शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

२६३ गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: January 20, 2016 00:47 IST

जिल्ह्यातून वाहणाऱ्या जिवनदायिनी वैनगंगेचा जलस्तर पाहता आणि भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा असला..

पाणी प्रश्न पेटणार : ४१६ उपाययोजनांसाठी २.६३ कोटींची तरतूद इंद्रपाल कटकवार भंडाराजिल्ह्यातून वाहणाऱ्या जिवनदायिनी वैनगंगेचा जलस्तर पाहता आणि भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा असला तरी जीर्ण पाईपलाईन ठिकठिकाणी फुटलेली आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईचे तीव्र संकेत मिळाले आहेत. परिणामी टँकरमुक्त जिल्ह्यातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे बळावली आहे. प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ जानेवारी ते जूनचा बृहत आराखड्यात २६३ गावांसाठी ४१६ उपाययोजना सुचविल्या असूनया उपाययोजनांसाठी २ कोटी ६३ लक्ष ८३ हजार रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा आहे. म्हणूनच जिल्हा प्रशासनाच्या यादीत टँकरमुक्त म्हणून घोषित आहे. जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या मोठी आहे. तलावांची लक्षणीय उपस्थिती व त्यातल्या त्यात वैनगंगा व तिच्या उपनद्यांमुळे पाण्याची पातळी असतेच. यात मात्र चुलबंद नदीची स्थिती चिंताजनक आहे. नदीचे पात्र कोरडे पडले आहे. दुसरीकडे पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही. काही गावामंध्ये पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी बरसला. मे व जून महिनादरम्यान अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न पेटणार आहे. पाणी राष्ट्रीय संपत्ती आहे, पाण्याचा वापर जपून करा, असे आवाहन शासनातर्फे करण्यात येते. मात्र, पाण्याच्या अपव्ययामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. जिल्हा प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ एप्रिल ते जूनचा कृती आराखडा तयार केला. यात ८० विहीरी खोल करणे आणि त्यातील गाळ काढण्याचे प्रस्तावित आहेत. ३१ नळयोजनांची दुरूस्ती तर ५६ गावांमधील १५७ विंंधन विहीरींची दुरूस्ती, १२ ठिकाणी कुपनलिका घेण्याचा प्रस्ताव आहे. या गावांमध्ये पाणी टंचाई असली तरीसुद्धा टँकर किंवा बैलबंडीने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था नाही. जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहत असल्यामुळे पाण्याचा स्त्रोत बऱ्यापैकी आहे. त्यामुळे नळयोजना प्रभावी करण्याची गरज आहे़ पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही. ग्रामीण भागात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याच्या पुनर्वापरासाठी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे.