शहरं
Join us  
Trending Stories
1
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
4
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
5
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
6
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
7
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
8
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
9
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
10
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
11
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
12
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
13
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
14
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
15
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
16
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
17
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
18
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
19
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
20
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना

पुरातन कलाकृती ऱ्हास होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: November 30, 2015 00:46 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास तीन ते चार दशक ग्रामीण भागातील मंडई मोठ्या जल्लोषात सुरू होत्या.

लाखनी : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास तीन ते चार दशक ग्रामीण भागातील मंडई मोठ्या जल्लोषात सुरू होत्या. नागरिकांना मंडईचे मोठे आकर्षण होते. अनेक नागरिक मनोरंजनाच्या साधनांचा उपयोग करून जनतेचे ध्यानाकर्षण करायचे. त्यातून त्यांना पैसे मिळत होते. ते पैसे म्हणजे बोजारा समजत होते. काळ बदलला, जुनी पिढी संपुष्ठात आली. मात्र त्यांची जागा नवीन पिढीने घेतली नाही. मनोरंजनात दिवसा पाच ते दहा लोकांचा समूह असायचा, त्याला दंडार म्हणत असायचे. एकेरी व्यक्ती विविध सोंग करायची, त्यांना बहुरुपी म्हणत होते. आज मात्र गावागावातील मंडई जोर असला तरी पुरातन कलाकृती ऱ्हास होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामीण भागात मंडईचे आयोजन हे विशेष आकर्षण होते. दिवाळीनंतर तिसऱ्या दिवसापासून गावागावात मंडई भरली जात होती. यात भावासाठी बहीण विविध सामान ओवाळणीकरिता घेत होती. आजसुद्धा ती प्रथा आहे. मात्र चार दशकापूर्वी मंडई म्हटल्यानंतर जे आकर्षण असायचे ते आता राहिले नाही. पोवाडा, गणगवळन, टाहारा जो लाकडी असायचा त्याच्यावर एकमेव साधान घालायचे. तुणतुणा वाजायचा, ढोलकी मास्टर आपल्या विशिष्ट शैलीत पाय मटकवून ढोलकीवर दोन्ही बाजूला थाप घालायचा. त्यामुळे ढोलकीच्या तालावर तुणतुण्यााच्या नादाने भारुड, पोवाडा, गणगवळन यांचा तालासुरात आवाज निघायचा, ते गीत-संगीत मोहीत करणारे होते. एकापाठोपाठ समूहाने विविध वेशभुषा घालून लोक नाचायचे. पुरुष-स्त्रीचे वस्त्र परिधान करुन चेहऱ्याला सजवून या गणगवळनमध्ये नाचायचे. समोर सर्कशीतील जोकराप्रमाणे दोन व्यक्त आकर्षित करणारे लाकडी साहित्य घेवून त्याचा आवाज काढायचे. पुरातन काळातील छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव मस्तानी, प्रभु रामचंद्र, यांची गौरवगाथा मांडणारे शाहीर पोवाडे सादर करून सर्वांना मोहीत करायचे. मात्र आज ते सर्व लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. मंडईनिमित्त पूर्वी दंडार रात्री आयोजित केली जात होती. त्यावेळी एखादी नाट्यछटा सादर होत होती. हे सर्व नवीन पिढीला आज मान्य नाही. जुने ते सोने समजून त्यांना सहज स्विकारायला पाहिजे मात्र ते चित्र दिसत नाही. नवे ते हवे याच उद्देशाने नवीन पीढीने आपले मनोरंजनाचे साधन निवडले. आता नवीन पिढीला मोबाईल या वस्तुने आकर्षिक केले आहे. केवळ परंपरा सुरूएकंदरित आज ग्रामीण भागात मंडईचे आयोजन केले जाते, त्यामागे ती परंपरा कायम राहावी हाच उद्देश प्रामुख्याने दिसत आहे. सोबत मनोरंजनाकरिता आज गावागावात मंडईनिमित्त नाटकांचे आयोजन केले जाते. मात्र पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक नाटकांचा ऱ्हास झाला नाही. केवळ नावापुरती मंडई राहिली आहे. पुरातन कलाकृतीचा ऱ्हास झाला आहे, हे तेवढेच खरे.