शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पुरातन कलाकृती ऱ्हास होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: November 30, 2015 00:46 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास तीन ते चार दशक ग्रामीण भागातील मंडई मोठ्या जल्लोषात सुरू होत्या.

लाखनी : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास तीन ते चार दशक ग्रामीण भागातील मंडई मोठ्या जल्लोषात सुरू होत्या. नागरिकांना मंडईचे मोठे आकर्षण होते. अनेक नागरिक मनोरंजनाच्या साधनांचा उपयोग करून जनतेचे ध्यानाकर्षण करायचे. त्यातून त्यांना पैसे मिळत होते. ते पैसे म्हणजे बोजारा समजत होते. काळ बदलला, जुनी पिढी संपुष्ठात आली. मात्र त्यांची जागा नवीन पिढीने घेतली नाही. मनोरंजनात दिवसा पाच ते दहा लोकांचा समूह असायचा, त्याला दंडार म्हणत असायचे. एकेरी व्यक्ती विविध सोंग करायची, त्यांना बहुरुपी म्हणत होते. आज मात्र गावागावातील मंडई जोर असला तरी पुरातन कलाकृती ऱ्हास होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामीण भागात मंडईचे आयोजन हे विशेष आकर्षण होते. दिवाळीनंतर तिसऱ्या दिवसापासून गावागावात मंडई भरली जात होती. यात भावासाठी बहीण विविध सामान ओवाळणीकरिता घेत होती. आजसुद्धा ती प्रथा आहे. मात्र चार दशकापूर्वी मंडई म्हटल्यानंतर जे आकर्षण असायचे ते आता राहिले नाही. पोवाडा, गणगवळन, टाहारा जो लाकडी असायचा त्याच्यावर एकमेव साधान घालायचे. तुणतुणा वाजायचा, ढोलकी मास्टर आपल्या विशिष्ट शैलीत पाय मटकवून ढोलकीवर दोन्ही बाजूला थाप घालायचा. त्यामुळे ढोलकीच्या तालावर तुणतुण्यााच्या नादाने भारुड, पोवाडा, गणगवळन यांचा तालासुरात आवाज निघायचा, ते गीत-संगीत मोहीत करणारे होते. एकापाठोपाठ समूहाने विविध वेशभुषा घालून लोक नाचायचे. पुरुष-स्त्रीचे वस्त्र परिधान करुन चेहऱ्याला सजवून या गणगवळनमध्ये नाचायचे. समोर सर्कशीतील जोकराप्रमाणे दोन व्यक्त आकर्षित करणारे लाकडी साहित्य घेवून त्याचा आवाज काढायचे. पुरातन काळातील छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव मस्तानी, प्रभु रामचंद्र, यांची गौरवगाथा मांडणारे शाहीर पोवाडे सादर करून सर्वांना मोहीत करायचे. मात्र आज ते सर्व लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. मंडईनिमित्त पूर्वी दंडार रात्री आयोजित केली जात होती. त्यावेळी एखादी नाट्यछटा सादर होत होती. हे सर्व नवीन पिढीला आज मान्य नाही. जुने ते सोने समजून त्यांना सहज स्विकारायला पाहिजे मात्र ते चित्र दिसत नाही. नवे ते हवे याच उद्देशाने नवीन पीढीने आपले मनोरंजनाचे साधन निवडले. आता नवीन पिढीला मोबाईल या वस्तुने आकर्षिक केले आहे. केवळ परंपरा सुरूएकंदरित आज ग्रामीण भागात मंडईचे आयोजन केले जाते, त्यामागे ती परंपरा कायम राहावी हाच उद्देश प्रामुख्याने दिसत आहे. सोबत मनोरंजनाकरिता आज गावागावात मंडईनिमित्त नाटकांचे आयोजन केले जाते. मात्र पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक नाटकांचा ऱ्हास झाला नाही. केवळ नावापुरती मंडई राहिली आहे. पुरातन कलाकृतीचा ऱ्हास झाला आहे, हे तेवढेच खरे.