शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आठ गावांचा पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: August 11, 2016 00:27 IST

जिल्हा परिषद शहापूर ग्रामीण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा अंतर्गत आठ गावांना होत असलेला पाणीपुरवठा पाच दिवसापासून बंद करण्यात आलेला आहे.

पाण्यासाठी महिलांची भटकंती : प्रशासनाचे दुर्लक्ष, लोकप्रतिनिधींची उदासिनताप्रल्हाद हुमणे  जवाहरनगरजिल्हा परिषद शहापूर ग्रामीण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा अंतर्गत आठ गावांना होत असलेला पाणीपुरवठा पाच दिवसापासून बंद करण्यात आलेला आहे. परिणामी १ हजार २०० नळ जोडणी धारकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.जिल्हा परिषद शहापूर ग्रामीण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा अंतर्गत ग्रामपंचायत बेला रहदारीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. याठिकाणी कोरंभी स्थीत वैनगंगा नदी किनाऱ्यावर जलसोस्त्र निर्माण करण्यात आले. याठिकाणाहून पाणीपुरवठा बेला येथे करण्यात येतो. बेला जलशुद्धीकरण केंद्राद्वारे शुद्ध पाणीपुरवठा बेला, मुजबी, उमरी-फुलमोगरा, भोजापूर, शहापूर, गोपीवाडा, परसोडी, ठाणा या गावांना करण्यात येतो. या जलशुद्धीकरण केंद्राचे देखभाल दुरूस्ती ग्रामपंचायत बेला यांच्याकडे मागील २०१५-१६ मार्चपर्यंत अटी व शर्तीवर देण्यात आली होती. तदनंतर २०१६-१६ या कालावधीत करारनामा जिल्हा परिषद भंडारा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केलेली नाही. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्या तोंडी सुचनेनुसार दोन महिने ग्रामपंचायत बेला यांनी चालवावे. नंतर आपण करारनामा करू, असे सदर ग्रामपंचायतला सांगितले. आज पाच महिने लोटून गेले. मात्र जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत बेला यांच्याशी पाणीपुरवठा सुरू करण्याबाबद करारनामा केलेला नाही. सदर अधिकारी आज करतो उद्या करून अशी भुलथात देत या योजनेकडे दुर्लक्ष करीत आहे, असे दिसून येते. कालांतराने ग्रामपंचायत बेला यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी लावलेले रोजंदारी मजुर बंद करण्यात आले. परिणामी सदर आठ गावांचा पाणीपुरवठा बंद झालेला आहे. याला दोषी कोण हा संशोधनाचा प्रश्न येथे येत आहे. यामुळे येथील नळ जोळणीधारक महिला शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या गावातील ग्रामपंचायत सरपंच यांना नळ बंद कशामुळे करण्यात आले याविषयी साधी सुचना सदर विभागाकडून देण्यात आलेली नाही. यावरून पाणीपुरवठा विभाग व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे समजतेग्रामपंचायत बेलासोबत चालु वषर्त्तचा करारनामा जिल्हा परिषदेने केलेला नाही. सदर कामावर १० रोजंदार मजुरांना मजुरी देण्यासाठी ग्रामपंचायतकडे पैशा शिल्लक नाही. तुरटी, ब्लिचिंग यांच्या खर्च वाढत आहे. जिल्हा परिषदेने आम्ही थकबाकी दिलेली नाही. करानामा न करता आम्ही नळयोजना कशी काय चालविणार जर कमी जास्त झाल्यास कोण जिम्मेदार राहणार परिणामी आम्ही पाणीपुरवठा चालवून सकत नाही. सुरू करावयाचे असेल तर आधी करारनामा करा मगच आम्ही विचार करू याबाबद सात ते आठ वेळा जिल्हा परिषदेला याबाबद पत्र व्यवहार करण्यात आलेले आहे.-शारदा गायधने, सरपंच ग्रामपंचायत बेला.