शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलकांकडे कोणतीही परवानगी नाही, दुपारी ३ पर्यंत जागा रिकामी करा: मुंबई हायकोर्ट
2
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
3
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
4
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
5
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
6
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
7
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
8
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
9
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
10
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
11
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
12
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
13
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
14
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
15
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
16
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
17
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
18
शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टीईटी देणे अनिवार्य, राज्यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
19
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
20
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?

कृषी संजीवनी योजना बंद होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: November 22, 2014 00:12 IST

महावितरणतर्फे राबविण्यात आलेली कृषी संजिवनी योजनेची मुदतवाढ संपल्यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग होण्यापूर्वीच ही योजना बंद करण्यात आली आहे.

चुल्हाड (सिहोरा) : महावितरणतर्फे राबविण्यात आलेली कृषी संजिवनी योजनेची मुदतवाढ संपल्यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग होण्यापूर्वीच ही योजना बंद करण्यात आली आहे. यामुळे तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांची धाकधुकी वाढलेली आहे. कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे वीज वितरण कंपनीचे कोट्यवधी रूपयांचे विज बिल थकीत आहेत. सततच्या नापिकीमुळे शेतकरी विज बिलाची देयक देत नाहीत. याशिवाय १४ तासाचे भारनियमन असल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी वीज वितरण कंपनीविरुद्ध संतप्त भावना व्यक्त होत आहे. शेतकऱ्याकडची वाढती थकबाकी वीज वितरण कंपनीसाठी डोकेदुखी ठरणारी आहे. विजेच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी राज्यात कृषी संजिवनी योजनेची सुरूवात करण्यात आली आहे. वातानुकुलित खोलीत बसून या योनजेचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. नियोजनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि धानपिकांचा पंचनामा केलेला नाही. त्यामुळे या योजनेची मुदतवाढ संपली असतानाही शेतकऱ्यांनी सहभाग घेतला नाही. या योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांना विज बिलात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांना संजिवणी ठरणारी आहे. या योजनेची सुरूवात आॅगस्ट महिन्यात करण्यात आली असून शेतकऱ्यांना विज बिलाचे देयक तथा सहभागासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ आॅक्टोंबरला योजनेची अंतिम मुदतवाढ संपली असतानाही १ टक्के शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या योजनते शेतकऱ्यांनी अल्प प्रतिसाद नोंदविला असून विज बिलाची देयके दिलेले नाही, या कारणावरून रब्बी हंगामात कृषी पंपांचा विज पुरवठा खंडीत केला जाणार आहे. उन्हाळी धान पिकाला पाण्याची गरज असते. हीच संधी साधून कृषी संजिवनी योजना बंद करण्यात आली आहे. सिहोरा परिसरात धानाचे प्रमुख पिक आहे. धानाचे पिक शेतकऱ्यांच्या हातात येण्यासाठी महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. सध्या धान कापणी सुरू आहे. मळणीनंतर धानाची विक्री करण्यात येणार आहे. धान खरेदी केंद्रांवर चुकारे वाटपात विलंब होत आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. धान पिकाची लागवड करताना कर्जाचे डोंगर आहे. बँका, सोसायटीच्या नजरा शेतकऱ्यांकडे लागलेल्या आहेत. धानाच्या उत्पादनाची चिंता कुणालाही नाही. केवळ वसुली मिळाली पाहिजे, अशा नोटीस येत असल्यामुळे शेतकऱ्यांची धाकधुकी वाढली आहे. जिल्ह्यात कृषी संजिवनी योजनेत सहभागी शेतकऱ्यांचा आकडा नाही. नियोजन चुकल्याने शेतकऱ्यांना ही योजना न्याय देऊ शकली नाही. निकष तथा मुदतवाढ देण्याची क्षमता लोकप्रतिनिधीमध्ये आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना आता शेतकऱ्यांसाठी आवाज बुलंद करण्याची गरज आहे. (वार्ताहर)