शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

लिकेजमुळे पाण्याचा विसर्ग

By admin | Updated: July 21, 2014 23:40 IST

बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पाचे दोन वक्रद्वार आणि महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील उजवा कालव्याच्या मुख्य विमोचकाचे गेट घट्ट न बसल्यामुळे पाण्याचा सातत्याने विसर्ग सुरु आहे. या दोन्हीतून २४ तास

२४ तास पाण्याचा अपव्यय : बावनथडी प्रकल्पातील प्रकारमोहन भोयर - तुमसरबावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पाचे दोन वक्रद्वार आणि महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील उजवा कालव्याच्या मुख्य विमोचकाचे गेट घट्ट न बसल्यामुळे पाण्याचा सातत्याने विसर्ग सुरु आहे. या दोन्हीतून २४ तास पाण्यावा विसर्ग सुरू आहे. दोन्ही राज्यांनी तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्याचे काम हाती घेतले आहेत, परंतु त्यात यश आलेले नाही. सन २०१३ मध्ये या प्रकल्पात पाणी साठवण सुरू झाले होते. मागील एक वर्षापासून पाण्याचा २४ तास अपव्यय होत आहे.बावनथडी (राजीवसागर) हा आंतरराज्यीय प्रकल्प महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याचा संयुक्त प्रकल्प असून त्यासाठी दोन्ही सरकारने पुढाकार घेतला आहे. तुमसर तालुक्यातील सीतेकसा येथे आहे. दोन्ही राज्यांच्या सीमा येथे लागून आहेत. ३५ वर्षापासून या प्रकल्पाची विविध कामे सुरू आहेत. या प्रकल्पाचे मुख्य वक्रद्वार सहा व गळभरणी गॉर्ज फिलींगची कामे मध्यप्रदेश शासनाकडे होती. या वक्रद्वारांना लोखंडी गेट बसविण्यात आले. सहापैकी दोन गेट घट्ट बसलेले नाहीत. घट्ट बसल्यानंतर त्यातून विसर्ग होत नाही, परंतु येथे मागील एका वर्षापासून २४ तास दोन वक्रद्वारातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भोपाळ येथील तंत्रज्ञ हा तांत्रिक बिघाड दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापुर्वी येथे विसर्ग बंद करण्याकरीता तंत्रज्ञानाचे पथक येवून गेले होते, परंतु त्यांनाही यश आले नव्हते.महाराष्ट्राच्या सीमेतील मुख्य उजवा कालव्याचे मुख्य विमोचकाचे गेटही घट्ट न बसल्याने यातूनही मोठ्या प्रमाणात २४ तास पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा पाण्याचा विसर्ग मागील एका वर्षापासून सुरू आहे. हे विशेष येथे सुद्धा राज्य शासन व प्रकल्पाचे अधिकारी गंभीर दिसत नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर मुख्य विमोचकाचे दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.पाण्याची बचत करणे पाण्याचा अपव्यय टाळणे याबाबीकडे प्रकल्प अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष येथे आहे. पाण्याच्या सतत विसर्ग तांत्रिक बिघाडामुळे होत आहे. हा तांत्रिक बिघाड आतापर्यंत कां? दूर करण्यात आला नाही. हा प्रश्न अनुत्तरीत आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता कुणीही अधिकारी बोलायला तयार नाहीत. या दोन्ही तांत्रिक बिघाडामुळे प्रकल्पाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बावनथडी प्रकल्प पाणीसाठी असलेल्या मुख्य धरण व वक्रद्वार गॉर्ज फिलींग केलेले स्थळी बाहेरून पिंचींग केलेले नाही.