शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होणार काय?

By admin | Updated: June 19, 2017 00:36 IST

खासगी व्यवस्थापनाच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्राथमिक शाळेपासून तर उच्च माध्यमिक शाळेपर्यंत ...

विद्यार्थ्यांची सुरक्षा अंधातरी : शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : खासगी व्यवस्थापनाच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्राथमिक शाळेपासून तर उच्च माध्यमिक शाळेपर्यंत वर्ग पहिली ते १२ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी प्रत्येक शाळेने शाळेत अग्नीशमन यंत्रणेची व्यवस्था करावी, असे शासनाचे निर्देश असताना संबंधित विभागाच्या हेतुपुरस्सर अक्षम्य दुर्लक्षामुळे बऱ्याच शाळामध्ये अग्नीशमन यंत्रणाच कार्यान्वित झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. किमान २०१७-१८ या सत्रापासून सदर अग्नीशमन यंत्रणा प्रत्येक शाळांमध्ये कार्यान्वीत होणार काय, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. शाळेत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वीत असावी आणि त्या यंत्रणेची वेळोवेळी पाहणी करून अद्ययावत करण्या यावे, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र बहुतांश शाळांमध्ये अद्यापर्यंत अग्नीशमन यंत्रणाच कार्यान्वित झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता कोण करणार, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. अग्नीशमन यंत्रणा, मुला, मुलीच्या संख्येनुसार शाळेत स्वच्छता व प्रसाधनगृहे, पिण्याचे शुद्ध व स्वच्छ पाणी, वाचनालय, संगणक कक्ष, मुलीसाठी वेगळे विश्रांती गृह, आवारभिंत, पुस्तकालय, क्रिडांगण, प्रत्येक वर्गात पंखे या सुविधा शाळांनी उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना अजुनही बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी या मुलभूत भौतिक सुविधाच उपलबध नसताना मात्र वेतन व वेतनेत्तर अनुदान सुरू आहे. नियमानुसार अग्नीशमन यंत्रामधील गॅस ११ महिन्यांनी कालबाह्य होते त्यानंतर त्यामध्ये नव्याने गॅस भरणे आवश्यक असते. परंतू ज्या शाळांनी ही यंत्रणा कार्यान्वीत केलेल्या शाळांनी देखील एक्सपायरी डेट नंतर नवीन गॅस भरली नसल्याची शक्यता नाकारता येत नसून ते अग्नीशमन यंत्र फक्त शो पिस म्हणून भिंतीवर टांगलेले दिसून येते. याप्रकरणी संबंधीत विभागाने वेळीच दखल घेवून सर्व शाळांना अग्नीशमन यंत्रणा कार्यान्वीत करण्यास बाद्य करावे व याबाबत प्रथम शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे याबरोबरच स्वच्छता, प्रसाधनगृह, संगणककक्ष, विश्रांतीगृह, क्रीडांगण प्रत्येक वर्गात पंखे यासारख्या अन्य भौतिक सुविधा उपलब्ध करण्यास बंधनकारक करून ज्या शाळांनी विहीत कालावधीत सदर सुविधा उपलब्ध केल्या नसतील अशा शाळांवर रीतसर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे. दुर्घटनेची भिती अनेक शाळांमध्ये खिचडी बनविण्यासाठी किचन शेड बनविण्यात आलेले आहेत. तर अद्यापही काही शाळात वर्गखोल्यांमध्ये खिचडी शिजविली जाते. त्यामुळे एखादवेळी मोठी दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.