शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची सर्रास लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST

यावर्षी मृग व आर्द्रा नक्षत्र चांगलाच दररोज बरसत असल्याने शेतकरी खरीप हंगामी मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. रब्बी हंगामात धान ...

यावर्षी मृग व आर्द्रा नक्षत्र चांगलाच दररोज बरसत असल्याने शेतकरी खरीप हंगामी मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. रब्बी हंगामात धान पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीकरिता शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. मात्र, काही आधारभूत धान खरेदी केंद्रावर केंद्रचालक तथा ग्रेडर यांच्याकडून नियमाची पायमल्ली केली जात आहे, अशी चर्चा गावातील शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र, कुणीही शेतकरी समोर येण्याकरिता धजावत नाहीत. सततच्या पावसाने व केंद्रचालकांच्या मनमानीने शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या धानाच्या काढणीसाठी हजार ते पाचशे रुपये अधिकचे मोजावे लागत असल्याचे शेतकऱ्यांत बोलले जात आहे. शासकीय परिपत्रकानुसार ४० किलो ५०० ग्राम धानाचे मोजमाप घेणे बंधनकारक असले तरी ग्रेडर येथील शेतकऱ्यांकडून प्रति कट्टा ४२ किलो ५०० ग्रामपेक्षाही अधिक धान मोजले जात आहे. प्रति क्विंटलमागे पाच किलोप्रमाणे शंभर रुपयाचे धान होते, तर धान तोलाई, पलटी व उतराईच्या नावावर ३० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे एकूण १३० रुपये शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. धान मोजमापाची पावती वेळेवर दिली जात नाही. मोजमापाच्या पावतीकरिता शेतकरी बोलले तर आपले धान घरी परत घेऊन जा, अशी असभ्य वर्तणूक ग्रेडरकडून दिली जात असल्याचे बोलले जात आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांसाठी की केंद्रचालक, व्यापारीवर्गासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे ठाकला आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे केंद्रचालक व्यापारी झाले आहेत, की काय असे चित्र पहावयास मिळत आहे, तसेच आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी झाल्याच्या नोंदी शेतकऱ्यांसमोर होत नसून वेळीच पावतीसुद्धा दिल्या जात नाहीत. ज्या धान खरेदी केंद्रावर ऑनलाईनची सोय उपलब्ध नाही तथा धान साठविण्यासाठी गोडावून उपलब्ध नाही, अशा संस्थांचे खरेदीसाठी पणन अधिकाऱ्यांनी मंजुरी दिलीच कशी ? असा प्रश्न मात्र चर्चेचा विषय आहे. एका संबंधित धान खरेदी केंद्राची शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार दाखल केली. मात्र, दिनांक २१ व २३ जून २०२१ ला तक्रारीचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी धान खरेदी केंद्राला भेट दिली असता केंद्रचालक तथा ग्रेडर यांना विचारणा केली असता, गलतीने गेला असेल, अशी उत्तरे देऊन तो मी नव्हेच असे शेतकऱ्यांसमोर अधिकाऱ्यांशी बोलला. सर्व शेतकऱ्यांचे लक्ष तक्रारीचे निवारण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे लागलेले आहे. २१ जूनपर्यंत शेतकऱ्यांचे झालेले धानाचे काटे (मोजमाप) हे ४२ किलो ५०० ग्रामपेक्षा अधिक खरेदी केली आहे. त्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही हे मात्र येणाऱ्या वेळेस सांगणार आहे. यापुढे धान खरेदी केंद्रावर ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांसमोर धानाच्या काट्याची नोंदणी झाली पाहिजे. शेतकरी सातबारा ऑनलाईन प्रक्रिया चालू करण्यात यावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे.

कोट

शेतकऱ्यांना त्याचा संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर जायला पाहिजे. खरेदी केलेल्या धानाची त्वरित पावती देण्यात यावी व अधिकचे धान व पैसे न घेता शेतकऱ्यांच्या धानाची लूट थांबली पाहिजे.

सुभाष बोरकर, डॉ. शांताराम चाफले, भाजप पदाधिकारी.