शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

वन्यप्राण्यांच्या अपघातातील वाहने बेपत्ताच

By admin | Updated: August 27, 2015 00:57 IST

भंडारा जिल्ह्याला वनवैभव लाभले असून वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

ना वनविभाग ना पोलिसांचे लक्ष : अपघात की शिकार कळेनासंजय साठवणे साकोली भंडारा जिल्ह्याला वनवैभव लाभले असून वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यांची केलेली दुरुस्ती व वाहनांचा वाढता वेग यामुळे अनेक वन्यप्राणी रस्ता ओलांडीत असताना अज्ञात वाहनांच्या धडकेत दरवर्षी शेकडो वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याची नोंद वनविभाग व पोलीस ठाण्यात आहे. मात्र तपासाअंती आजपर्यंत एकाही वन्यप्राण्यांच्या अपघातातील वाहन सापडल्याची नोंद नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांचे हे अपघात आहेत की शिकारी करताना सैरावैरा पडताना ठार झाल्याच्या घटना आहेत. याची चौकशी करण्याची गरज आहे.भंडारा जिल्ह्याच्या मध्य प्रदेश छत्तीसगडच्या सीमा लागलेल्या असून संपूर्ण जिल्हाच वनांनी आच्छादलेला आहे. तसेच नागझिरा व नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाचा बराच मोठा भागही भंडारा जिल्ह्याला लागलेला आहे. त्यामुळे येथे वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वन्यप्राणी जंगलात इकडून तिकडे भ्रमण करतात. मात्र हे करताना अनेक वन्यप्राणी वाहनाच्या धडकेने ठार होतात. घटनेनंतर वनविभाग घटनास्थळाची पाहणी करून मोका चौकशी करतात व प्रकरण बंद करतात. मात्र त्या वाहनंचा कधी शोध घेण्याचा प्रयत्नच करीत नाहीत. त्यामुळे हे अपघात आहेत की शिकार असा संशय बळावत आहे. या अपघातात बिबट, हरिण, सांबर, अस्वल, रानडुक्कर यासारख्या प्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या नोंदी वनविभागात आहेत.२०१४ ला उकारा फाट्याजवळ एक बिबट, एक हरिण, एक अस्वल, २०१३ ला मुंडीपार जंगलात एक सांभर, एक रानडुक्कर तर भंडाऱ्याजवळ बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाच्या कार्यालयात आहे.४भंडारा जिल्ह्यातील जंगलामध्ये अनेक तलाव असून या तलावाला लागून लोकांच्या आहेत. मात्र दिवसेंदिवस अनेकांनी या तलावात अतिक्रमण करून तलावात शेती करणे सुरु केले आहे. परिणामी तलावात पाणी कमी व जंगलात लोकांचे हस्तक्षेप जास्त. यामुळे वन्यप्राणी इकडे तिकडे पळत आहेत व पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.शिकारी कुत्रे व विद्युत प्रवाहाने शिकारभंडारा जिल्ह्यात जंगलव्याप्त गावात शिकारी कुत्रे व विद्युत प्रवाहाच्या साहाय्याने अनेकदा शिकारी करतात अशी बरीच प्रकरणे वनविभागाने उघडकीस आणली. अवैध वृक्षतोडही कारणीभूतबेरोजगारीचीही झळ शहरासोबतच ग्रामीण भागात पोहचली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांनी जंगल तोडून लाकडे विकण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे. त्यामुळे जंगले ओस पडू लागली आहेत.अपघात की शिकार!अपघातानंतर वनविभागाचे वाहन शोधण्यासाठी कधी शर्थीचे प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ठार झालेल्या वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांच्यातील मौल्यवान अवयव काढून नंतर त्यांना अपघाताचे रुप देण्यात तर आले नाही, अशीही शंका आहे. रात्रीची गस्त आवश्यकज्या जंगलातून राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्ग गेलेले आहेत त्या रस्त्यावरून रात्री व दिवस वनविभागाचे एक वाहन २४ तास गस्तीवर ठेवावे. वनउपज नाक्याची गरजजिल्ह्यात संभावित व अपघातग्रस्त ठिकाणी वनउपज नाके उभारण्यात यावे. जेणेकरून वन्यप्राण्यांच्या शिकारीची माहिती मिळाली तर किमान वाहनांची चौकशी करता येईल.वन्यप्राणी गावाकडेदिवसेंदिवस जंगलाची संख्या कमी होत आहे. पाण्याचा व चराईचा अभाव यामुळे वन्यप्राणी गावाकडे धाव घेताना दिसतात. यामुळे ते सैरावैरा पळत सुटतात व अवैध शिकारीसह अपघाताला बळी पडतात. त्यामुळे मानवाचे जंगलातील वाढते हस्तक्षेप थांबविण्याची गरज आहे.