शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
4
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
5
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
6
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
7
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
8
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
9
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
10
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
11
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
12
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
13
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
14
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
15
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
16
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
17
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
18
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
19
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
20
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

सिंचनाची सुविधा केव्हा होणार?

By admin | Updated: March 9, 2016 01:45 IST

भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील त्या सात गावांना अद्यापही जलसिंचनाची कोणतीच सुविधा नसल्याने तेथील शेतकऱ्यांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो.

अड्याळ : भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील त्या सात गावांना अद्यापही जलसिंचनाची कोणतीच सुविधा नसल्याने तेथील शेतकऱ्यांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यात गोलेवाडी, डोंगरगाव, पन्नासी, भिकारमिन्सी, एटेवाही, सोनेगाव आणि पागोरा या गावातील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.दिवसेंदिवस पावसाचे पाणी कमी प्रमाणात पडत असल्याने या गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतीला अस्मानी तद्वतच सुलतानी संकटालाही सामोरे जावे लागत आहे. त्याकरिता रावणवाडी जलाशयाचे पाणी या गावापर्यंत गेल्यास त्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. यापूर्वी रावणवाडी जलाशयाचे पाणी इटगाव, वडद, निमगाव, जामगाव, मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर, पहेला, बोरगाव खुर्द, वाकेश्वर, रावणवाडी इत्यादी गावांना पुरविण्यात येत होते.आता टेकेपार उपसा सिंचन योजना सुरु झाल्याने रावणवाडी जलाशयाशी जोडलेले असलेले इटगाव, वडद, निमगाव, जामगाव, मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर, पहेला ही १० गावे आता टेकेपार उपसा सिंचन येथे जोडले आहेत. त्यामुळे रावणवाडी जलाशयाचे पाणी फक्त बोरगाव खुर्द, वाकेश्वर, रावणवाडी या तीनच गावांना मिळत आहे. त्यामुळे रावणवाडी जलाशयात बरेच पाणी शिल्लक राहते. ते शिल्लक राहिलेले पाणी त्या सात गावांना मिळाल्यास त्या गावातील शेतकऱ्यांना जलसिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकते.त्याकरिता रावणवाडी जलाशयापासून सोनेगाव, एटेवाही, गोलेवाडी, डोंगरगाव येथून नवीन नहर काढल्यास वरील गावांना सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकते. तसेच पाणी कमी पडल्यास टेकेपार उपसा सिंचनाचे पाणी रावणवाडी जलाशयात सोडल्यास पाणी कमी पडणार नाही. त्याकरिता या क्षेत्रातील आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)