शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

कमकासूरवासीयांची घर वापसी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 21:58 IST

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पुनर्वसन गाव रामपुर येथे मुलभूत सोयींच्या अभावामुळे आदिवासी यांनी ५ आॅक्टोंबर रोजी पुनर्वसित गाव सोडून त्यांच्या मुळ गावी कमकासुरात परतले. तिथे भयावह जंगल झुडपे, खितपत असलेल्या चिखलातच तंबू ठोकून संसार मांडला असताना थंडीचा कडाकाही वाढला आहे. परिणामी आदिवासी यांना मरणयातना भोगत असताना बोचºया थंडीत ...

ठळक मुद्देबोचºया थंडीत आदिवासी भोगतायेत मरणयातना : गावाला भेट देण्यासाठी पदाधिकारी अधिकाºयांकडे वेळ नाही

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पुनर्वसन गाव रामपुर येथे मुलभूत सोयींच्या अभावामुळे आदिवासी यांनी ५ आॅक्टोंबर रोजी पुनर्वसित गाव सोडून त्यांच्या मुळ गावी कमकासुरात परतले. तिथे भयावह जंगल झुडपे, खितपत असलेल्या चिखलातच तंबू ठोकून संसार मांडला असताना थंडीचा कडाकाही वाढला आहे. परिणामी आदिवासी यांना मरणयातना भोगत असताना बोचºया थंडीत जीवन जगने असह्य झाले आहे.आदिवासी यांनी पुनर्वसित गाव सोडून आज २५ दिवसांचा कालावधी लोटला परंतू अजुनपर्यंत त्यांच्या समस्यावर तोडगाच निघाला नसल्याने कमकासुर वासियांची घर वापसी कधी होणार, हे प्रश्न अजुनही अनुत्तरीयच आहे.महत्वाकांशी बावनथडी सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाºया कमकासुर येथील आदिवासी यांना बंदुकी धाकावर गावातून हाकलन लावण्यात आले होते. त्यांचे पुनर्वसन रामपुर येथे करण्यात आले. मात्र गेल्या पाच वर्षापासून पुनवर्सित गावात १८ नागरी सुविधा, मुलभूत सुविधांचा तिथे वनवा होता. अनेकदा मागणी, निवेदन देवूनही समस्या सुटल्या नाहीत. परिणामी आदिवासींनी पुनर्वसन गाव सोडून मुळ गावी परतले. कमकासुर हे बुडीत गाव असल्याने त्या ठिकाणी झुडपे तयार होवून दलदल निर्माण झाले आहे.चहुबाजूने घनदाट जंगल असून त्याठिकाणी हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. एकंदरीत तिथे मानवी वस्ती होवू शकत नाही. अशाही परिस्थितीत कमकासूर येथील आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी तंबू उभारून संसार थाटला आहे. मानवाला मिळणाºया मुलभूत सोयी अभावी तिथे मरण्यापेक्षा स्वगावी मरणे पसंद करू, आधी सोयी सुविधा पुरवा नंतरच आमची घर वापसी होणार, अशी तटस्थ भूमिका आदिवासीयांनी घेतली आहे.आदिवासी कसे जीवन जगतात की मरतात याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे आतापर्यंत त्यांची साधी विचारपूस करण्याकरिता एकही आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकाºयांनीही ढूंकून पाहिले नाही.केवळ आश्वासनाची खैरात वाटत आमच्याकडे वेळ नाही असे सांगितल्याने आदिवासी यात शासन प्रशासना विरोधात रोष आहे. एकीकडे तालुक्यात आरोग्य महाशिबिराचे आयोजन होत असताना दुसरीकडे कमकासुरातील आदीवासी बांधवांना भेट द्यायला मंत्री तथा अधिकाºयांना वेळ मिळणार काय. असा सवालही प्रकल्पग्रस्त विचारीत आहेत. शासन व प्रशासनाच्या संवेदनाच हरविल्याचे जाणवत आहे.कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मोठ मोठे नेते तुमसरात येत आहेत. तिथून जर थोडा सामोर आले व आम्हाला दिलासा दिला तर आमचे कुटूंब मरण यातनेच्या कचाट्यातून बाहेर पडतील. परंतू काही स्वार्थसाधू नेत्यामुळे ते होणे शक्य दिसत नाही.-किशार उईके, सरपंच कमकासूर.