शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अशोकनगरात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:25 IST

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर अडयाळ : सतत मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री मुसळधार पावसामुळे गावातील काही नाल्या साफ झाल्या, तर काही ...

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

अडयाळ : सतत मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री मुसळधार पावसामुळे गावातील काही नाल्या साफ झाल्या, तर काही नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले. अशोकनगरातील बनलेल्या काही नाल्यांचा उपयोग शून्य आहे. कारण पाणीच निघेनासे झाले आहे. तर त्या नगरातील मोकळ्या भूखंडात साचलेल्या आणि होणाऱ्या दुर्गंधीचा सामना दरवर्षीप्रमाणे कदाचित यावर्षीसुद्धा करावा लागणार की काय? असाही प्रश्न तेथील ग्रामस्थांना पडून आहे. येथील परिस्थिती याचप्रकारे होत असते. मग ही बाब गंभीर नाही का? असाही संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

गावातील समस्या, बिकट परिस्थितीही एकावेळेस दूर होत नाही. गावातील नाल्यांची स्थिती असो वा या अशोकनगरातील. किती नाल्या खोदून, शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा वापर करून, जेव्हा नाल्या बनल्या, तेव्हा ग्रामस्थांना वाटायचं की आता समस्या दूर होणार; पण शोकांतिका अशी आहे की, कुठे नालीतील पाणी पुढे जात नाही, तर कुठे काही ग्रामस्थांच्या चुकांमुळे पाणी पुढे जात नाही. नाल्या अद्याप उपसाच झाल्या नाहीत. याबाबत ग्रामवासी स्पष्ट आणि निर्भीडपणे समस्या मांडत जातात, पण कारवाई होत नाही. अडयाळ ग्रामपंचायत प्रशासन आता या प्रश्नाचा गंभीरपणे विचार करणार आहे की नाही, असा प्रश्न ग्रामवासी विचारत आहेत.