शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

सेंद्रीवासीयांना मुबलक पिण्याचे पाणी केव्हा मिळणार ?

By admin | Updated: January 31, 2015 00:38 IST

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सेंद्री खुर्द गावातील जनतेला पिण्याचे पाणी मुबलक मिळावे, यासाठी २२ लाख रूपये किंमतीची योजना मंजूर केली.

चरणदास बावणे  कोंढाग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सेंद्री खुर्द गावातील जनतेला पिण्याचे पाणी मुबलक मिळावे, यासाठी २२ लाख रूपये किंमतीची योजना मंजूर केली. गेल्या चार वर्षापासून योजनेचे काम पूर्ण झाले नाही. तसेच पाण्याच्या टाकीची उंची १२ मीटर ऐवजी ९ मिटर केल्याने आतापासूनच सेंद्री टोली येथील जनतेला नळाद्वारे पाणी मिळत नाही. तेव्हा लाखो रूपये खर्च करून ही योजना पांढराहत्ती तर ठरणार नाही, अशी शंका गावकरी व्यक्त करीत आहेत. संबंधित विभागाने आधीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.ग्रामीण भागात लहान, मोठ्या गावात पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा विभाग योजना तयार करून ते पूर्ण करते. सेंद्रीखुर्द येथे चार वर्षापुर्वी पाणी पुरवठा योजना मंजूर केली. मुख्य विहीर, पाण्याची टाकी, पंपमशिन, पाईपलाईन असे कामे योजनेत निर्धारित होते. काम कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे. पाण्याची टाकी उंच भागावर व १२ मीटर उंचीवर करणे आवश्यक होते. पण ९ मीटर उंचीवर व खालच्या भागावर ३० हजार लीटर पाणी क्षमतेची टाकी बांधकाम केले. तसेच टाकीचे बांधकाम खोलगट ठिकाणी केले. सेंद्रीटोली येथील घरे उंचावर आहेत. त्यामुळे आतापासून टोलीवर टाकीचे पाणी चढत नाही म्हणून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मुख्य विहिर, पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून फक्त पंपींग मशनरीचे काम बाकी आहे.गावात पिण्याच्या पाण्याची समस्या टोली येथे आहे. येथील नळांना पाणी येत नाही. अनेकांनी आपले नळ ५ ते ८ फुटपर्यंत खोल खड्डा तयार करून नळ बसविले तरी देखिल नळांना पाणी येत नाही. या योजनेद्वारे गावात सर्वत्र नवीन पाईपलाईन टाकली असून देखील नळाला पाणी येत नही. म्हणजे ही योजना पूर्णत: अपयशी ठरली आहे. सेंद्रीखुर्द गावात ४ हॅन्डपंप व ४ विहिरी आहेत. पण नागरिक नळाचे पाणी घेत असतात. सेंद्रीटोली येथे ३ बोरवेलपैकी एक बोरवेलला पाणी येते म्हणून सर्व सेंद्रीटोली येथील नागरिकांना आतापासून पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे.गावात लाखो रूपये खर्च करून योजनेद्वारे पिण्याचे पाणी मिळत नसेल त्याचा उपयोग काय, असा अनेक गावकरी प्रश्न विचारीत आहेत. पिण्याच्या पाण्याची टाकी खोलगट भागात व ९ मीटर उंच केल्याने ही समस्या उद्भवली आहे. लाखो रूपये खर्च होवून पूर्ण गावाला पाणी मिळाले पाहिजे तेव्हाच ग्रामपंचायही योजना आपल्या ताब्यात होईल, असे सरपंच चंदा विजय सुखदेवे यांचे म्हणणे आहे. चार वर्षापासून पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे. संबंधित विभागाचे अभियंता यांनी देखिल कामाकडे दुर्लक्ष केले. उंच जागेवर आणि १२ मीटर उंच पाण्याची टाकी बांधकाम केले असते तर पाण्याची समस्या निर्माण झाली नसती असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तरी पाण्याच्या टाकीची उंची वाढविण्याची मागण करीत लवकर काम पूर्ण करून जनतेच्या सेवेत पाणी पुरवठा देण्याची मागणी नाना उपरीकर, पुरूषोत्तम गिरडकर, नामदेव बनकर, शरद मोहरकर, गिरीधर सावरकर व गावकऱ्यांनी केली आहे.