शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चौरास भागातील धान उत्पादक शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 24, 2015 00:18 IST

भंडारा जिल्हयातील चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या पवनी तालुक्यात धानाचे पिक मुख्य असून येथे खरीब हंगामात तसेच उन्हाळी धानाचे पिक मोठ्या प्रमाणात होते.

कोंढा (कोसरा) : भंडारा जिल्हयातील चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या पवनी तालुक्यात धानाचे पिक मुख्य असून येथे खरीब हंगामात तसेच उन्हाळी धानाचे पिक मोठ्या प्रमाणात होते. शेतकरी दिवसरात्र काबाडकष्ट करुन धानाचे उत्पादन घेतो. पंरतु शेतकऱ्यांच्या धानाला भावच नाही. शेतकऱ्यांचे धान घरी पडून आहे. त्यांना भाववाढीची प्रतिक्षा आहे.अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना धान अल्पदरात विकले ते देखिल शेतकऱ्यांचे पैसे देत नाही. कारण त्यांनी धानाची मिलिंग करुन तांदूळ बनविले. तांदूळाला भाव नाही. व्यापाऱ्यांनी तांदूळाचे भाव नसल्याने माल मिलामध्ये भरुन ठेवले आहे. त्यामुळे सध्या चौरास भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. व्यापारी धानाचे पैसे देत नाही. त्यामुळे बँक, सोसायटी यांचे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. मार्च अखेर सर्व बँक, सोसायटी शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यासाठी कर्ज भरण्यास सांगत असतात. तेव्हा शेतकरी व्याज सवलत घेण्यासाठी शेतातील धान्याचे पैसे मिळावे म्हणून व्यापाऱ्याकडे धान्याचे पैसे मागण्याचा तकादा लावत आहेत. पण त्यांना खाली हाताने परत जावे लागते.मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आज ना उद्या धानाला भाव मिळेल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी धान घरी भरुन ठेवले आहेत. तर कर्जबाजारी गरजवंत शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात धान विक्री करुन देखील त्यांना त्यांचे पैसे व्यापारी देत नाही. सध्या व्यापारी शेतकऱ्यांना धानाचे भाव नाही म्हणून आपले धान परत घेऊन जा? असे देखिल म्हणत आहेत. चौरास भागात धान खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांना फक्त १ हजार रुपये देऊन धानाचा सौदा करतात व धानाची उचल करतात नंतर चुकारे देतात. अशा संकटात शेतकरी सापडला आहे. मातीमोल भावात धान दिले तरी चुकारे व्यापारी देत नाही. अशी अवस्था आहे.शेतकऱ्यांनी बँक, सोसायटी तसेच काहीनी खासगी सावकारांचे कर्ज घेतले आहे ते कर्ज वसुलीचा तगादा लावत आहेत. मार्च, एप्रील महिण्यात उपवर मुलामुलींचे विवाह, कौटुंबिक खर्च, मुलाच्या शिक्षणाचा खर्च आदी खर्च कोठून करावे असा मोठा शेतकऱ्यासमोर आहे. रब्बी पिकाचे देखिल चौरास भागात शेतकऱ्यांचे प्रचड नुकसान झाले आहे. गहू, उळीद, मूंग अवकाळी पाऊसात सापडले त्यामुळे रब्बी पिकांना देखील योग्य भाव मिळत नाही. अशावेळी शेतकऱ्यांना सर्व खर्चाला कंटाळून आयुष्य संपवित असते. लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. शासन धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवू शकत नाही. अशी मानसिकता तयार झाली आहे. धानाचे दर वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करीत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी मोठी या सरकारने निराश दिली आहे. (वार्ताहर)