शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

लग्न सराईत वऱ्हाड्यांना उन्हाच्या झळा

By admin | Updated: May 14, 2015 00:28 IST

लग्नसराईच्या हंगामात वातावरणाच्या लहरीपणाचा फटका नागरिकाना बसत आहे.

नागरिक त्रस्त : मुहूर्तावर लग्न लागत नसल्याने बच्चे कंपनींना फटका, समारंभावर विरजणलाखनी : लग्नसराईच्या हंगामात वातावरणाच्या लहरीपणाचा फटका नागरिकाना बसत आहे. दिवसभर रखरखते उन्ह तर संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वातावरणातील बदलामुळे लग्न घरी ऐनवेळेवर धावपळ सुरू होत आहे. हवामानाचा अंदाज लावता येत नसल्यामुळे मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदल व उन्हाच्या झळांचा फटका वऱ्हाड्यांना बसत आहे. सध्या लग्न समारंभाचा हंगाम जोरात सुरु आहे. दरवर्षी एप्रिल, मे व जून या तिन्ही महिन्यात लग्नसराईची धूम असते. उन्हाळ्याच्या दिवसात पाहूणेमंडळीची सोय चांगल्या प्रकारे करता येते. उन्हाळ्याच्या दिवसात शेतकरीही निवांत असतात. त्यामुळे पूर्वीपासून ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात लग्न समारंभ ठेवण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे सामाजिक हालचालीवरदेखील याचा परिणाम पडत असल्याचाच प्रत्यय येत आहे. सकाळपासून निरभ्र असणाऱ्या आकाशात सायंकाळी दाट ढग दाटून येत आहेत. ऐन वेळेवर दररोज सायंकाळी वादळी वाऱ्याचा सामना करावा लागत आहे. विवाह कार्यक्रम असलेल्या घरी तर चांगलीच तारांबळ उडत आहे.सकाळच्या मुहूर्तावर असलेले लग्नसमारंभ सुरळीत चालत असले तरी सायंकाळच्या कार्यक्रमासाठी देवापुढे नतमस्तक होण्याची वेळ येत आहे. हजारो रुपये खर्च करून बँड, पाणीव्यवस्था, कपडे खरेदी आचारी साऊंड सिस्टीम आदी गोष्टीची जुळवाजुळव करण्याऱ्या वधूपित्याला डोक्यावर हात ठेवण्याची वेळ आली आहे. दिवसभर उन्हामुळे नागरीत त्रस्त आहेत तर सायंकाळी वाऱ्यामुळे तारांबळ उडत आहे. लग्नसराईचे दिवस असले तरी वातावरणातील बदलामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. निसर्ग व लग्न वऱ्हाड्यांमळे लग्न समारंभात विरजन पडत आहे. (तालुका प्रतिनिधी)उन्हाच्या तीव्रतेने त्वचेचे आजार वाढलेभंडारा : मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. संभाव्य आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. उन्हात फिरणे टाळावे, बाहेर जातांना डोक्याला रूमाल बांधून जावे आणि दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. ताप, सर्दी आणि डोके दुखीची लक्षणे दिसताच त्वरीत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.हवामानाचे चक्र पाहता उन्हाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने आहार, विहार, सेवन या सर्वच बाबतीत काही काळजी घेणे, पथ्ये पाळणे गरजेचे ठरत आहे. प्रामुख्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढते. पाण्याचे स्रोत कमकुवत होतात. पाणी योजना असूनही पुरेसे पाणी मिळत नाही. जे पाणी येते ते दूषित असल्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच पाण्याच्या पुरवठ्याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यात बाहेर पडतांना डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. तेव्हा गुलाब पाणी व काकडी लावावी जेणे करून डोळ्यांची दाहकता कमी होते. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने डोळे कोरडे पडणे, अँलर्जीचा परिणाम जास्त असतो. यासाठी डोळ्यांच्या संरक्षणासाठी सन गॉगल्स वापरावेत, बाहेरून आल्यावर डोळे थंड पाण्याने धुवावेत, तसेच उन्हाळ्यात उष्णतावर्धक पदार्थ खाणे टाळावेत, शीतपेयापेक्षा लिंबू सरबत, बडीशेपचे सरबत घ्यावे, माठातील पाणी प्यावे, पाणी गाळून प्यावे अशा सूचना तज्ज्ञांनी केल्या आहेत.