शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीवासीयांना मुबलक पिण्याचे पाणी केव्हा मिळणार ?

By admin | Updated: January 31, 2015 00:38 IST

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सेंद्री खुर्द गावातील जनतेला पिण्याचे पाणी मुबलक मिळावे, यासाठी २२ लाख रूपये किंमतीची योजना मंजूर केली.

चरणदास बावणे  कोंढाग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सेंद्री खुर्द गावातील जनतेला पिण्याचे पाणी मुबलक मिळावे, यासाठी २२ लाख रूपये किंमतीची योजना मंजूर केली. गेल्या चार वर्षापासून योजनेचे काम पूर्ण झाले नाही. तसेच पाण्याच्या टाकीची उंची १२ मीटर ऐवजी ९ मिटर केल्याने आतापासूनच सेंद्री टोली येथील जनतेला नळाद्वारे पाणी मिळत नाही. तेव्हा लाखो रूपये खर्च करून ही योजना पांढराहत्ती तर ठरणार नाही, अशी शंका गावकरी व्यक्त करीत आहेत. संबंधित विभागाने आधीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.ग्रामीण भागात लहान, मोठ्या गावात पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा विभाग योजना तयार करून ते पूर्ण करते. सेंद्रीखुर्द येथे चार वर्षापुर्वी पाणी पुरवठा योजना मंजूर केली. मुख्य विहीर, पाण्याची टाकी, पंपमशिन, पाईपलाईन असे कामे योजनेत निर्धारित होते. काम कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे. पाण्याची टाकी उंच भागावर व १२ मीटर उंचीवर करणे आवश्यक होते. पण ९ मीटर उंचीवर व खालच्या भागावर ३० हजार लीटर पाणी क्षमतेची टाकी बांधकाम केले. तसेच टाकीचे बांधकाम खोलगट ठिकाणी केले. सेंद्रीटोली येथील घरे उंचावर आहेत. त्यामुळे आतापासून टोलीवर टाकीचे पाणी चढत नाही म्हणून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मुख्य विहिर, पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून फक्त पंपींग मशनरीचे काम बाकी आहे.गावात पिण्याच्या पाण्याची समस्या टोली येथे आहे. येथील नळांना पाणी येत नाही. अनेकांनी आपले नळ ५ ते ८ फुटपर्यंत खोल खड्डा तयार करून नळ बसविले तरी देखिल नळांना पाणी येत नाही. या योजनेद्वारे गावात सर्वत्र नवीन पाईपलाईन टाकली असून देखील नळाला पाणी येत नही. म्हणजे ही योजना पूर्णत: अपयशी ठरली आहे. सेंद्रीखुर्द गावात ४ हॅन्डपंप व ४ विहिरी आहेत. पण नागरिक नळाचे पाणी घेत असतात. सेंद्रीटोली येथे ३ बोरवेलपैकी एक बोरवेलला पाणी येते म्हणून सर्व सेंद्रीटोली येथील नागरिकांना आतापासून पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे.गावात लाखो रूपये खर्च करून योजनेद्वारे पिण्याचे पाणी मिळत नसेल त्याचा उपयोग काय, असा अनेक गावकरी प्रश्न विचारीत आहेत. पिण्याच्या पाण्याची टाकी खोलगट भागात व ९ मीटर उंच केल्याने ही समस्या उद्भवली आहे. लाखो रूपये खर्च होवून पूर्ण गावाला पाणी मिळाले पाहिजे तेव्हाच ग्रामपंचायही योजना आपल्या ताब्यात होईल, असे सरपंच चंदा विजय सुखदेवे यांचे म्हणणे आहे. चार वर्षापासून पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे. संबंधित विभागाचे अभियंता यांनी देखिल कामाकडे दुर्लक्ष केले. उंच जागेवर आणि १२ मीटर उंच पाण्याची टाकी बांधकाम केले असते तर पाण्याची समस्या निर्माण झाली नसती असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तरी पाण्याच्या टाकीची उंची वाढविण्याची मागण करीत लवकर काम पूर्ण करून जनतेच्या सेवेत पाणी पुरवठा देण्याची मागणी नाना उपरीकर, पुरूषोत्तम गिरडकर, नामदेव बनकर, शरद मोहरकर, गिरीधर सावरकर व गावकऱ्यांनी केली आहे.