शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची आर्त केव्हा ऐकू येणार !

By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST

जगाचा पोशिंदा ज्या शेतकऱ्याला म्हटले जाते, तो पुरता कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे.

जोहार मायबाप जोहार : शासनाकडून बोळवण, कर्जाखाली दबला पोशिंदाप्रशांत देसाई भंडाराजगाचा पोशिंदा ज्या शेतकऱ्याला म्हटले जाते, तो पुरता कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. एकीकडे निसर्गाचा सततचा लहरीपणा दुसरीकडे शासनाने त्यांच्याकडे फिरविलेली पाठ. निसर्ग व शासनाच्या फेऱ्यात सापडलेला शेतकरी आता जगायचे कसे? या विवंचनेत अडकला आहे. परिणामी दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्याची गावे दुष्काळग्रस्त यादीत आली नाही. त्यामुळे त्यांचे कर्जमाफ होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना सावकारांकडे हात पसरावे लागत आहे. शेतात पिकणारे धान्य हेच शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असताना त्यांचे भवितव्य पूर्णत: निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. पुरेशा पावसाअभावी शेतकरी पेरण्या करू शकत नाहीत. दिवस उगवला की मावळेपर्यंत बळीराजा चातकासारखी वाट बघत असतो. एकावर एक दिवस कोरडे जाऊ लागले की शेतकऱ्याचे उसने, अवसान व मनोधैर्य खचू लागते. पावसाविना धंदा नाही, पीक नाही आणि कुठल्याही व्यवसायाला चालना नाही. मग उपजिविकेच्या शोधात तरूणवर्ग शहराकडे धाव घेतो. भूमिहीन लोकांवर उपासमारीची वेळ येते. लोकप्रतिनिधी आणि सरकार या दोघांच्या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. बियाणे, खते मुबलक प्रमाणात असतानादेखील कृत्रिम टंचाई करून वाजवीपेक्षा जास्त दरात विकली जातात. पावसाच्या अभावामुळे शेताला पाणी तरी द्यायचे कुठून? या प्रश्नाने शेतकरी हैराण होतो. पाऊस पडला नाही तर राज्य सरकारने दुष्काळग्रस्त गाव जाहीर केली असती तर शेतकऱ्यांना काही सवलती मिळू शकतील, एवढीच शेतकऱ्यांना आशा होती. परंतु मायबाप सरकारने तेही केले नाही. कष्ट करूनही दुष्टचक्राचा फेरा कायमशेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणीही आपलेपणाने लक्ष देत नाही. त्यामुळे काबाडकष्ट करूनही हाती काहीच लागत नाही. त्यातून व्यसनाधीनता व आत्महत्या या चक्रात शेतकरी अडकतो. मुलीचे लग्न करताना शहरातील नोकरदाराला ‘मागेल तो हुंडा देऊन करू’, पण गावातील शेतकऱ्याला मुलगी देणार नाही, अशीही मानसिकता तयार होते. शेतकरी मागून मागून काय मागतात तर शेतीसाठी पाणी, शेतीसाठी खते, शेतीसाठी कर्ज आणि उत्पादनाला परवडेल असा भाव.मुक्या जनावरांवरही संकटपाण्याअभावी जनजीवन विस्कळीत होऊन जाते. सर्वाधिक हाल मुक्या जनावरांचे होतात. हिरव्या चाऱ्यावाचून दुभती जनावरे दूध देईनाशी होतात. शेतमालाला हमीभाव नसतो. उत्पादनावर शेतीमालाचा भाव ठरवला जातो. शेतीमाल सरासरीपेक्षा जास्त झाला तर भाव कमी होतो. उत्पादन कमी झाले तर स्थिर राहतो. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कसा व कुठून काढायचा हा कायमस्वरूपी प्रश्न दुर्लक्षित राहतो. उसनवारी बंद पडल्यामुळे घरातील सोनेनाणे विकायची वेळ येते. जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायीशेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाला सरसकट माफी देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. मात्र, हे आश्वासन पुर्णत्वास गेले नाही. त्यामुळे आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना कर्जबाजारीच राहण्याची वेळ आली आहे. अशाही स्थितीत भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी पुढाकार घेत पीक लागवड व शेतकऱ्यांसाठी विविध महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेची अंमलबजावणी करून स्वयंरोजगार देण्यासाठी सुनिल फुंडे हे धडपडत आहेत.