शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

परिश्रम व नियोजनातून मिळाला उत्पन्नाचा मार्ग

By admin | Updated: July 1, 2014 01:19 IST

मनात जिद्द व परिश्रम करण्याची तयारी असली तर प्रतिकुल परिस्थितीवर मात करून समोर जाता येते. वडीलोपार्जीत अडीच एकर शेती असणाऱ्या एका शेतकऱ्याने परिश्रम व नियोजनाचा मार्ग स्वीकारून

भंडारा : मनात जिद्द व परिश्रम करण्याची तयारी असली तर प्रतिकुल परिस्थितीवर मात करून समोर जाता येते. वडीलोपार्जीत अडीच एकर शेती असणाऱ्या एका शेतकऱ्याने परिश्रम व नियोजनाचा मार्ग स्वीकारून केळीची व अन्य फळझाडांची बाग फुलवून आर्थिक संपन्नता व उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. लाखनी तालुक्यातील सोमवालवाडा येथील शेतकरी सुरेश तुकाराम टिचकुले यांच्याकडे वडीलोपार्जीत १० एकर शेती होती. आजोबाला चार मुले असल्यामुळे वडीलांच्या हिश्याला अडीच एकर शेती, त्यातही अर्धी पडीत. शिक्षण जेमतेम १० वी पर्यंत झाले. आईवडीलांसह पडीत जमिनीत माती खोदून बांध्या तयार केल्या. कसेतरी खाण्यापुरते धान पिकायला लागले. परिस्थिती नाजूक त्यामुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. अडीच एकर जमीन चार ठिकाणी अर्धा अर्धा एकराचे तुकडे, परंतु एकाच मार्गावर चारही तुकड्यांना नाला लागून आहे. एका तुकड्यावर आजोबांनी विहिर तयार केली होती व मोरीने पाणी काढून भाजीपाला पिकवायचे. गावात श्रीमंत शेतकऱ्यांनी विहिरी खोदून विहिरींवर विद्युत पंप बसवून भाजीपाला लावणे सुरु केले. सुरेश टिचकुले यांना ते शक्य नव्हते. आईवडीलांसोबत नाल्यामध्ये पाच फुट खड्डा तयार केला. जुने विद्युत पंप कसेतरी खरेदी केले. वीज कनेक्शन घेऊन दहा गुंठ्यात भाजीपाला लावणे सुरु केले. त्यामुळे थोडीफार आर्थिक मदत व्हायला लागली. नंतर शासनाच्या जवाहर योजनेतून विहिर मिळाली. उत्पन्न हळूहळू वाढू लागले. शेताशेजारी पडीत जागा खरीदी करून पाच एकराचा प्लॉट तयार झाला. त्यात धान, गहू, उन्हाळी मुंग असे तीन पिके तसेच काही जागेत भटई, वांगे, मिरची, टमाटर, चवळी, गवार, भेंडी, मेथी, कोथींबिर अशी सर्वच प्रकारची वाण घेण्यास सुरुवात केली. शेतीला सेंद्रीय खत मिळावे म्हणून चार पाच म्हशी खरेदी केल्या. दुधातून उत्पन्न मिळायला लागले. तेथे गांडूळ खत निर्मिती केली. शासनाच्या फळबाग विकास कार्यक्रमातून पन्नास कलमी आंबे लावले. साग, कडुलिंब, बांबू यांचीही लागवड केली. शासकीय अनुदानातून तुषार संच बसविला. ओलीताचे क्षेत्र वाढल्याने त्याने नवनवीन प्रयोग सुरु केले. ऊस लागवड केली. त्यामध्ये एकरी ३० टन उत्पन्न मिळाले. ड्रीप संच बसवून केळीची लागवड केली. शेतीच्या राखणीसाठी हिस्सेदार ठेवला असला तरी शेतीची मशागत, डवरणी, खत टाकणे, औषधी फवारणी ते स्वत: करतात. शेतात २० बाय २० मिटरची शेततळे तयार केली. त्यातून मत्स्य उत्पादनही ते घेतात.