शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

लग्न सराईत वऱ्हाड्यांना उन्हाच्या झळा

By admin | Updated: May 14, 2015 00:28 IST

लग्नसराईच्या हंगामात वातावरणाच्या लहरीपणाचा फटका नागरिकाना बसत आहे.

नागरिक त्रस्त : मुहूर्तावर लग्न लागत नसल्याने बच्चे कंपनींना फटका, समारंभावर विरजणलाखनी : लग्नसराईच्या हंगामात वातावरणाच्या लहरीपणाचा फटका नागरिकाना बसत आहे. दिवसभर रखरखते उन्ह तर संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वातावरणातील बदलामुळे लग्न घरी ऐनवेळेवर धावपळ सुरू होत आहे. हवामानाचा अंदाज लावता येत नसल्यामुळे मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदल व उन्हाच्या झळांचा फटका वऱ्हाड्यांना बसत आहे. सध्या लग्न समारंभाचा हंगाम जोरात सुरु आहे. दरवर्षी एप्रिल, मे व जून या तिन्ही महिन्यात लग्नसराईची धूम असते. उन्हाळ्याच्या दिवसात पाहूणेमंडळीची सोय चांगल्या प्रकारे करता येते. उन्हाळ्याच्या दिवसात शेतकरीही निवांत असतात. त्यामुळे पूर्वीपासून ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात लग्न समारंभ ठेवण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे सामाजिक हालचालीवरदेखील याचा परिणाम पडत असल्याचाच प्रत्यय येत आहे. सकाळपासून निरभ्र असणाऱ्या आकाशात सायंकाळी दाट ढग दाटून येत आहेत. ऐन वेळेवर दररोज सायंकाळी वादळी वाऱ्याचा सामना करावा लागत आहे. विवाह कार्यक्रम असलेल्या घरी तर चांगलीच तारांबळ उडत आहे.सकाळच्या मुहूर्तावर असलेले लग्नसमारंभ सुरळीत चालत असले तरी सायंकाळच्या कार्यक्रमासाठी देवापुढे नतमस्तक होण्याची वेळ येत आहे. हजारो रुपये खर्च करून बँड, पाणीव्यवस्था, कपडे खरेदी आचारी साऊंड सिस्टीम आदी गोष्टीची जुळवाजुळव करण्याऱ्या वधूपित्याला डोक्यावर हात ठेवण्याची वेळ आली आहे. दिवसभर उन्हामुळे नागरीत त्रस्त आहेत तर सायंकाळी वाऱ्यामुळे तारांबळ उडत आहे. लग्नसराईचे दिवस असले तरी वातावरणातील बदलामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. निसर्ग व लग्न वऱ्हाड्यांमळे लग्न समारंभात विरजन पडत आहे. (तालुका प्रतिनिधी)उन्हाच्या तीव्रतेने त्वचेचे आजार वाढलेभंडारा : मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. संभाव्य आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. उन्हात फिरणे टाळावे, बाहेर जातांना डोक्याला रूमाल बांधून जावे आणि दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. ताप, सर्दी आणि डोके दुखीची लक्षणे दिसताच त्वरीत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.हवामानाचे चक्र पाहता उन्हाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने आहार, विहार, सेवन या सर्वच बाबतीत काही काळजी घेणे, पथ्ये पाळणे गरजेचे ठरत आहे. प्रामुख्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढते. पाण्याचे स्रोत कमकुवत होतात. पाणी योजना असूनही पुरेसे पाणी मिळत नाही. जे पाणी येते ते दूषित असल्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच पाण्याच्या पुरवठ्याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यात बाहेर पडतांना डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. तेव्हा गुलाब पाणी व काकडी लावावी जेणे करून डोळ्यांची दाहकता कमी होते. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने डोळे कोरडे पडणे, अँलर्जीचा परिणाम जास्त असतो. यासाठी डोळ्यांच्या संरक्षणासाठी सन गॉगल्स वापरावेत, बाहेरून आल्यावर डोळे थंड पाण्याने धुवावेत, तसेच उन्हाळ्यात उष्णतावर्धक पदार्थ खाणे टाळावेत, शीतपेयापेक्षा लिंबू सरबत, बडीशेपचे सरबत घ्यावे, माठातील पाणी प्यावे, पाणी गाळून प्यावे अशा सूचना तज्ज्ञांनी केल्या आहेत.