शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहनपर अनुदान केव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:55 IST

थकीत शेतकऱ्यांचे सुमारे १५० कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्ग शासन, प्रशासनावर नाराज आहे. शेतकऱ्याला ...

थकीत शेतकऱ्यांचे सुमारे १५० कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्ग शासन, प्रशासनावर नाराज आहे.

शेतकऱ्याला सन्मान देत त्याचा संपूर्ण कर्ज शासनाने माफ केले. त्यामुळे त्याला पुन्हा कर्ज मिळण्याची संधी उपलब्ध झाली. थकीत शेतकऱ्याने संधीचे सोने करत पुन्हा कर्ज उचलले. मात्र नियमित कर्जफेड करणारा शेतकरी आजही शासनाच्या उदासीन धोरणाचा बळी ठरलेला आहे. पीक विकून, घरचे दागदागिने गहाण ठेवून बँकेचे कर्जफेड केले. शासनाने दिलेल्या आश्वासनाचे चीज होईल, या आशेने उधारीवर, मित्रमंडळींकडून कर्ज फेडण्यासाठी रक्कम घेतली. बँकेचे संपूर्ण कर्ज फेड केले. कर्जमुक्ती प्रोत्साहनपर अनुदान आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर महाविकास आघाडीची वर्षपूर्ती झाली. वर्षपूर्तीचा कार्यक्रम धडाक्यात पार पडला. मात्र प्रामाणिक शेतकऱ्यांनी कर्जफेड करीत राज्याच्या तिजोरीला हातभार लावला.

आजही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. थकीत कर्जदारांना नव्याने कर्ज योजनेची संधी दिली आहे. त्यांनी नव्याने कर्जसुद्धा उचलले. परंतु ते कर्जफेड करतील, अशी अपेक्षा शासनाने करू नये. या योजनेतील बऱ्याच शेतकऱ्यांना कर्ज थकीतची सवय लागली आहे.

एकदा कर्ज उचलायचे, दहा-बारा वर्षे भरायचे नाही. पुढे येणारे सरकार निश्चितच कर्ज माफ करेलच अशी आशा निर्माण झाली आहे. यामुळे कर्ज थकीत ठेवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र प्रामाणिक शेतकरी आजही शासनाकडून दुर्लक्षित होत आहेत हे विशेष.