शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

मंडळ कृषी कार्यालयात पाणीच पाणी

By admin | Updated: August 28, 2014 23:35 IST

तुमसर तालुक्यात ७३ गावांचा प्रशासकीय कारभार करणाऱ्या सिहोरा परिसरातील मंडळ कृषी कार्यालयाची अजब कथा आहे. शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा कार्यालय वांझोटा ठरत

रंजित चिंचखेडे - चुल्हाडतुमसर तालुक्यात ७३ गावांचा प्रशासकीय कारभार करणाऱ्या सिहोरा परिसरातील मंडळ कृषी कार्यालयाची अजब कथा आहे. शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा कार्यालय वांझोटा ठरत असल्याची प्रचिती अनुभवास येत आहे. पावसाळ्यात या कार्यालयात पाणीच पाणी असल्याने कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.वैनगंगा आणि बावनथडी नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या सिहोरा परिसरात मंडळ कृषी कार्यालयाची स्थाना करण्यात आलेली आहे. सिहोरा गावाच्या नावाने असलेला हा कार्यालय ८ कि़मी. अंतरावरील हरदोली गावातून प्रशासकीय कारभार करीत आहे. या कार्यालय अंतर्गत बपेरा, देवसर्रा, टेमणी, चुल्हाड, देव्हाडी आदी गावाचे कृषी सहायकाचे पदे आहेत. यात अनेक पदे रिक्त आहेत. बपेरा गावाला हाजवर कृषी सहायक प्राप्त झाले नाही. यामुळे प्रभारावर प्रशासकीय कारभार होत आहे. या मंडळ कृषी कार्यालय अंतर्गत सर्वाधिक पुरग्रस्त गावे आहेत. गावात पुराचे पाणी शिरत आहे. यामुळे शेतीची कल्पना करता येते. दरवर्षी पुराच्या पाण्याने शेतीचे नुकसान होत आहे. नदी पात्रात शेकडो हेक्टर शेतीचे भुस्खलन झाले आहे. एकट्या बपेरा गावात ८७ हेक्टर आर शेती नदी पात्रात आहे. परंतु सर्वेक्षण तथा शासकीय मदत देणारा कृषी विभाग मात्र लंगडा आहे.राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या या कार्यालयाचा प्रशासकीय कारभार आधी सिहोरा गावातून करण्यात येत होता. भाड्याच्या खोलीतून होणाऱ्या प्रशासकीय कारभाराने कार्यरत कर्मचारी तथा शेतकरी सुखावले होते. परंतु या कार्यालयाचे हरदोली गावात स्थानांतरण होताच कर्मचारी आणि शेतकरी आतंक अनुभवत आहेत. प्रशासकीय कारभार करणारी शासकीय इमारत जिर्ण झाली आहे. पावसाळ्यात इमारतीचे छत कोसळत आहे. कार्यालयात पाणी साचत असल्याने महत्वपूर्ण दस्तऐवज पावसाला बडी पडत आहेत. कर्मचाऱ्याच्या खुर्च्या आणि टेबल, पावसाच्या पाण्याने ओलेचिंब होत आहे. पाऊस सुरू होताच कार्यरत कर्मचारी कार्यालय सोडून पानटपरीचा आश्रय घेत आहेत. इमारत कोसळण्याची भिती कार्यरत कर्मचाऱ्यांना आहे. या कार्यालयात जागे अभावी शेतकऱ्यांची धांदल उडत आहे.कार्यालयाच्या अवस्थेला कर्मचारी दोषी नसताना ही शेतकरी असंतोषाचे खापर फोडत आहेत. या कार्यालयाचे सिहोरा गावात स्थानांतरण करण्याची ओरड आहे. परंतु कृषी विभाग गंभीर नाही. बस स्थानक परिसरात जि.प. विभागाची सुसज्ज इमारत रिक्त आहे. ही इमारत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी या कार्यालयाला देण्याची जुनी मागणी आहे. दरम्यान राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या लघु पाठबंधारे विभागाची वसाहत रिकामी आहे. या विभागात कार्यरत कर्मचारी याच परिसरातील असल्याने कुणी वास्तव्य करीत नाही. या वसाहतीच्या रिकाम्या खोल्या कृषी कार्यालयाला प्रशासकीय कारभारासाठी देण्यात अडचण नाही. दोन्ही विभाग राज्य शासनाची आहेत. जिल्ह्यात दोन्ही विभागाचे जिल्हा कार्यालय आहेत.