शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

नगर परिषद अभ्यासिका, वाचनालय केव्हा सुरू करणार?

By admin | Updated: June 8, 2017 00:25 IST

नगरपरिषद क्षेत्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या वाढला आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करण्यासाठी अभ्यासिका व वाचनालय यांचे खूप मोठे महत्व आहे.

निवेदन : सुशिक्षित बेरोजगारांची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नगरपरिषद क्षेत्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या वाढला आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करण्यासाठी अभ्यासिका व वाचनालय यांचे खूप मोठे महत्व आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जेव्हा अभ्यासिकेकडे वळतील तेव्हा भारत हे एक महासत्ता होईल. या बाबासाहेब आंबेडकर यांचा उक्तीला पुर्णत्वास नेण्यासाठी नगर परिषद क्षेत्रामध्ये अभ्यासिका व वाचनालय याची आवश्यकता आहे. पालिकेने ते सुरू करावे, अशी मागणी आझाद शेतकरी संघटनेने मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली आहे.शासकीय, निमशासकीय नोकरी मिळविण्यासाठी व बेरोजगारी कमी होवून एक आदर्श जीवन जगण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. मुळात सध्याचे युग हे स्पर्धेचे असल्यामुळे बौद्धिक पातळी वाढविण्यासाठी अभ्यासिका एक महत्वाचे साधन आहे.शासनातर्फे मोठ्या प्रमाणात संघ लोक सेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, कर्मचारी चयन आयोग, आयबीपीएस, बँकिंग, रेल्वेभरती, आॅर्डनस फॅक्टरी, सिमा सुरक्षा दल, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षा घेण्यात येत असतात. त्यामुळे या परीक्षा देवून नौकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवश्यकता असते.पवनी नगर परिषद क्षेत्रात योग्य वाचनालय व अभ्यासिका उपलब्ध नसल्यामुळे आजच्या युवक वर्गाला नौकरी मिळवून भवितव्य घडविण्यात खूप मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांना तोंड देण्यासाठी व स्वत:चे भवितव्य घडविण्यासाठी अभ्यासिका व वाचनालयाचा मोठा सहभाग असतो. पवनी नगर परिषद क्षेत्राचा विकास व्हावा आणि याचा आदर्श ठेवून भावी पिढी घडावी म्हणून नगर परिषद पवनीतर्फे अभ्यासिका व वाचनालय उपलब्ध करून द्यावे. अशा आशयाचे निवेदन आझाद शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना देण्यात आले.निवेदनाचा विचार करून पवनी शहराचा तसेच जिल्ह्यात पवनी नगर परिषदेचा नाव उंच करून नवीन अभ्यासक पिढी तयार करण्यात हातभार लावत पवनी नगर परिषद क्षेत्रात वाचनालय व पुर्णवेळ अभ्यासिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई व सुशिक्षित बेरोजगार युवक निलेश, चंद्रकांत काटेखाये, अश्विन रामटेके आदींनी निवेदनातून केली आहे.