शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात, तर विद्यार्थी, पालक संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:39 IST

भंडारा : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी दहावीच्या परीक्षांप्रमाणेच बारावीच्या परीक्षाही रद्द कराव्यात की नाही, याबाबत विचारमंथन ...

भंडारा : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी दहावीच्या परीक्षांप्रमाणेच बारावीच्या परीक्षाही रद्द कराव्यात की नाही, याबाबत विचारमंथन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर जर परीक्षा घेतल्या नाहीत तर पर्याय काय, यावर शासन विचार करीत आहे; परंतु या दुहेरी भूमिकेच्या कचाट्यात विद्यार्थी व पालक सापडले आहेत. येत्या दोन-चार दिवसांत यावर निर्णय घेण्यात येणार असला तरी अनेक पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

उल्लेखनीय म्हणजे बहुतांश राज्ये परीक्षा घ्याव्यात याच भूमिकेत आहेत. मात्र, परीक्षा मंडळ, तज्ज्ञ मंडळी व विद्यार्थी-पालकांच्या सूचनेवरूनच शासन निर्णय घेणार असल्याचे समजते.

भंडारा जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला १५ हजार ५१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी मुलांची संख्या ७,७३० एवढी असून, मुलींची संख्या ७,७८० इतकी आहे. विज्ञान, कला वाणिज्य, टेक्निकल सायन्स व व्होकेशनल या शाखांतून विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. एक वेळा परीक्षा रद्द झाल्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून इयत्ता बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. मात्र, संकट काळामुळे त्यावरही संभ्रम निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे तज्ज्ञांमधून विद्यार्थ्यांना स्वाध्याय, ऑनलाइन परीक्षा किंवा दहावीच्या पार्श्वभूमीवर गुणांकन पद्धतीने किंवा इयत्ता बारावी इंटरनल गुणांच्या आधारे मार्कलिस्ट द्यावी, असा सूर व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयाच्या शैक्षणिक प्रगतीविषयी विषय शिक्षकांना माहिती असते. विशेष शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून प्राचार्यांच्या

स्वाक्षरीनिशी गुणपत्रिका बोर्डाकडे पाठवावी. गुणांकनासाठी दहावीचा आधार घेता येईल. प्रत्येकाला ग्रेड दिल्यास पुढील प्रवेशासाठी गुणांची अडचण नाही.

-संजय आयलवार,

सेवानिवृत्त, विभागीय सहायक सचिव.

इयत्ता बारावीची परीक्षा होणे महत्त्वाची बाब आहे; परंतु परीक्षा होत नसतील तर शालेय इंटरनल गुणांच्या पद्धतीने गुणपत्रिका देता येईल. स्वाध्याय किंवा ऑब्जेक्टिव्हरहित प्रश्नांच्या आधारे ऑनलाइन परीक्षा घेता येऊ शकते. परीक्षा होत नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांचा हिरमोड होऊ शकतो.

- केशर बोकडे, प्राचार्य

लाल बहादूर शास्त्री विद्यालय, भंडारा

परीक्षेला पर्याय नाही. परीक्षा व्हायलाच पाहिजेत. मात्र, पर्यायांचा विचार केल्यास ऑनलाइन किंवा स्वाध्याय अध्ययनाचा विचार करावा. हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थी मागे पडू नयेत, याचाही विचार करावा.

- अशोक पारधी,

कार्याध्यक्ष, विदर्भ मुख्याध्यापक संघटना.

गुणांकन पद्धतीचा विचार केला जात असेल तर हुशार विद्यार्थ्यांची गुणवत्ता अन्य विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतच मोजली जाणार काय, असा सवाल उपस्थित होऊ शकतो. वर्षभर अभ्यास, मेहनत केल्यावर परीक्षा होत नसतील तर आमच्या अभ्यासाचे फलित काय होणार, असा प्रश्न पडतो. यावर विचार व्हायला हवा.

- प्राजक्ता शेंडे, विद्यार्थिनी.

वर्षभर स्वाध्याय, काही काळ खाजगी ट्यूशन व शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. अशा स्थितीत ऐनवेळी तेही दुसरी वेळ परीक्षा रद्द होत असेल, तर ही आमच्यासाठी निराशाजनक बाब आहे. आम्ही कोणत्या विषयात पक्के आहोत, हे आम्हाला परीक्षेतूनच कळू शकते. त्यावरून पुढच्या क्षेत्रात पाऊल ठेवता येईल.

- सुहास खोब्रागडे, विद्यार्थी.

महिनाभरापूर्वी परीक्षा होणार होत्या. कोरोना महामारीमुळे आता परीक्षेऐवजी पर्यायांचा विचार सुरू आहे. नेमके काय होणार आहे, याबाबत आम्ही संभ्रमात आहोत. परीक्षा मंडळ वेळेवर निर्णय घेत असेल तर आमच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्हच आहे. समोर काय होणार, याची कल्पना काय करावी, हेच सुचेनासे झाले आहे.

- रिद्धी बारसागडे, विद्यार्थिनी.