शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सिंचनाची सुविधा केव्हा होणार?

By admin | Updated: March 9, 2016 01:45 IST

भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील त्या सात गावांना अद्यापही जलसिंचनाची कोणतीच सुविधा नसल्याने तेथील शेतकऱ्यांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो.

अड्याळ : भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील त्या सात गावांना अद्यापही जलसिंचनाची कोणतीच सुविधा नसल्याने तेथील शेतकऱ्यांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यात गोलेवाडी, डोंगरगाव, पन्नासी, भिकारमिन्सी, एटेवाही, सोनेगाव आणि पागोरा या गावातील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.दिवसेंदिवस पावसाचे पाणी कमी प्रमाणात पडत असल्याने या गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतीला अस्मानी तद्वतच सुलतानी संकटालाही सामोरे जावे लागत आहे. त्याकरिता रावणवाडी जलाशयाचे पाणी या गावापर्यंत गेल्यास त्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. यापूर्वी रावणवाडी जलाशयाचे पाणी इटगाव, वडद, निमगाव, जामगाव, मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर, पहेला, बोरगाव खुर्द, वाकेश्वर, रावणवाडी इत्यादी गावांना पुरविण्यात येत होते.आता टेकेपार उपसा सिंचन योजना सुरु झाल्याने रावणवाडी जलाशयाशी जोडलेले असलेले इटगाव, वडद, निमगाव, जामगाव, मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर, पहेला ही १० गावे आता टेकेपार उपसा सिंचन येथे जोडले आहेत. त्यामुळे रावणवाडी जलाशयाचे पाणी फक्त बोरगाव खुर्द, वाकेश्वर, रावणवाडी या तीनच गावांना मिळत आहे. त्यामुळे रावणवाडी जलाशयात बरेच पाणी शिल्लक राहते. ते शिल्लक राहिलेले पाणी त्या सात गावांना मिळाल्यास त्या गावातील शेतकऱ्यांना जलसिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकते.त्याकरिता रावणवाडी जलाशयापासून सोनेगाव, एटेवाही, गोलेवाडी, डोंगरगाव येथून नवीन नहर काढल्यास वरील गावांना सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकते. तसेच पाणी कमी पडल्यास टेकेपार उपसा सिंचनाचे पाणी रावणवाडी जलाशयात सोडल्यास पाणी कमी पडणार नाही. त्याकरिता या क्षेत्रातील आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)