किमान २०१७-१८ या सत्रापासून सदर अग्नीशमन यंत्रणा प्रत्येक शाळांमध्ये कार्यान्वीत होणार काय, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. शाळेत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वीत असावी आणि त्या यंत्रणेची वेळोवेळी पाहणी करून अद्ययावत करण्या यावे, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र बहुतांश शाळांमध्ये अद्यापर्यंत अग्नीशमन यंत्रणाच कार्यान्वित झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता कोण करणार, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. अग्नीशमन यंत्रणा, मुला, मुलीच्या संख्येनुसार शाळेत स्वच्छता व प्रसाधनगृहे, पिण्याचे शुद्ध व स्वच्छ पाणी, वाचनालय, संगणक कक्ष, मुलीसाठी वेगळे विश्रांती गृह, आवारभिंत, पुस्तकालय, क्रिडांगण, प्रत्येक वर्गात पंखे या सुविधा शाळांनी उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना अजुनही बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी या मुलभूत भौतिक सुविधाच उपलबध नसताना मात्र वेतन व वेतनेत्तर अनुदान सुरू आहे. नियमानुसार अग्नीशमन यंत्रामधील गॅस ११ महिन्यांनी कालबाह्य होते त्यानंतर त्यामध्ये नव्याने गॅस भरणे आवश्यक असते. परंतू ज्या शाळांनी ही यंत्रणा कार्यान्वीत केलेल्या शाळांनी देखील एक्सपायरी डेट नंतर नवीन गॅस भरली नसल्याची शक्यता नाकारता येत नसून ते अग्नीशमन यंत्र फक्त शो पिस म्हणून भिंतीवर टांगलेले दिसून येते. याप्रकरणी संबंधीत विभागाने वेळीच दखल घेवून सर्व शाळांना अग्नीशमन यंत्रणा कार्यान्वीत करण्यास बाद्य करावे व याबाबत प्रथम शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे याबरोबरच स्वच्छता, प्रसाधनगृह, संगणककक्ष, विश्रांतीगृह, क्रीडांगण प्रत्येक वर्गात पंखे यासारख्या अन्य भौतिक सुविधा उपलब्ध करण्यास बंधनकारक करून ज्या शाळांनी विहीत कालावधीत सदर सुविधा उपलब्ध केल्या नसतील अशा शाळांवर रीतसर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे. दुर्घटनेची भिती अनेक शाळांमध्ये खिचडी बनविण्यासाठी किचन शेड बनविण्यात आलेले आहेत. तर अद्यापही काही शाळात वर्गखोल्यांमध्ये खिचडी शिजविली जाते. त्यामुळे एखादवेळी मोठी दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.