शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची आर्त केव्हा ऐकू येणार !

By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST

जगाचा पोशिंदा ज्या शेतकऱ्याला म्हटले जाते, तो पुरता कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे.

जोहार मायबाप जोहार : शासनाकडून बोळवण, कर्जाखाली दबला पोशिंदाप्रशांत देसाई भंडाराजगाचा पोशिंदा ज्या शेतकऱ्याला म्हटले जाते, तो पुरता कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. एकीकडे निसर्गाचा सततचा लहरीपणा दुसरीकडे शासनाने त्यांच्याकडे फिरविलेली पाठ. निसर्ग व शासनाच्या फेऱ्यात सापडलेला शेतकरी आता जगायचे कसे? या विवंचनेत अडकला आहे. परिणामी दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्याची गावे दुष्काळग्रस्त यादीत आली नाही. त्यामुळे त्यांचे कर्जमाफ होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना सावकारांकडे हात पसरावे लागत आहे. शेतात पिकणारे धान्य हेच शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असताना त्यांचे भवितव्य पूर्णत: निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. पुरेशा पावसाअभावी शेतकरी पेरण्या करू शकत नाहीत. दिवस उगवला की मावळेपर्यंत बळीराजा चातकासारखी वाट बघत असतो. एकावर एक दिवस कोरडे जाऊ लागले की शेतकऱ्याचे उसने, अवसान व मनोधैर्य खचू लागते. पावसाविना धंदा नाही, पीक नाही आणि कुठल्याही व्यवसायाला चालना नाही. मग उपजिविकेच्या शोधात तरूणवर्ग शहराकडे धाव घेतो. भूमिहीन लोकांवर उपासमारीची वेळ येते. लोकप्रतिनिधी आणि सरकार या दोघांच्या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. बियाणे, खते मुबलक प्रमाणात असतानादेखील कृत्रिम टंचाई करून वाजवीपेक्षा जास्त दरात विकली जातात. पावसाच्या अभावामुळे शेताला पाणी तरी द्यायचे कुठून? या प्रश्नाने शेतकरी हैराण होतो. पाऊस पडला नाही तर राज्य सरकारने दुष्काळग्रस्त गाव जाहीर केली असती तर शेतकऱ्यांना काही सवलती मिळू शकतील, एवढीच शेतकऱ्यांना आशा होती. परंतु मायबाप सरकारने तेही केले नाही. कष्ट करूनही दुष्टचक्राचा फेरा कायमशेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणीही आपलेपणाने लक्ष देत नाही. त्यामुळे काबाडकष्ट करूनही हाती काहीच लागत नाही. त्यातून व्यसनाधीनता व आत्महत्या या चक्रात शेतकरी अडकतो. मुलीचे लग्न करताना शहरातील नोकरदाराला ‘मागेल तो हुंडा देऊन करू’, पण गावातील शेतकऱ्याला मुलगी देणार नाही, अशीही मानसिकता तयार होते. शेतकरी मागून मागून काय मागतात तर शेतीसाठी पाणी, शेतीसाठी खते, शेतीसाठी कर्ज आणि उत्पादनाला परवडेल असा भाव.मुक्या जनावरांवरही संकटपाण्याअभावी जनजीवन विस्कळीत होऊन जाते. सर्वाधिक हाल मुक्या जनावरांचे होतात. हिरव्या चाऱ्यावाचून दुभती जनावरे दूध देईनाशी होतात. शेतमालाला हमीभाव नसतो. उत्पादनावर शेतीमालाचा भाव ठरवला जातो. शेतीमाल सरासरीपेक्षा जास्त झाला तर भाव कमी होतो. उत्पादन कमी झाले तर स्थिर राहतो. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कसा व कुठून काढायचा हा कायमस्वरूपी प्रश्न दुर्लक्षित राहतो. उसनवारी बंद पडल्यामुळे घरातील सोनेनाणे विकायची वेळ येते. जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायीशेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाला सरसकट माफी देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. मात्र, हे आश्वासन पुर्णत्वास गेले नाही. त्यामुळे आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना कर्जबाजारीच राहण्याची वेळ आली आहे. अशाही स्थितीत भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी पुढाकार घेत पीक लागवड व शेतकऱ्यांसाठी विविध महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेची अंमलबजावणी करून स्वयंरोजगार देण्यासाठी सुनिल फुंडे हे धडपडत आहेत.