शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहनपर अनुदान केव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:55 IST

थकीत शेतकऱ्यांचे सुमारे १५० कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्ग शासन, प्रशासनावर नाराज आहे. शेतकऱ्याला ...

थकीत शेतकऱ्यांचे सुमारे १५० कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्ग शासन, प्रशासनावर नाराज आहे.

शेतकऱ्याला सन्मान देत त्याचा संपूर्ण कर्ज शासनाने माफ केले. त्यामुळे त्याला पुन्हा कर्ज मिळण्याची संधी उपलब्ध झाली. थकीत शेतकऱ्याने संधीचे सोने करत पुन्हा कर्ज उचलले. मात्र नियमित कर्जफेड करणारा शेतकरी आजही शासनाच्या उदासीन धोरणाचा बळी ठरलेला आहे. पीक विकून, घरचे दागदागिने गहाण ठेवून बँकेचे कर्जफेड केले. शासनाने दिलेल्या आश्वासनाचे चीज होईल, या आशेने उधारीवर, मित्रमंडळींकडून कर्ज फेडण्यासाठी रक्कम घेतली. बँकेचे संपूर्ण कर्ज फेड केले. कर्जमुक्ती प्रोत्साहनपर अनुदान आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर महाविकास आघाडीची वर्षपूर्ती झाली. वर्षपूर्तीचा कार्यक्रम धडाक्यात पार पडला. मात्र प्रामाणिक शेतकऱ्यांनी कर्जफेड करीत राज्याच्या तिजोरीला हातभार लावला.

आजही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. थकीत कर्जदारांना नव्याने कर्ज योजनेची संधी दिली आहे. त्यांनी नव्याने कर्जसुद्धा उचलले. परंतु ते कर्जफेड करतील, अशी अपेक्षा शासनाने करू नये. या योजनेतील बऱ्याच शेतकऱ्यांना कर्ज थकीतची सवय लागली आहे.

एकदा कर्ज उचलायचे, दहा-बारा वर्षे भरायचे नाही. पुढे येणारे सरकार निश्चितच कर्ज माफ करेलच अशी आशा निर्माण झाली आहे. यामुळे कर्ज थकीत ठेवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र प्रामाणिक शेतकरी आजही शासनाकडून दुर्लक्षित होत आहेत हे विशेष.