शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

गणेशपुरात पाण्यासाठी बोंबाबोंब

By admin | Updated: May 14, 2016 00:31 IST

पाण्याला अमृताची उपमा देण्यात येते. मात्र हेच पाणी गणेशपुरवासीयांसाठी पिण्यायोग्य नसल्याने त्यांना जणू 'काळ्या पाण्याची' सजा मिळत आहे.

आरोग्य धोक्यात : ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्षभंडारा : पाण्याला अमृताची उपमा देण्यात येते. मात्र हेच पाणी गणेशपुरवासीयांसाठी पिण्यायोग्य नसल्याने त्यांना जणू 'काळ्या पाण्याची' सजा मिळत आहे. नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याऐवजी पाच रूपयात २० लीटर पाणी विकण्याचा प्रकार सुरू केल्याने नागरिकांमध्ये ओरड सुरू आहे.सुमारे १४ हजार लोकसंख्या असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायतची सदस्य संख्या १७ आहे. सहा वॉर्डातून हे १७ सदस्य ग्रामवासीयांचे प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी मोठ्या अपेक्षेने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामात सहकार्य व नागरिकांना आरोग्य सुविधा मिळेल या अपेक्षेने मतपेटीतून त्यांना विजयी केले. मात्र निवडणुकीच्या तोंडावर अपेक्षांचे आश्वासन ग्रामस्थांना दिलेल्या या लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्यांकडे अक्षरक्ष: दुर्लक्ष केल्याचे गणेशपूर येथे 'लोकमत आपल्या दारी' या उपक्रमातून फेरफटका मारला असता विदारक चित्र समोर आले.ग्रामपंचायत प्रशासनाची हद्द असली तरी येथील काही वॉर्डात भंडारा नगरपालिकेने नळजोडणी केली आहे. ग्रामपंचायतच्या नळाद्वारे अशुद्ध व आरोग्यास हानीकारक अशा पाण्याचा पुरवठा होत आहे. यावर ग्रामस्थांनी अनेक ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले. सोबतच आमसभा, मासिक सभेतही याची चर्चा करण्यात आली. मात्र प्रशासनाने केवळ जलशुद्धीकरण यंत्र बसविल्यानंतरच नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल, असे स्पष्ट करून वेळ काढून नेण्याचा प्रयत्न चालविला आहे.'लोकमत आपल्या दारी' या उपक्रमातून आज शुक्रवारला लोकमतची चमू गणेशपूर गावातील वॉर्डावॉर्डात फिरली. यावेळी नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरूद्ध पिण्याचे पाणी, नाली साफसफाई, आरोग्य सुविधा याबाबत रोष व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. येथील नाल्यांची नियमित साफ सफाई होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)नागनदीमुळे वैनगंगा नदीचे पात्र दूषित नागनदीचा प्रवाह वैनगंगा नदीत प्रवाहीत होतो. नागनदीच्या माध्यमातून रासायनिकयुक्त पाणी येथून प्रवाहित होत आहे. हे गढूळ पाणी नळाच्या माध्यमातून नागरिकांना पिण्यास देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे जलशुद्धीकरण यंत्राची गरज आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ग्रामवासीयांना जणू काळ्या पाण्याची सजा देण्यात येत असल्याची प्रचिती येते. यावर तात्पूरता उपाय म्हणून ग्रामपंचायतीने एका खासगी कंपनीच्या माध्यमातून आॅरो प्लँट सुरू केला आहे. मात्र तेथेही नागरिकांना पैसे देवूनच पाणी विकत घ्यावे लागत आहे. असे असतानाही ग्रामपंचायत दरवर्षाला ७०० रूपये पाणीपट्टी वसूली करीत असल्याने रोष आहे.