शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची पातळी दोन मिटरने खालावली

By admin | Updated: April 21, 2015 00:22 IST

भूजलाच्या स्थिर पाण्याच्या पातळीचा अभ्यास करण्यात आला.

प्रशांत देसाई भंडाराभूजलाच्या स्थिर पाण्याच्या पातळीचा अभ्यास करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी २५.०२ टक्के कमी पर्जन्यमान झाले. यात २५ पाणलोट क्षेत्रातील ७४ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले आहे. यातील ५१ विहिरींच्या पाण्याच्या पातळीत दोन मिटरची घट आढळून आल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. १५ जूनपर्यंत ६६ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता असल्याचा धक्कादायक अहवाल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने शासनाला सादर केला आहे.मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात उष्णतामान वेगाने वाढत आहे. आगामी तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या निरीक्षणानुसार जिल्ह्यातील नऊ लघू पाणलोट विहिरींच्या पातळीत एक ते दोन मीटरने पाणी पातळी खालावली असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. भूजलाच्या स्थिर पाण्याच्या पातळीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने जिल्ह्याची २५ पाणलोट क्षेत्रात विभागणी केली. पाणलोट क्षेत्रातील उतारानुसार प्रत्येक पाणलोट क्षेत्र तीन भागात अनुक्रमे रनआॅफ झोन, रिचार्ज झोन आणि स्टोरेज झोन मध्ये विभागण्यात आला. या प्रत्येक झोनमध्ये एक अशा ७४ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या असून स्थित पाण्याच्या पातळीची वर्षातून चार वेळेस (जानेवारी, मार्च, मे व आॅक्टोंबर) मोजमाप करून नोंद घेण्यात आली. मागील पाच वर्षाच्या सरासरी स्थिर पाण्याच्या पातळीसोबत तुलनात्मक अभ्यास मार्च २०१५ मध्ये करण्यात आला. जिल्ह्यात सरासरी १३३०.२१ मिमी पाऊस पडायला हवा. मात्र, जून ते मार्चपर्यंत ९९७.३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३३२.८३ मिमी पाऊस कमी पडला आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी शासनाला सादर केलेल्या अहवालातून काही धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. यात, जिल्ह्यात सामान्य मान्सून पर्जन्यमानाच्या तुलनेत जून २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत २५.०२ टक्के कमी पर्जन्यमान झाले आहे. सातही तालुक्यात सामान्य मान्सून पर्जन्यमानापेक्षा कमी झालेला आहे. ७४ निरीक्षण विहिरीपैंकी ५१ विहिरीमध्ये पाण्याची पातळीत घट आढळून आलेली आहे. तर २३ निरीक्षण विहिरींमध्ये पातळीत वाढ आलेली आहे. नऊ लघू पाणलोट क्षेत्रातील निरीक्षण विहिरींच्या पातळीत एक ते दोन मीटर घट आढळून आलेली आहे. या पाणलोट क्षेत्रातील ६६ गावांमध्ये एप्रिल ते जून या कालावधीत पाणी टंचाई भासण्याचा गंभीर इशारा या अहवालातून दिला आहे. सोबतच पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना पाण्याचा प्रवाह जास्त काळपर्यंत राहणार नाही. नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शहरांच्या नळ योजनांना व प्रादेशीक नळ योजनांवर लक्ष ठेवावे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद व महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांच्या प्रगतीपथावरील योजना प्राधान्याने पूर्ण कराव्या.हातपंपाची पाईपलाईन वाढविणे व कामे पूर्ण कराव्या, रेती उपस्याकरिता शिफारस केलेल्या रेती घाटांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणावरून रेतीचा उपसा करू देऊ नये, अशा सुचना या अहवालातून देण्यात आलेल्या आहेत.पाणलोट क्षेत्रातील प्रातिनिधिक तीन विहिरींचा समावेश करण्यात आला आहे. माथा ते पायथा अशी पाण्याची पातळी मोजण्यात येते. १९७३ पासून ही पद्धत अविरत सुरू आहे. विहिरींची संख्या वाढली आहे. मागील दोन महिन्यात भूगर्भातून बेसुमार पाणी उपसा सुरू असल्याने सरासरी पाणी पातळीत वेगाने घट झाली आहे. मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे.- विजय भुसारीवरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा भंडारा.