शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

अशोकनगरात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:25 IST

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर अडयाळ : सतत मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री मुसळधार पावसामुळे गावातील काही नाल्या साफ झाल्या, तर काही ...

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

अडयाळ : सतत मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री मुसळधार पावसामुळे गावातील काही नाल्या साफ झाल्या, तर काही नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले. अशोकनगरातील बनलेल्या काही नाल्यांचा उपयोग शून्य आहे. कारण पाणीच निघेनासे झाले आहे. तर त्या नगरातील मोकळ्या भूखंडात साचलेल्या आणि होणाऱ्या दुर्गंधीचा सामना दरवर्षीप्रमाणे कदाचित यावर्षीसुद्धा करावा लागणार की काय? असाही प्रश्न तेथील ग्रामस्थांना पडून आहे. येथील परिस्थिती याचप्रकारे होत असते. मग ही बाब गंभीर नाही का? असाही संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

गावातील समस्या, बिकट परिस्थितीही एकावेळेस दूर होत नाही. गावातील नाल्यांची स्थिती असो वा या अशोकनगरातील. किती नाल्या खोदून, शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा वापर करून, जेव्हा नाल्या बनल्या, तेव्हा ग्रामस्थांना वाटायचं की आता समस्या दूर होणार; पण शोकांतिका अशी आहे की, कुठे नालीतील पाणी पुढे जात नाही, तर कुठे काही ग्रामस्थांच्या चुकांमुळे पाणी पुढे जात नाही. नाल्या अद्याप उपसाच झाल्या नाहीत. याबाबत ग्रामवासी स्पष्ट आणि निर्भीडपणे समस्या मांडत जातात, पण कारवाई होत नाही. अडयाळ ग्रामपंचायत प्रशासन आता या प्रश्नाचा गंभीरपणे विचार करणार आहे की नाही, असा प्रश्न ग्रामवासी विचारत आहेत.