शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार ?

By admin | Updated: January 9, 2017 00:30 IST

शासनाने सम्यक विचार करुन भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर व मोहाडी तालुक्यातील २०१५ या वर्षातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने...

बीआरएसपीचा प्रश्न : शासन प्रशासन सुस्त, शेतकरी त्रस्तभंडारा : शासनाने सम्यक विचार करुन भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर व मोहाडी तालुक्यातील २०१५ या वर्षातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज असताना भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवाना आर्थिक मदत न देण्याचे कारण काय, असा प्रश्न बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टीचे जेष्ठ नेते संजय गाढवे, जिल्हा अध्यक्ष झेड. आर. दुधकुवर, उपाध्यक्ष मनोज गोस्वामी, अनिल भोवते यांनी उपस्थित केला आहे.भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान (भात) पिकाचे उत्पादन घेण्यात येते. भंडारा जिल्ह्यातील शेती कोरडवाहू शेती असून निसर्गाचा पावसावर अवलंबुन आहे. शेतात धान (भात) पिकाची रोवणी केल्यापासुन तर पिक परिपक्व होऊन कापणीपर्यंत धान पिकाची सतत काळजी घ्यावी लागते. यासाठी शेतकऱ्यांंना मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च करावा लागत असतो. पंरतु दुसरा कोणताही पर्यायी पुरक व्यवसाय नसल्याने भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकरी बांधवाना सर्वस्वी शेतीवरच अवलंबुन राहावे लागते. अशातच खरीप हंगाम २०१५ मध्ये निसर्गाच्या अवकृपेमुळे व भात पिक तसेच रब्बी हंगामातील पिकांवर विपरित परिणाम होवुन पिक उत्पादनात बरीच घट आल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक फटका सहन करावा लागला. अशावेळी शासनाने शेतकरी बांधवाना तातडीने आर्थिक मदत करणे गरजेचे असतांना अजुनपर्यंत आर्थिक मदत मिळाली नाही. तसेच पिक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही, अशी शेतकरी बांधवांची ओरड आहे. अस्मानी व सुलतानी संकटामुळे धान उत्पादक शेतकरीबांधव कमालीचे आर्थिक विंवचनेत सापडले आहेत. (नगर प्रतिनिधी)