शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

वैनगंगेत पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: April 21, 2017 00:35 IST

जीवनदायीनी बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीचा प्रवाह बंद पडला आहे. नदीपात्रातील पाणीपुरवठा करणाऱ्या योजना येत्या काही दिवसात बंद पडण्याची शक्यता

तुमसर तालुक्यात जलसंकट : बावनथडी तथा वाहनी बॅरेजमधून पाणी विसर्ग करण्याची गरजमोहन भोयर  तुमसर जीवनदायीनी बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीचा प्रवाह बंद पडला आहे. नदीपात्रातील पाणीपुरवठा करणाऱ्या योजना येत्या काही दिवसात बंद पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वैनगंगेत पाण्याचा ठणठणाट असून नदीलाच येथे पाण्याची प्रतीक्षा आहे. शासन व प्रशासनाच्या नियोजनावरच पाणीबाणीची समस्या दूर होण्याची शक्यता आहे.तुमसर तालुक्यात वैनगंगेचा प्रवास सुमारे ३० ते ३५ कि.मी. इतका आहे. वैनगंगेचा सध्या प्रवाह बंद पडला आहे. नदीपात्रात अनेक गाव तथा तुमसर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. या सर्व पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत आहेत. केवळ १० ते १५ दिवस या योजनेतून पाणीपुरवठा शक्य असल्याची शक्यता आहे. प्रवाहच बंद पडल्याने पाणी येणार कुठून असा प्रश्न आहे. वाहणी / मांडवी येथे बॅरेज तयार झाल्याने पाणी अडवून ठेवले जाते. पुढचा प्रवास वैनगंगेचा खडतर बनला आहे. केवळ बॅरेजच्या खालून नळासारखे पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. बॅरेजनंतर वैनगंगा नदीपात्र कोरडे पडले आहे. सध्या नदीपात्रात ठिकठिकाणी तलावासारखे खड्डे पडले आहेत. त्या खड्यात केवळ अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा मृत साठा मानला जातो. जीवनदायीनी वैनगंगेलाच येथे पाण्याची गरज आहे. नदी, तलाव, बोड्या इत्यादी जलस्त्रोत येथे शेवटची घटका मोजत आहेत. बावनथडी नदीवर धरण बांधण्यात आल्याने धरणापलीकडे बावनथडी नदी कोरडी पडली आहे. तुमसर तालुक्यातील सुमारे २५ ते ३०गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. बावनथडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी सर्वपक्षीय नेते करीत आहेत.आ.चरण वाघमारे यांनी बावनथडी प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. कटंगीचे आमदार के.डी. देशमुख यांची भेट घेऊन बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडण्यासंदर्भात दोन्ही आमदारांची चर्चा दोन दिवसापूर्वी झाल. पाणी विसर्ग करण्याबाबत येथे संघर्षाची शक्यता आहे. वाहणी / मांडवी बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाणी विसर्ग करण्याची येथे गरज आहे.