शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
4
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
5
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
6
"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
7
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
8
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
9
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
10
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
11
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
12
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
13
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
14
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
15
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
16
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
17
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
18
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
19
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
20
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कमकासूरवासीयांची घर वापसी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 21:58 IST

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पुनर्वसन गाव रामपुर येथे मुलभूत सोयींच्या अभावामुळे आदिवासी यांनी ५ आॅक्टोंबर रोजी पुनर्वसित गाव सोडून त्यांच्या मुळ गावी कमकासुरात परतले. तिथे भयावह जंगल झुडपे, खितपत असलेल्या चिखलातच तंबू ठोकून संसार मांडला असताना थंडीचा कडाकाही वाढला आहे. परिणामी आदिवासी यांना मरणयातना भोगत असताना बोचºया थंडीत ...

ठळक मुद्देबोचºया थंडीत आदिवासी भोगतायेत मरणयातना : गावाला भेट देण्यासाठी पदाधिकारी अधिकाºयांकडे वेळ नाही

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पुनर्वसन गाव रामपुर येथे मुलभूत सोयींच्या अभावामुळे आदिवासी यांनी ५ आॅक्टोंबर रोजी पुनर्वसित गाव सोडून त्यांच्या मुळ गावी कमकासुरात परतले. तिथे भयावह जंगल झुडपे, खितपत असलेल्या चिखलातच तंबू ठोकून संसार मांडला असताना थंडीचा कडाकाही वाढला आहे. परिणामी आदिवासी यांना मरणयातना भोगत असताना बोचºया थंडीत जीवन जगने असह्य झाले आहे.आदिवासी यांनी पुनर्वसित गाव सोडून आज २५ दिवसांचा कालावधी लोटला परंतू अजुनपर्यंत त्यांच्या समस्यावर तोडगाच निघाला नसल्याने कमकासुर वासियांची घर वापसी कधी होणार, हे प्रश्न अजुनही अनुत्तरीयच आहे.महत्वाकांशी बावनथडी सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाºया कमकासुर येथील आदिवासी यांना बंदुकी धाकावर गावातून हाकलन लावण्यात आले होते. त्यांचे पुनर्वसन रामपुर येथे करण्यात आले. मात्र गेल्या पाच वर्षापासून पुनवर्सित गावात १८ नागरी सुविधा, मुलभूत सुविधांचा तिथे वनवा होता. अनेकदा मागणी, निवेदन देवूनही समस्या सुटल्या नाहीत. परिणामी आदिवासींनी पुनर्वसन गाव सोडून मुळ गावी परतले. कमकासुर हे बुडीत गाव असल्याने त्या ठिकाणी झुडपे तयार होवून दलदल निर्माण झाले आहे.चहुबाजूने घनदाट जंगल असून त्याठिकाणी हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. एकंदरीत तिथे मानवी वस्ती होवू शकत नाही. अशाही परिस्थितीत कमकासूर येथील आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी तंबू उभारून संसार थाटला आहे. मानवाला मिळणाºया मुलभूत सोयी अभावी तिथे मरण्यापेक्षा स्वगावी मरणे पसंद करू, आधी सोयी सुविधा पुरवा नंतरच आमची घर वापसी होणार, अशी तटस्थ भूमिका आदिवासीयांनी घेतली आहे.आदिवासी कसे जीवन जगतात की मरतात याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे आतापर्यंत त्यांची साधी विचारपूस करण्याकरिता एकही आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकाºयांनीही ढूंकून पाहिले नाही.केवळ आश्वासनाची खैरात वाटत आमच्याकडे वेळ नाही असे सांगितल्याने आदिवासी यात शासन प्रशासना विरोधात रोष आहे. एकीकडे तालुक्यात आरोग्य महाशिबिराचे आयोजन होत असताना दुसरीकडे कमकासुरातील आदीवासी बांधवांना भेट द्यायला मंत्री तथा अधिकाºयांना वेळ मिळणार काय. असा सवालही प्रकल्पग्रस्त विचारीत आहेत. शासन व प्रशासनाच्या संवेदनाच हरविल्याचे जाणवत आहे.कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मोठ मोठे नेते तुमसरात येत आहेत. तिथून जर थोडा सामोर आले व आम्हाला दिलासा दिला तर आमचे कुटूंब मरण यातनेच्या कचाट्यातून बाहेर पडतील. परंतू काही स्वार्थसाधू नेत्यामुळे ते होणे शक्य दिसत नाही.-किशार उईके, सरपंच कमकासूर.