शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

पुरातन कलाकृती ऱ्हास होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: November 30, 2015 00:46 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास तीन ते चार दशक ग्रामीण भागातील मंडई मोठ्या जल्लोषात सुरू होत्या.

लाखनी : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास तीन ते चार दशक ग्रामीण भागातील मंडई मोठ्या जल्लोषात सुरू होत्या. नागरिकांना मंडईचे मोठे आकर्षण होते. अनेक नागरिक मनोरंजनाच्या साधनांचा उपयोग करून जनतेचे ध्यानाकर्षण करायचे. त्यातून त्यांना पैसे मिळत होते. ते पैसे म्हणजे बोजारा समजत होते. काळ बदलला, जुनी पिढी संपुष्ठात आली. मात्र त्यांची जागा नवीन पिढीने घेतली नाही. मनोरंजनात दिवसा पाच ते दहा लोकांचा समूह असायचा, त्याला दंडार म्हणत असायचे. एकेरी व्यक्ती विविध सोंग करायची, त्यांना बहुरुपी म्हणत होते. आज मात्र गावागावातील मंडई जोर असला तरी पुरातन कलाकृती ऱ्हास होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामीण भागात मंडईचे आयोजन हे विशेष आकर्षण होते. दिवाळीनंतर तिसऱ्या दिवसापासून गावागावात मंडई भरली जात होती. यात भावासाठी बहीण विविध सामान ओवाळणीकरिता घेत होती. आजसुद्धा ती प्रथा आहे. मात्र चार दशकापूर्वी मंडई म्हटल्यानंतर जे आकर्षण असायचे ते आता राहिले नाही. पोवाडा, गणगवळन, टाहारा जो लाकडी असायचा त्याच्यावर एकमेव साधान घालायचे. तुणतुणा वाजायचा, ढोलकी मास्टर आपल्या विशिष्ट शैलीत पाय मटकवून ढोलकीवर दोन्ही बाजूला थाप घालायचा. त्यामुळे ढोलकीच्या तालावर तुणतुण्यााच्या नादाने भारुड, पोवाडा, गणगवळन यांचा तालासुरात आवाज निघायचा, ते गीत-संगीत मोहीत करणारे होते. एकापाठोपाठ समूहाने विविध वेशभुषा घालून लोक नाचायचे. पुरुष-स्त्रीचे वस्त्र परिधान करुन चेहऱ्याला सजवून या गणगवळनमध्ये नाचायचे. समोर सर्कशीतील जोकराप्रमाणे दोन व्यक्त आकर्षित करणारे लाकडी साहित्य घेवून त्याचा आवाज काढायचे. पुरातन काळातील छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव मस्तानी, प्रभु रामचंद्र, यांची गौरवगाथा मांडणारे शाहीर पोवाडे सादर करून सर्वांना मोहीत करायचे. मात्र आज ते सर्व लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. मंडईनिमित्त पूर्वी दंडार रात्री आयोजित केली जात होती. त्यावेळी एखादी नाट्यछटा सादर होत होती. हे सर्व नवीन पिढीला आज मान्य नाही. जुने ते सोने समजून त्यांना सहज स्विकारायला पाहिजे मात्र ते चित्र दिसत नाही. नवे ते हवे याच उद्देशाने नवीन पीढीने आपले मनोरंजनाचे साधन निवडले. आता नवीन पिढीला मोबाईल या वस्तुने आकर्षिक केले आहे. केवळ परंपरा सुरूएकंदरित आज ग्रामीण भागात मंडईचे आयोजन केले जाते, त्यामागे ती परंपरा कायम राहावी हाच उद्देश प्रामुख्याने दिसत आहे. सोबत मनोरंजनाकरिता आज गावागावात मंडईनिमित्त नाटकांचे आयोजन केले जाते. मात्र पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक नाटकांचा ऱ्हास झाला नाही. केवळ नावापुरती मंडई राहिली आहे. पुरातन कलाकृतीचा ऱ्हास झाला आहे, हे तेवढेच खरे.