शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

बदलत्या काळानुसार जलसंवर्धन ही सर्वात महत्त्वाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

जिल्हास्तरावर जिल्हा कक्षाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मनीषा कुरसंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर ...

जिल्हास्तरावर जिल्हा कक्षाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मनीषा कुरसंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर जिल्हा कक्षाचे तज्ज्ञ अजय गजापुरे, अंकुश गभने, हेमंत भांडारकर, राजेश येरणे, बबन येरणे, गजाजन भेदे, प्रशांत फाये, आदित्य तायडे, निखील वंजारी आदींची उपस्थिती होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मनीषा कुरसंगे यांनी जल शपथ देऊन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. पिण्याच्या पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन ते सर्वकाळ उपलब्धतेसाठी आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर असे विविध उपक्रम ग्रामस्तरावर राबविण्याचे आवाहन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मनीषा कुरसंगे यांनी जल शपथ देऊन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. पिण्याच्या पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन ते सर्वकाळ उपलब्धतेसाठी आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर असे विविध उपक्रम ग्रामस्तरावर राबविण्याचे आवाहन केले.

भंडारा पंचायत समितीत गट विकास अधिकारी नूतन सावंत यांचे प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी जलशपथ देऊन पिण्याच्या पाण्याची शुध्दता आणि स्त्रोतांची स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले. मोहाडी येथे गट विकास अधिकारी वंजारी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. त्यांनी पंचायत समिती स्तरावर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना जल शपथ दिली. तसेच तुमसर पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या जल शपथ आणि सप्ताह शुभारंभ कार्यक्रमात गट विकास अधिकारी धीरज पाटील यांनी अधिकारी, कर्मचारी यांना पाणी बचतीबाबत शपथ दिली आणि ग्रामस्तरावर पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकांनी आपला सहभाग दर्शवण्याचे आवाहन केले.

लाखनी येथे गट विकास अधिकारी डॉ. जाधव, साकोली येथे गट विकास अधिकारी नीलेश वानखडे तर लाखांदूर येथे गट विकास अधिकारी जी.पी. अगरते यांच्या उपस्थितीत सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. कर्मचाऱ्यांना जलशपथ देऊन पिण्याच्या पाण्याचे महत्त्व सांगण्यात आले. तर पवनी येथे गट विकास अधिकारी वाळूंज मॅडम यांनी कर्मचाऱ्यांना शपथ दिली. २२ मार्च ते २७ मार्च या कालावधीमध्ये पाण्याचे महत्व, पाणी पुरवठ्यासाठी वापरात येणारे जलस्रोत यांचे संवर्धन, संरक्षण आणि जुन्या नादुरुस्त जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी योजनांमधील पाणी गळती थांबविणे गरजेचे आहे. पाणी शुद्धता , पाणी वाचवा, पाणी सुरक्षितता आदीबाबत तालुक्यात गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत स्तरावर सप्ताहभर विविध उपक्रम राबविणार आहेत.

बॉक्स

२२ मार्चला जलशपथ आणि जलसप्ताहाचा शुभारंभ ग्रामपंचायत, शाळा , अगणवाडी स्तरावर शुद्ध पाण्याचे महत्त्व समजावून सांगणे, २४ मार्च रोजी पाणी जपून वापरण्याची आवश्यकता व पद्धती डिजिटल माध्यमांचा वापर करून समजावून सांगणे, २५ मार्च रोजी पिण्याचे पाणी तपासणीमध्ये दूषित आलेल्या स्त्रोतांचे उपाययोजना व दुरुस्तीबाबत माहिती देणे, २६ मार्च रोजी पाणी शुद्धीकरण कार्यपद्धती व टीसीएल वापर याबद्दल, २७ मार्च रोजी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व साठवण टाकीची स्वच्छता करणे, शून्य गळती मोहीम, नादुरुस्त स्त्रोत दुरुस्त करणे आदी उपक्रम राबविले जातील. दरम्यान, सदरचे उपक्रम राबविताना कोरोना प्रतिबंधक नियमानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.