शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

धानाचे चुकारे केव्हा मिळणार?

By admin | Updated: July 15, 2016 00:49 IST

पवनी तालुक्या उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाचे ५ कोटी ८५ लाख १० हजार ५४२ रुपयांचे चुकारे अडल्याने

शेतकरी सावकाराच्या द्वारी : तोमेश्वर पंचभाई यांची मागणी चिचाळ : पवनी तालुक्या उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाचे ५ कोटी ८५ लाख १० हजार ५४२ रुपयांचे चुकारे अडल्याने शेतकरी खरीप हंगामासाठी मोठ्या संकटात सापडला असून हंगामाला पैसे आणावयाचे कुढून, रोवणीसाठी व्याजाने पैसे काढण्याची पाळी शेतकऱ्यावर आली आहे. शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला आहे. शासनाने तात्काळ शेतकऱ्यांचे शिल्लक चुकारे देण्याची मागणी पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे. पवनी तालुक्यातील काळी कसदार जमीनीने या भागाला चौरास म्हणून ओळख आहे. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे. असे शेतकरी खरीप हंगामातील शेतीला येणारा खर्च हा उदात्त हेतू ठेवून व्याजाने रक्कम काढून उन्हाळी धान उत्पादन घेतो. मात्र दोन तीन वर्षापासून रब्बी, खरीप व उन्हाळी हंगामात पिकाच्या उत्पादनात घट होत आहे. शेतकऱ्यांच्या शेती व्यवसाय संकाटत आलेला आहे. शेतकरी नागावला जात आहे. शेतकऱ्यांची निसर्गाच्या पावसाने व शासनानेही थट्टा केली आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. शेतकऱ्यांचे उन्हाळी धान हंगामाचे ६ कोटी रुपये अडून आहेत. खरीप हंगाम तोंडावर आहे. खरीप हंगामाच्या धानपिकाच्या रोवणीसाठी कुणाकडे हात पसरावे असा सवाल शेतकरी करीत आहेत. आपलेच पैसे असूनही शासन उन्हाळी हंगामातील धान चुकारे का देत नाही? यालाच म्हणायचे का शेतकऱ्यांचे अच्छे दिन असा प्रश्न उपस्थित होत आहे. पवनी तालुक्यात ३६,३४२ क्विं. धान खरेदी झाली यामध्ये चिचाळ ३६५६.८० क्विंटल, पवनी ७६५२.८० क्विं., आसगाव १३०७५.८. क्विं, कोंढा ८५८८ क्विं., धानाची खरेदी करण्यात आली. सदर आधरभूत केंद्राकडून ६ जुलैपर्यंत चुकारे मिळतील असे सांगितले असले तरी अद्याप चुकारे न मिळाल्याने धान विक्री करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले ओहत. व कर्जाचे व्याज वाढतच आहे. आधीच नापीकी वेळेवर चुकारे नाही स्वत:चा माल स्वत:च चोर अशा कैचीत शेतकरी सापडला आहे. मात्र निवडणूकीच्या वेळी विकासाचे तुनतुने वाजविणारे पुढारी मात्र शेतकऱ्यांसाठी आवाजा का उढवत नाही असा प्रश्न सुज्ञ नागरिक करीत आहेत. जगाच्या पोशिंदाचे शासन चुकारे अडवून बसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला आहे. मात्र शेतकऱ्याचे आंदोलने, उपोषणे, मोच्र काढून ढेंगा मिरविणारे पुढारी मात्र गप्प का असा प्रश्न सुज्ञ शेतकरी करीत आहेत. शासनाने तात्काळ शेतकऱ्यांचे चुकारे दयावे अशी मागणी पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे. तालूक्यात पहिलेच शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला असताना व धानाचे चुकारे झाले नसल्याने शेतकऱ्यांनी व्याजी रक्कम घेऊन धान बिजायत घेतले मात्र बऱ्याच कंपनीचे धान उगवले नसल्याच्या तक्रारी पंचायत समितीला दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बरीच शेती पऱ्हे नसल्याने पडीत राहणार आहे. तालूका कृषी अधिकारी यांनी शेतावर जावून पंचनामा करुन संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना एकूण खरीप हंगामाचे उत्पादन घेण्यात यावे अन्यथा त्या कंपनीला तालूक्यात प्रवेश करु देणार नाही. - तोमेश्वर पंचभाई, पं.स. सदस्य पवनी