शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

सेंद्रीवासीयांना मुबलक पिण्याचे पाणी केव्हा मिळणार ?

By admin | Updated: January 31, 2015 00:38 IST

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सेंद्री खुर्द गावातील जनतेला पिण्याचे पाणी मुबलक मिळावे, यासाठी २२ लाख रूपये किंमतीची योजना मंजूर केली.

चरणदास बावणे  कोंढाग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सेंद्री खुर्द गावातील जनतेला पिण्याचे पाणी मुबलक मिळावे, यासाठी २२ लाख रूपये किंमतीची योजना मंजूर केली. गेल्या चार वर्षापासून योजनेचे काम पूर्ण झाले नाही. तसेच पाण्याच्या टाकीची उंची १२ मीटर ऐवजी ९ मिटर केल्याने आतापासूनच सेंद्री टोली येथील जनतेला नळाद्वारे पाणी मिळत नाही. तेव्हा लाखो रूपये खर्च करून ही योजना पांढराहत्ती तर ठरणार नाही, अशी शंका गावकरी व्यक्त करीत आहेत. संबंधित विभागाने आधीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.ग्रामीण भागात लहान, मोठ्या गावात पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा विभाग योजना तयार करून ते पूर्ण करते. सेंद्रीखुर्द येथे चार वर्षापुर्वी पाणी पुरवठा योजना मंजूर केली. मुख्य विहीर, पाण्याची टाकी, पंपमशिन, पाईपलाईन असे कामे योजनेत निर्धारित होते. काम कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे. पाण्याची टाकी उंच भागावर व १२ मीटर उंचीवर करणे आवश्यक होते. पण ९ मीटर उंचीवर व खालच्या भागावर ३० हजार लीटर पाणी क्षमतेची टाकी बांधकाम केले. तसेच टाकीचे बांधकाम खोलगट ठिकाणी केले. सेंद्रीटोली येथील घरे उंचावर आहेत. त्यामुळे आतापासून टोलीवर टाकीचे पाणी चढत नाही म्हणून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मुख्य विहिर, पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून फक्त पंपींग मशनरीचे काम बाकी आहे.गावात पिण्याच्या पाण्याची समस्या टोली येथे आहे. येथील नळांना पाणी येत नाही. अनेकांनी आपले नळ ५ ते ८ फुटपर्यंत खोल खड्डा तयार करून नळ बसविले तरी देखिल नळांना पाणी येत नाही. या योजनेद्वारे गावात सर्वत्र नवीन पाईपलाईन टाकली असून देखील नळाला पाणी येत नही. म्हणजे ही योजना पूर्णत: अपयशी ठरली आहे. सेंद्रीखुर्द गावात ४ हॅन्डपंप व ४ विहिरी आहेत. पण नागरिक नळाचे पाणी घेत असतात. सेंद्रीटोली येथे ३ बोरवेलपैकी एक बोरवेलला पाणी येते म्हणून सर्व सेंद्रीटोली येथील नागरिकांना आतापासून पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे.गावात लाखो रूपये खर्च करून योजनेद्वारे पिण्याचे पाणी मिळत नसेल त्याचा उपयोग काय, असा अनेक गावकरी प्रश्न विचारीत आहेत. पिण्याच्या पाण्याची टाकी खोलगट भागात व ९ मीटर उंच केल्याने ही समस्या उद्भवली आहे. लाखो रूपये खर्च होवून पूर्ण गावाला पाणी मिळाले पाहिजे तेव्हाच ग्रामपंचायही योजना आपल्या ताब्यात होईल, असे सरपंच चंदा विजय सुखदेवे यांचे म्हणणे आहे. चार वर्षापासून पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे. संबंधित विभागाचे अभियंता यांनी देखिल कामाकडे दुर्लक्ष केले. उंच जागेवर आणि १२ मीटर उंच पाण्याची टाकी बांधकाम केले असते तर पाण्याची समस्या निर्माण झाली नसती असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तरी पाण्याच्या टाकीची उंची वाढविण्याची मागण करीत लवकर काम पूर्ण करून जनतेच्या सेवेत पाणी पुरवठा देण्याची मागणी नाना उपरीकर, पुरूषोत्तम गिरडकर, नामदेव बनकर, शरद मोहरकर, गिरीधर सावरकर व गावकऱ्यांनी केली आहे.