शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या काळानुसार जलसंवर्धन ही सर्वात महत्त्वाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

जिल्हास्तरावर जिल्हा कक्षाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मनीषा कुरसंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर ...

जिल्हास्तरावर जिल्हा कक्षाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मनीषा कुरसंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर जिल्हा कक्षाचे तज्ज्ञ अजय गजापुरे, अंकुश गभने, हेमंत भांडारकर, राजेश येरणे, बबन येरणे, गजाजन भेदे, प्रशांत फाये, आदित्य तायडे, निखील वंजारी आदींची उपस्थिती होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मनीषा कुरसंगे यांनी जल शपथ देऊन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. पिण्याच्या पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन ते सर्वकाळ उपलब्धतेसाठी आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर असे विविध उपक्रम ग्रामस्तरावर राबविण्याचे आवाहन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मनीषा कुरसंगे यांनी जल शपथ देऊन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. पिण्याच्या पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन ते सर्वकाळ उपलब्धतेसाठी आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर असे विविध उपक्रम ग्रामस्तरावर राबविण्याचे आवाहन केले.

भंडारा पंचायत समितीत गट विकास अधिकारी नूतन सावंत यांचे प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी जलशपथ देऊन पिण्याच्या पाण्याची शुध्दता आणि स्त्रोतांची स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले. मोहाडी येथे गट विकास अधिकारी वंजारी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. त्यांनी पंचायत समिती स्तरावर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना जल शपथ दिली. तसेच तुमसर पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या जल शपथ आणि सप्ताह शुभारंभ कार्यक्रमात गट विकास अधिकारी धीरज पाटील यांनी अधिकारी, कर्मचारी यांना पाणी बचतीबाबत शपथ दिली आणि ग्रामस्तरावर पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकांनी आपला सहभाग दर्शवण्याचे आवाहन केले.

लाखनी येथे गट विकास अधिकारी डॉ. जाधव, साकोली येथे गट विकास अधिकारी नीलेश वानखडे तर लाखांदूर येथे गट विकास अधिकारी जी.पी. अगरते यांच्या उपस्थितीत सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. कर्मचाऱ्यांना जलशपथ देऊन पिण्याच्या पाण्याचे महत्त्व सांगण्यात आले. तर पवनी येथे गट विकास अधिकारी वाळूंज मॅडम यांनी कर्मचाऱ्यांना शपथ दिली. २२ मार्च ते २७ मार्च या कालावधीमध्ये पाण्याचे महत्व, पाणी पुरवठ्यासाठी वापरात येणारे जलस्रोत यांचे संवर्धन, संरक्षण आणि जुन्या नादुरुस्त जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी योजनांमधील पाणी गळती थांबविणे गरजेचे आहे. पाणी शुद्धता , पाणी वाचवा, पाणी सुरक्षितता आदीबाबत तालुक्यात गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत स्तरावर सप्ताहभर विविध उपक्रम राबविणार आहेत.

बॉक्स

२२ मार्चला जलशपथ आणि जलसप्ताहाचा शुभारंभ ग्रामपंचायत, शाळा , अगणवाडी स्तरावर शुद्ध पाण्याचे महत्त्व समजावून सांगणे, २४ मार्च रोजी पाणी जपून वापरण्याची आवश्यकता व पद्धती डिजिटल माध्यमांचा वापर करून समजावून सांगणे, २५ मार्च रोजी पिण्याचे पाणी तपासणीमध्ये दूषित आलेल्या स्त्रोतांचे उपाययोजना व दुरुस्तीबाबत माहिती देणे, २६ मार्च रोजी पाणी शुद्धीकरण कार्यपद्धती व टीसीएल वापर याबद्दल, २७ मार्च रोजी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व साठवण टाकीची स्वच्छता करणे, शून्य गळती मोहीम, नादुरुस्त स्त्रोत दुरुस्त करणे आदी उपक्रम राबविले जातील. दरम्यान, सदरचे उपक्रम राबविताना कोरोना प्रतिबंधक नियमानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.