शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

लाखांदूर तालुक्यात दुष्काळ केव्हा जाहीर होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST

सुमारे ८९ गावांचा समावेश असलेल्या लाखांदूर तालुक्यातील महत्तम शेतकरी धान उत्पादक आहेत. त्यानुसार यंदाच्या खरीपात तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्रात धान ...

सुमारे ८९ गावांचा समावेश असलेल्या लाखांदूर तालुक्यातील महत्तम शेतकरी धान उत्पादक आहेत. त्यानुसार यंदाच्या खरीपात तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्रात धान पिकाची, तर उर्वरित क्षेत्रात अन्य पिकांची लागवड करण्यात आली होती. मात्र यंदाच्या खरीपात तालुक्यातील चूलबंद व वैनगंगा नदीला तब्बल तीनदा पूर आल्याने तालुक्यातील अधिकतम क्षेत्रातील पिक शेतीचे पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तथापि, पूर परिस्थिती ओसरत नाही तोच पुढील काळात उर्वरित क्षेत्रातील लागवडीखालील धान पिकांवर तुडतुडा तर काही पिकांवर अन्य कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक खराब झाले.

यासंबंधित परिस्थितीत लागवडीखालील पिकांची उत्पादकता घसरली असताना परतीच्या पावसानेदेखील कापणीपूर्ण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकूणच विविध नैसर्गिक प्रकोपामुळे व कीड रोगाच्या प्रादुर्भावाने तालुक्यात पीक उत्पादकतेत घट येऊन अंतिम आणेवारीही ५० टक्क्यापेक्षा कमी ०.३७ टक्के असल्याचे तालुका प्रशासनाने जाहीर केले. सदर आणेवारी गतवर्षी ३१ डिसेंबर रोजी जाहीर होताच शासन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळ जाहीर करणार व सदर दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार, असा आशावाद सर्वत्र व्यक्त केला गेला. मात्र तब्बल दीड महिन्याहून अधिक काळ लोटूनही दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर न केल्याने शेतकरी जनतेत नाराजी व्यक्त केली जात आहे. खरीपातील पीक उत्पादनाच्या भरवशावर पुढील वर्षभर कुटुंब पोषण करणारे शेतकरी कुटुंब यंदा मात्र सुमार आर्थिक संकटात सापडल्याचे वास्तव आहे.

दरम्यान, तालुक्यातील सबंध शेतकरी जनता आर्थिक संकटात सापडली असताना शासनाच्या वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याचे सत्र चालविले आहे. पीक कर्ज घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात उत्पादन न आल्याने कर्ज परतफेड करण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. एवढेच नव्हे तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात तालुक्यातील दोन तरुण शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला वैतागून आत्महत्या केली आहे.

या सबंध परिस्थितीची प्रमुख लोकप्रतिनिधीसह जिल्हा प्रशासनाला जाणीव असतानाही दुष्काळ जाहीर करण्यासाठी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, दुष्काळसदृश परिस्थिती असताना शासनाने तालुक्यात मजुरी कामेदेखील उपलब्ध न केल्याने कामाविना अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.

याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी तालुक्यातील जनतेत केली जात आहे.