शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर तालुक्यात दुष्काळ केव्हा जाहीर होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST

सुमारे ८९ गावांचा समावेश असलेल्या लाखांदूर तालुक्यातील महत्तम शेतकरी धान उत्पादक आहेत. त्यानुसार यंदाच्या खरीपात तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्रात धान ...

सुमारे ८९ गावांचा समावेश असलेल्या लाखांदूर तालुक्यातील महत्तम शेतकरी धान उत्पादक आहेत. त्यानुसार यंदाच्या खरीपात तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्रात धान पिकाची, तर उर्वरित क्षेत्रात अन्य पिकांची लागवड करण्यात आली होती. मात्र यंदाच्या खरीपात तालुक्यातील चूलबंद व वैनगंगा नदीला तब्बल तीनदा पूर आल्याने तालुक्यातील अधिकतम क्षेत्रातील पिक शेतीचे पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तथापि, पूर परिस्थिती ओसरत नाही तोच पुढील काळात उर्वरित क्षेत्रातील लागवडीखालील धान पिकांवर तुडतुडा तर काही पिकांवर अन्य कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक खराब झाले.

यासंबंधित परिस्थितीत लागवडीखालील पिकांची उत्पादकता घसरली असताना परतीच्या पावसानेदेखील कापणीपूर्ण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकूणच विविध नैसर्गिक प्रकोपामुळे व कीड रोगाच्या प्रादुर्भावाने तालुक्यात पीक उत्पादकतेत घट येऊन अंतिम आणेवारीही ५० टक्क्यापेक्षा कमी ०.३७ टक्के असल्याचे तालुका प्रशासनाने जाहीर केले. सदर आणेवारी गतवर्षी ३१ डिसेंबर रोजी जाहीर होताच शासन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळ जाहीर करणार व सदर दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार, असा आशावाद सर्वत्र व्यक्त केला गेला. मात्र तब्बल दीड महिन्याहून अधिक काळ लोटूनही दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर न केल्याने शेतकरी जनतेत नाराजी व्यक्त केली जात आहे. खरीपातील पीक उत्पादनाच्या भरवशावर पुढील वर्षभर कुटुंब पोषण करणारे शेतकरी कुटुंब यंदा मात्र सुमार आर्थिक संकटात सापडल्याचे वास्तव आहे.

दरम्यान, तालुक्यातील सबंध शेतकरी जनता आर्थिक संकटात सापडली असताना शासनाच्या वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याचे सत्र चालविले आहे. पीक कर्ज घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात उत्पादन न आल्याने कर्ज परतफेड करण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. एवढेच नव्हे तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात तालुक्यातील दोन तरुण शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला वैतागून आत्महत्या केली आहे.

या सबंध परिस्थितीची प्रमुख लोकप्रतिनिधीसह जिल्हा प्रशासनाला जाणीव असतानाही दुष्काळ जाहीर करण्यासाठी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, दुष्काळसदृश परिस्थिती असताना शासनाने तालुक्यात मजुरी कामेदेखील उपलब्ध न केल्याने कामाविना अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.

याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी तालुक्यातील जनतेत केली जात आहे.