शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

भंडारा शहरासाठी १०९ कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 00:23 IST

शहरातील पाणीटंचाई व दूषित पाणीपुरवठा या समस्येवर मात करण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

सुनील मेंढे : घनकचरा निर्मूलनासाठी पुढाकार घेणारभंडारा : शहरातील पाणीटंचाई व दूषित पाणीपुरवठा या समस्येवर मात करण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. १०९ कोटी रूपयांच्या या योजनेला लवकरच मंजुरी मिळणार असून नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी ‘आरओ’ची गरज पडणार नाही, असा विश्वास नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केला.यावेळी ते म्हणाले, भंडारा शहरात सद्यस्थितीत जी पाणीपुरवठा योजना आहे, त्यानुसार दोन जलकुंभाच्या माध्यमातून ४४ लाख लिटर पाण्याचा प्रतिदिन पुरवठा केला जाऊ शकतो. परंतु, विविध समस्यांमुळे तितक्या क्षमतेने पाणीपुरवठा होत नाही. उन्हाळ्यात शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. आता शासनाला सादर केलेल्या १०९ कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेनुसार अतिरिक्त चार टाकी शहरातील विद्यानगर, शास्त्रीनगर, खातरोड व एमएसईबी कॉलनीत बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळेल. पाईपलाईन जुनी झाली असल्याने जास्त व्यासाची नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेला जलशुद्धीकरण बंद करून दसरा मैदानावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले नवीन जलशुद्धीकरण केंद्र तयार केले जाणार आहे. या योजनेनुसार नागरिकांना प्रतिदिन किमान १३५ लिटर स्वच्छ पाणी पुरवण्यात येणार असल्याचे सुनील मेंढे यांनी सांगितले. शहरात भुयारी गटार योजनेचा प्रकल्प तयार करण्यात आलेला असून त्यावर १२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम शासनाने निश्चित केले आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार आहे. शहरातील मिस्कीन टँक व हुतात्मा स्मारक या दोन बालोद्यानांचा विकास केला जाणार आहे. विशेष म्हणजे राजीव गांधी चौक ते लायब्ररी चौकादरम्यान पायलट रस्ता पावसाळ्यापुर्वी तयार केला जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतून चार हजार घरे बांधण्यात येतील, असेही मेंढे यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष रूबी चढ्ढा, नगरसेवक चंद्रशेखर रोकडे, नितीन धकाते, मंगेश वंजारी, रजनीश मिश्रा यांच्यासह मुख्याधिकारी अनिल अढागळे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)चार कोटींची करवसुलीनगर पालिकेने राबविलेल्या विशेष करवसुली मोहिमेत पालिकेच्या तिजोरीत ४ कोटी ८ लाख रूपये जमा झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ७५ लाख रूपये अधिक वसूल झाले आहेत. बाजारात सुविधा आणूशहरातील छोटा बाजार चौकाचे नियोजन करून भाजीपाला विक्रेत्यांना एकत्रित आणून बाजारातील अव्यवस्था तातडीने दूर करण्यात येईल. मोठा बाजारासाठी विकास योजना तयार करण्यात येणार असून अतिक्रमण काढून रस्ते रूंद केले जाणार आहेत. लहान व्यापाऱ्यांसाठी जागा निश्चित करून शहरात फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मेंढे यांनी सांगितले.