शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहनपर अनुदान केव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:55 IST

थकीत शेतकऱ्यांचे सुमारे १५० कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्ग शासन, प्रशासनावर नाराज आहे. शेतकऱ्याला ...

थकीत शेतकऱ्यांचे सुमारे १५० कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्ग शासन, प्रशासनावर नाराज आहे.

शेतकऱ्याला सन्मान देत त्याचा संपूर्ण कर्ज शासनाने माफ केले. त्यामुळे त्याला पुन्हा कर्ज मिळण्याची संधी उपलब्ध झाली. थकीत शेतकऱ्याने संधीचे सोने करत पुन्हा कर्ज उचलले. मात्र नियमित कर्जफेड करणारा शेतकरी आजही शासनाच्या उदासीन धोरणाचा बळी ठरलेला आहे. पीक विकून, घरचे दागदागिने गहाण ठेवून बँकेचे कर्जफेड केले. शासनाने दिलेल्या आश्वासनाचे चीज होईल, या आशेने उधारीवर, मित्रमंडळींकडून कर्ज फेडण्यासाठी रक्कम घेतली. बँकेचे संपूर्ण कर्ज फेड केले. कर्जमुक्ती प्रोत्साहनपर अनुदान आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर महाविकास आघाडीची वर्षपूर्ती झाली. वर्षपूर्तीचा कार्यक्रम धडाक्यात पार पडला. मात्र प्रामाणिक शेतकऱ्यांनी कर्जफेड करीत राज्याच्या तिजोरीला हातभार लावला.

आजही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. थकीत कर्जदारांना नव्याने कर्ज योजनेची संधी दिली आहे. त्यांनी नव्याने कर्जसुद्धा उचलले. परंतु ते कर्जफेड करतील, अशी अपेक्षा शासनाने करू नये. या योजनेतील बऱ्याच शेतकऱ्यांना कर्ज थकीतची सवय लागली आहे.

एकदा कर्ज उचलायचे, दहा-बारा वर्षे भरायचे नाही. पुढे येणारे सरकार निश्चितच कर्ज माफ करेलच अशी आशा निर्माण झाली आहे. यामुळे कर्ज थकीत ठेवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र प्रामाणिक शेतकरी आजही शासनाकडून दुर्लक्षित होत आहेत हे विशेष.