शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कमकासूरवासीयांची घर वापसी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 21:58 IST

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पुनर्वसन गाव रामपुर येथे मुलभूत सोयींच्या अभावामुळे आदिवासी यांनी ५ आॅक्टोंबर रोजी पुनर्वसित गाव सोडून त्यांच्या मुळ गावी कमकासुरात परतले. तिथे भयावह जंगल झुडपे, खितपत असलेल्या चिखलातच तंबू ठोकून संसार मांडला असताना थंडीचा कडाकाही वाढला आहे. परिणामी आदिवासी यांना मरणयातना भोगत असताना बोचºया थंडीत ...

ठळक मुद्देबोचºया थंडीत आदिवासी भोगतायेत मरणयातना : गावाला भेट देण्यासाठी पदाधिकारी अधिकाºयांकडे वेळ नाही

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पुनर्वसन गाव रामपुर येथे मुलभूत सोयींच्या अभावामुळे आदिवासी यांनी ५ आॅक्टोंबर रोजी पुनर्वसित गाव सोडून त्यांच्या मुळ गावी कमकासुरात परतले. तिथे भयावह जंगल झुडपे, खितपत असलेल्या चिखलातच तंबू ठोकून संसार मांडला असताना थंडीचा कडाकाही वाढला आहे. परिणामी आदिवासी यांना मरणयातना भोगत असताना बोचºया थंडीत जीवन जगने असह्य झाले आहे.आदिवासी यांनी पुनर्वसित गाव सोडून आज २५ दिवसांचा कालावधी लोटला परंतू अजुनपर्यंत त्यांच्या समस्यावर तोडगाच निघाला नसल्याने कमकासुर वासियांची घर वापसी कधी होणार, हे प्रश्न अजुनही अनुत्तरीयच आहे.महत्वाकांशी बावनथडी सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाºया कमकासुर येथील आदिवासी यांना बंदुकी धाकावर गावातून हाकलन लावण्यात आले होते. त्यांचे पुनर्वसन रामपुर येथे करण्यात आले. मात्र गेल्या पाच वर्षापासून पुनवर्सित गावात १८ नागरी सुविधा, मुलभूत सुविधांचा तिथे वनवा होता. अनेकदा मागणी, निवेदन देवूनही समस्या सुटल्या नाहीत. परिणामी आदिवासींनी पुनर्वसन गाव सोडून मुळ गावी परतले. कमकासुर हे बुडीत गाव असल्याने त्या ठिकाणी झुडपे तयार होवून दलदल निर्माण झाले आहे.चहुबाजूने घनदाट जंगल असून त्याठिकाणी हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. एकंदरीत तिथे मानवी वस्ती होवू शकत नाही. अशाही परिस्थितीत कमकासूर येथील आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी तंबू उभारून संसार थाटला आहे. मानवाला मिळणाºया मुलभूत सोयी अभावी तिथे मरण्यापेक्षा स्वगावी मरणे पसंद करू, आधी सोयी सुविधा पुरवा नंतरच आमची घर वापसी होणार, अशी तटस्थ भूमिका आदिवासीयांनी घेतली आहे.आदिवासी कसे जीवन जगतात की मरतात याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे आतापर्यंत त्यांची साधी विचारपूस करण्याकरिता एकही आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकाºयांनीही ढूंकून पाहिले नाही.केवळ आश्वासनाची खैरात वाटत आमच्याकडे वेळ नाही असे सांगितल्याने आदिवासी यात शासन प्रशासना विरोधात रोष आहे. एकीकडे तालुक्यात आरोग्य महाशिबिराचे आयोजन होत असताना दुसरीकडे कमकासुरातील आदीवासी बांधवांना भेट द्यायला मंत्री तथा अधिकाºयांना वेळ मिळणार काय. असा सवालही प्रकल्पग्रस्त विचारीत आहेत. शासन व प्रशासनाच्या संवेदनाच हरविल्याचे जाणवत आहे.कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मोठ मोठे नेते तुमसरात येत आहेत. तिथून जर थोडा सामोर आले व आम्हाला दिलासा दिला तर आमचे कुटूंब मरण यातनेच्या कचाट्यातून बाहेर पडतील. परंतू काही स्वार्थसाधू नेत्यामुळे ते होणे शक्य दिसत नाही.-किशार उईके, सरपंच कमकासूर.