शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

लाखांदूर तालुक्यात दुष्काळ केव्हा जाहीर होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST

सुमारे ८९ गावांचा समावेश असलेल्या लाखांदूर तालुक्यातील महत्तम शेतकरी धान उत्पादक आहेत. त्यानुसार यंदाच्या खरीपात तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्रात धान ...

सुमारे ८९ गावांचा समावेश असलेल्या लाखांदूर तालुक्यातील महत्तम शेतकरी धान उत्पादक आहेत. त्यानुसार यंदाच्या खरीपात तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्रात धान पिकाची, तर उर्वरित क्षेत्रात अन्य पिकांची लागवड करण्यात आली होती. मात्र यंदाच्या खरीपात तालुक्यातील चूलबंद व वैनगंगा नदीला तब्बल तीनदा पूर आल्याने तालुक्यातील अधिकतम क्षेत्रातील पिक शेतीचे पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तथापि, पूर परिस्थिती ओसरत नाही तोच पुढील काळात उर्वरित क्षेत्रातील लागवडीखालील धान पिकांवर तुडतुडा तर काही पिकांवर अन्य कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक खराब झाले.

यासंबंधित परिस्थितीत लागवडीखालील पिकांची उत्पादकता घसरली असताना परतीच्या पावसानेदेखील कापणीपूर्ण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकूणच विविध नैसर्गिक प्रकोपामुळे व कीड रोगाच्या प्रादुर्भावाने तालुक्यात पीक उत्पादकतेत घट येऊन अंतिम आणेवारीही ५० टक्क्यापेक्षा कमी ०.३७ टक्के असल्याचे तालुका प्रशासनाने जाहीर केले. सदर आणेवारी गतवर्षी ३१ डिसेंबर रोजी जाहीर होताच शासन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळ जाहीर करणार व सदर दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार, असा आशावाद सर्वत्र व्यक्त केला गेला. मात्र तब्बल दीड महिन्याहून अधिक काळ लोटूनही दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर न केल्याने शेतकरी जनतेत नाराजी व्यक्त केली जात आहे. खरीपातील पीक उत्पादनाच्या भरवशावर पुढील वर्षभर कुटुंब पोषण करणारे शेतकरी कुटुंब यंदा मात्र सुमार आर्थिक संकटात सापडल्याचे वास्तव आहे.

दरम्यान, तालुक्यातील सबंध शेतकरी जनता आर्थिक संकटात सापडली असताना शासनाच्या वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याचे सत्र चालविले आहे. पीक कर्ज घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात उत्पादन न आल्याने कर्ज परतफेड करण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. एवढेच नव्हे तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात तालुक्यातील दोन तरुण शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला वैतागून आत्महत्या केली आहे.

या सबंध परिस्थितीची प्रमुख लोकप्रतिनिधीसह जिल्हा प्रशासनाला जाणीव असतानाही दुष्काळ जाहीर करण्यासाठी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, दुष्काळसदृश परिस्थिती असताना शासनाने तालुक्यात मजुरी कामेदेखील उपलब्ध न केल्याने कामाविना अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.

याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी तालुक्यातील जनतेत केली जात आहे.