शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

धानाचे चुकारे केव्हा मिळणार?

By admin | Updated: July 15, 2016 00:49 IST

पवनी तालुक्या उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाचे ५ कोटी ८५ लाख १० हजार ५४२ रुपयांचे चुकारे अडल्याने

शेतकरी सावकाराच्या द्वारी : तोमेश्वर पंचभाई यांची मागणी चिचाळ : पवनी तालुक्या उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाचे ५ कोटी ८५ लाख १० हजार ५४२ रुपयांचे चुकारे अडल्याने शेतकरी खरीप हंगामासाठी मोठ्या संकटात सापडला असून हंगामाला पैसे आणावयाचे कुढून, रोवणीसाठी व्याजाने पैसे काढण्याची पाळी शेतकऱ्यावर आली आहे. शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला आहे. शासनाने तात्काळ शेतकऱ्यांचे शिल्लक चुकारे देण्याची मागणी पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे. पवनी तालुक्यातील काळी कसदार जमीनीने या भागाला चौरास म्हणून ओळख आहे. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे. असे शेतकरी खरीप हंगामातील शेतीला येणारा खर्च हा उदात्त हेतू ठेवून व्याजाने रक्कम काढून उन्हाळी धान उत्पादन घेतो. मात्र दोन तीन वर्षापासून रब्बी, खरीप व उन्हाळी हंगामात पिकाच्या उत्पादनात घट होत आहे. शेतकऱ्यांच्या शेती व्यवसाय संकाटत आलेला आहे. शेतकरी नागावला जात आहे. शेतकऱ्यांची निसर्गाच्या पावसाने व शासनानेही थट्टा केली आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. शेतकऱ्यांचे उन्हाळी धान हंगामाचे ६ कोटी रुपये अडून आहेत. खरीप हंगाम तोंडावर आहे. खरीप हंगामाच्या धानपिकाच्या रोवणीसाठी कुणाकडे हात पसरावे असा सवाल शेतकरी करीत आहेत. आपलेच पैसे असूनही शासन उन्हाळी हंगामातील धान चुकारे का देत नाही? यालाच म्हणायचे का शेतकऱ्यांचे अच्छे दिन असा प्रश्न उपस्थित होत आहे. पवनी तालुक्यात ३६,३४२ क्विं. धान खरेदी झाली यामध्ये चिचाळ ३६५६.८० क्विंटल, पवनी ७६५२.८० क्विं., आसगाव १३०७५.८. क्विं, कोंढा ८५८८ क्विं., धानाची खरेदी करण्यात आली. सदर आधरभूत केंद्राकडून ६ जुलैपर्यंत चुकारे मिळतील असे सांगितले असले तरी अद्याप चुकारे न मिळाल्याने धान विक्री करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले ओहत. व कर्जाचे व्याज वाढतच आहे. आधीच नापीकी वेळेवर चुकारे नाही स्वत:चा माल स्वत:च चोर अशा कैचीत शेतकरी सापडला आहे. मात्र निवडणूकीच्या वेळी विकासाचे तुनतुने वाजविणारे पुढारी मात्र शेतकऱ्यांसाठी आवाजा का उढवत नाही असा प्रश्न सुज्ञ नागरिक करीत आहेत. जगाच्या पोशिंदाचे शासन चुकारे अडवून बसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला आहे. मात्र शेतकऱ्याचे आंदोलने, उपोषणे, मोच्र काढून ढेंगा मिरविणारे पुढारी मात्र गप्प का असा प्रश्न सुज्ञ शेतकरी करीत आहेत. शासनाने तात्काळ शेतकऱ्यांचे चुकारे दयावे अशी मागणी पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे. तालूक्यात पहिलेच शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला असताना व धानाचे चुकारे झाले नसल्याने शेतकऱ्यांनी व्याजी रक्कम घेऊन धान बिजायत घेतले मात्र बऱ्याच कंपनीचे धान उगवले नसल्याच्या तक्रारी पंचायत समितीला दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बरीच शेती पऱ्हे नसल्याने पडीत राहणार आहे. तालूका कृषी अधिकारी यांनी शेतावर जावून पंचनामा करुन संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना एकूण खरीप हंगामाचे उत्पादन घेण्यात यावे अन्यथा त्या कंपनीला तालूक्यात प्रवेश करु देणार नाही. - तोमेश्वर पंचभाई, पं.स. सदस्य पवनी