शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
3
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
4
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
5
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
6
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
8
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
9
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
10
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
11
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
12
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
13
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
14
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
15
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
16
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
17
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
18
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
19
"गेल्या कुंभमेळ्यात पालकमंत्री, यावेळी नाही; पण पुढे बघू...'; गिरीश महाजनांनी मनातील इच्छा केली व्यक्त
20
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

धान उत्पादक शेतकऱ्यांची अधोगती केव्हा थांबणार?

By admin | Updated: November 26, 2015 00:42 IST

शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला योग्य भाव मिळावा त्याचप्रमाणे शेतमाल विक्रीमध्ये फसवणूक होऊ नये यासाठी आधारभूत किमती ठरवून दिल्या आहेत.

भावही मातीमोल : उत्पादनावर आधारित रास्त भावाचा विचारच नाहीपालांदूर : शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला योग्य भाव मिळावा त्याचप्रमाणे शेतमाल विक्रीमध्ये फसवणूक होऊ नये यासाठी आधारभूत किमती ठरवून दिल्या आहेत. मात्र ज्या मूल्यांकनाने शेतमालाची आधारभूत किंमत ठरविण्यात आली, त्यामध्ये शेतमाल उत्पादकांवर अन्यायच केला जातो. शेतमालाला देण्यात येणारा भाव शेतकऱ्याला अडचणीत आणण्यासारखा आहे. ज्या भावामध्ये शेतमालाची विक्री करावी लागते ते भाव परवडण्यासारखे नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दबल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.जिल्ह्यात मुख्यत्वे धानाचे पीक घेतले जाते. लाखनी हा धान उत्पादक तालुका म्हणून ओळखला जात असून या परिसरातील शेतकरी विविध प्रकारच्या चांगल्या प्रकारच्या धानपिकांचे उत्पन्न घेत असतात. परंतु धान उत्पादक शेतकरी प्रगतीऐवजी अधोगतीकडेच जात असल्याचे चित्र आहे. शेतकरी खरीप हंगामात जवळपास पाच ते सहा महिने आपल्या कुटुंबासोबत राबत असतो. रब्बी हंगामातही राबून शेती कसत असतो. मात्र त्याला हव्या त्या प्रमाणात मोबदला मिळत नाही. शेतकरी कर्जाच्या ओज्याखाली दबला जात असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये दिवसागणीक वाढ होत आहे.यासाठी शासनाचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या परिसरामध्ये सिंचनाच्या सोयी नाहीत. बी-बियाणे, खत मजुरी, कीटकनाशके, औषधी यांचे भाव गगणाला भिडले आहे. धानाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक येऊन शेतकरी घाट्यामध्ये शेती व्यवसाय करीत आहे. उत्पन्न कमी झाले तरी कर्ज काढून शेतकरी दरवर्षी चांगले उत्पादन होण्याच्या आशेने शेती करतो. परंतु निसर्गाचा लहरीपणा आणि धान पिकांवर होणारा विविध रोगांचा प्रादुर्भाव, जंगली प्राण्यांकडून होणारे नुकसान यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. (वार्ताहर)