शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
4
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
5
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
6
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
7
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
8
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
9
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
10
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
11
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
12
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
13
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
14
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
15
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
16
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
17
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
18
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
19
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
20
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

चौरास भागातील धान उत्पादक शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 24, 2015 00:18 IST

भंडारा जिल्हयातील चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या पवनी तालुक्यात धानाचे पिक मुख्य असून येथे खरीब हंगामात तसेच उन्हाळी धानाचे पिक मोठ्या प्रमाणात होते.

कोंढा (कोसरा) : भंडारा जिल्हयातील चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या पवनी तालुक्यात धानाचे पिक मुख्य असून येथे खरीब हंगामात तसेच उन्हाळी धानाचे पिक मोठ्या प्रमाणात होते. शेतकरी दिवसरात्र काबाडकष्ट करुन धानाचे उत्पादन घेतो. पंरतु शेतकऱ्यांच्या धानाला भावच नाही. शेतकऱ्यांचे धान घरी पडून आहे. त्यांना भाववाढीची प्रतिक्षा आहे.अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना धान अल्पदरात विकले ते देखिल शेतकऱ्यांचे पैसे देत नाही. कारण त्यांनी धानाची मिलिंग करुन तांदूळ बनविले. तांदूळाला भाव नाही. व्यापाऱ्यांनी तांदूळाचे भाव नसल्याने माल मिलामध्ये भरुन ठेवले आहे. त्यामुळे सध्या चौरास भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. व्यापारी धानाचे पैसे देत नाही. त्यामुळे बँक, सोसायटी यांचे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. मार्च अखेर सर्व बँक, सोसायटी शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यासाठी कर्ज भरण्यास सांगत असतात. तेव्हा शेतकरी व्याज सवलत घेण्यासाठी शेतातील धान्याचे पैसे मिळावे म्हणून व्यापाऱ्याकडे धान्याचे पैसे मागण्याचा तकादा लावत आहेत. पण त्यांना खाली हाताने परत जावे लागते.मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आज ना उद्या धानाला भाव मिळेल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी धान घरी भरुन ठेवले आहेत. तर कर्जबाजारी गरजवंत शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात धान विक्री करुन देखील त्यांना त्यांचे पैसे व्यापारी देत नाही. सध्या व्यापारी शेतकऱ्यांना धानाचे भाव नाही म्हणून आपले धान परत घेऊन जा? असे देखिल म्हणत आहेत. चौरास भागात धान खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांना फक्त १ हजार रुपये देऊन धानाचा सौदा करतात व धानाची उचल करतात नंतर चुकारे देतात. अशा संकटात शेतकरी सापडला आहे. मातीमोल भावात धान दिले तरी चुकारे व्यापारी देत नाही. अशी अवस्था आहे.शेतकऱ्यांनी बँक, सोसायटी तसेच काहीनी खासगी सावकारांचे कर्ज घेतले आहे ते कर्ज वसुलीचा तगादा लावत आहेत. मार्च, एप्रील महिण्यात उपवर मुलामुलींचे विवाह, कौटुंबिक खर्च, मुलाच्या शिक्षणाचा खर्च आदी खर्च कोठून करावे असा मोठा शेतकऱ्यासमोर आहे. रब्बी पिकाचे देखिल चौरास भागात शेतकऱ्यांचे प्रचड नुकसान झाले आहे. गहू, उळीद, मूंग अवकाळी पाऊसात सापडले त्यामुळे रब्बी पिकांना देखील योग्य भाव मिळत नाही. अशावेळी शेतकऱ्यांना सर्व खर्चाला कंटाळून आयुष्य संपवित असते. लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. शासन धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवू शकत नाही. अशी मानसिकता तयार झाली आहे. धानाचे दर वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करीत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी मोठी या सरकारने निराश दिली आहे. (वार्ताहर)