शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

धानाचे चुकारे केव्हा मिळणार?

By admin | Updated: July 15, 2016 00:49 IST

पवनी तालुक्या उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाचे ५ कोटी ८५ लाख १० हजार ५४२ रुपयांचे चुकारे अडल्याने

शेतकरी सावकाराच्या द्वारी : तोमेश्वर पंचभाई यांची मागणी चिचाळ : पवनी तालुक्या उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाचे ५ कोटी ८५ लाख १० हजार ५४२ रुपयांचे चुकारे अडल्याने शेतकरी खरीप हंगामासाठी मोठ्या संकटात सापडला असून हंगामाला पैसे आणावयाचे कुढून, रोवणीसाठी व्याजाने पैसे काढण्याची पाळी शेतकऱ्यावर आली आहे. शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला आहे. शासनाने तात्काळ शेतकऱ्यांचे शिल्लक चुकारे देण्याची मागणी पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे. पवनी तालुक्यातील काळी कसदार जमीनीने या भागाला चौरास म्हणून ओळख आहे. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे. असे शेतकरी खरीप हंगामातील शेतीला येणारा खर्च हा उदात्त हेतू ठेवून व्याजाने रक्कम काढून उन्हाळी धान उत्पादन घेतो. मात्र दोन तीन वर्षापासून रब्बी, खरीप व उन्हाळी हंगामात पिकाच्या उत्पादनात घट होत आहे. शेतकऱ्यांच्या शेती व्यवसाय संकाटत आलेला आहे. शेतकरी नागावला जात आहे. शेतकऱ्यांची निसर्गाच्या पावसाने व शासनानेही थट्टा केली आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. शेतकऱ्यांचे उन्हाळी धान हंगामाचे ६ कोटी रुपये अडून आहेत. खरीप हंगाम तोंडावर आहे. खरीप हंगामाच्या धानपिकाच्या रोवणीसाठी कुणाकडे हात पसरावे असा सवाल शेतकरी करीत आहेत. आपलेच पैसे असूनही शासन उन्हाळी हंगामातील धान चुकारे का देत नाही? यालाच म्हणायचे का शेतकऱ्यांचे अच्छे दिन असा प्रश्न उपस्थित होत आहे. पवनी तालुक्यात ३६,३४२ क्विं. धान खरेदी झाली यामध्ये चिचाळ ३६५६.८० क्विंटल, पवनी ७६५२.८० क्विं., आसगाव १३०७५.८. क्विं, कोंढा ८५८८ क्विं., धानाची खरेदी करण्यात आली. सदर आधरभूत केंद्राकडून ६ जुलैपर्यंत चुकारे मिळतील असे सांगितले असले तरी अद्याप चुकारे न मिळाल्याने धान विक्री करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले ओहत. व कर्जाचे व्याज वाढतच आहे. आधीच नापीकी वेळेवर चुकारे नाही स्वत:चा माल स्वत:च चोर अशा कैचीत शेतकरी सापडला आहे. मात्र निवडणूकीच्या वेळी विकासाचे तुनतुने वाजविणारे पुढारी मात्र शेतकऱ्यांसाठी आवाजा का उढवत नाही असा प्रश्न सुज्ञ नागरिक करीत आहेत. जगाच्या पोशिंदाचे शासन चुकारे अडवून बसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला आहे. मात्र शेतकऱ्याचे आंदोलने, उपोषणे, मोच्र काढून ढेंगा मिरविणारे पुढारी मात्र गप्प का असा प्रश्न सुज्ञ शेतकरी करीत आहेत. शासनाने तात्काळ शेतकऱ्यांचे चुकारे दयावे अशी मागणी पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे. तालूक्यात पहिलेच शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला असताना व धानाचे चुकारे झाले नसल्याने शेतकऱ्यांनी व्याजी रक्कम घेऊन धान बिजायत घेतले मात्र बऱ्याच कंपनीचे धान उगवले नसल्याच्या तक्रारी पंचायत समितीला दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बरीच शेती पऱ्हे नसल्याने पडीत राहणार आहे. तालूका कृषी अधिकारी यांनी शेतावर जावून पंचनामा करुन संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना एकूण खरीप हंगामाचे उत्पादन घेण्यात यावे अन्यथा त्या कंपनीला तालूक्यात प्रवेश करु देणार नाही. - तोमेश्वर पंचभाई, पं.स. सदस्य पवनी