शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा शहरासाठी १०९ कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 00:23 IST

शहरातील पाणीटंचाई व दूषित पाणीपुरवठा या समस्येवर मात करण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

सुनील मेंढे : घनकचरा निर्मूलनासाठी पुढाकार घेणारभंडारा : शहरातील पाणीटंचाई व दूषित पाणीपुरवठा या समस्येवर मात करण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. १०९ कोटी रूपयांच्या या योजनेला लवकरच मंजुरी मिळणार असून नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी ‘आरओ’ची गरज पडणार नाही, असा विश्वास नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केला.यावेळी ते म्हणाले, भंडारा शहरात सद्यस्थितीत जी पाणीपुरवठा योजना आहे, त्यानुसार दोन जलकुंभाच्या माध्यमातून ४४ लाख लिटर पाण्याचा प्रतिदिन पुरवठा केला जाऊ शकतो. परंतु, विविध समस्यांमुळे तितक्या क्षमतेने पाणीपुरवठा होत नाही. उन्हाळ्यात शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. आता शासनाला सादर केलेल्या १०९ कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेनुसार अतिरिक्त चार टाकी शहरातील विद्यानगर, शास्त्रीनगर, खातरोड व एमएसईबी कॉलनीत बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळेल. पाईपलाईन जुनी झाली असल्याने जास्त व्यासाची नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेला जलशुद्धीकरण बंद करून दसरा मैदानावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले नवीन जलशुद्धीकरण केंद्र तयार केले जाणार आहे. या योजनेनुसार नागरिकांना प्रतिदिन किमान १३५ लिटर स्वच्छ पाणी पुरवण्यात येणार असल्याचे सुनील मेंढे यांनी सांगितले. शहरात भुयारी गटार योजनेचा प्रकल्प तयार करण्यात आलेला असून त्यावर १२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम शासनाने निश्चित केले आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार आहे. शहरातील मिस्कीन टँक व हुतात्मा स्मारक या दोन बालोद्यानांचा विकास केला जाणार आहे. विशेष म्हणजे राजीव गांधी चौक ते लायब्ररी चौकादरम्यान पायलट रस्ता पावसाळ्यापुर्वी तयार केला जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतून चार हजार घरे बांधण्यात येतील, असेही मेंढे यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष रूबी चढ्ढा, नगरसेवक चंद्रशेखर रोकडे, नितीन धकाते, मंगेश वंजारी, रजनीश मिश्रा यांच्यासह मुख्याधिकारी अनिल अढागळे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)चार कोटींची करवसुलीनगर पालिकेने राबविलेल्या विशेष करवसुली मोहिमेत पालिकेच्या तिजोरीत ४ कोटी ८ लाख रूपये जमा झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ७५ लाख रूपये अधिक वसूल झाले आहेत. बाजारात सुविधा आणूशहरातील छोटा बाजार चौकाचे नियोजन करून भाजीपाला विक्रेत्यांना एकत्रित आणून बाजारातील अव्यवस्था तातडीने दूर करण्यात येईल. मोठा बाजारासाठी विकास योजना तयार करण्यात येणार असून अतिक्रमण काढून रस्ते रूंद केले जाणार आहेत. लहान व्यापाऱ्यांसाठी जागा निश्चित करून शहरात फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मेंढे यांनी सांगितले.