शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

वैनगंगा नदी धरण मार्गावर सीसीटीव्हीचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST

रंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा) : गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगा नदी धरण मार्गावर होणाऱ्या अनुचित घटना ...

रंजित चिंचखेडे

चुल्हाड (सिहोरा) : गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगा नदी धरण मार्गावर होणाऱ्या अनुचित घटना आणि आत्महत्या रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. पर्यटकांची वाढती गर्दी होत असल्याने नियंत्रण ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु चौकशी करताना पोलीस कानावर हात ठेवत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प, अदानी वीज प्रकल्प, खैरबंधा जलाशयात वैनगंगा नदीतील पाणी उपसा करण्यासाठी कवलेवाडा वांगी गावांचे शेजारी धरणांचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरण बांधकामामुळे गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील गावे थेट जोडण्यात आली आहेत. तिरोडा शहरात पोहाेचण्यासाठी सिहोरा परिसरातील नागरिकांना तुमसर गाठून जावे लागते. ४० किमी अंतराचा अतिरिक्त फेरा होत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत होता. धरण बांधकाम झाल्याने या अंतरमध्ये मोठी कपात झाली आहे. सिहोरा आणि तिरोडा शहराला जोडणारे अंतर १३ किमी झाले आहे. या शिवाय सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळाली आहे. भाजीपाला विक्री करीता शेतकरी तिरोडा शहर गाठत आहेत. अदानी व अन्य प्रकल्प आल्याने रोजगाराची साधने निर्माण झाले आहेत.

दरम्यान धरणात पाणी अडविण्यात आले आहेत. पाणी अडविण्यात आल्याने १८ किमी अंतरापर्यंत वैनगंगा नदी पात्रात पाणी आहे. नदी पात्रात पाणी अडविण्यात आल्याने सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. एरवी उन्हाळ्यात विहिरीची पाण्याची खोलवर जाणाऱ्या पातळीला ब्रेक लागला आहे. विहिरी, तलाव, बोरवेल्स, बोड्या, नाले, पाण्याने तुडुंब भरले आहेत. धरणात पाणी अडविण्यात आल्याने विहंगम दृश्य पर्यटकांना भुरळ घालत आहेत. यामुळे पर्यटकांची वाढती गर्दी राहत आहे. याच धरणाचे लगत खुल्या मैदानात ओल्या पार्टी होत आहेत. प्रशासनाने धरण व परिसराला प्रतिबंध क्षेत्र घोषित केला आहे. या आशयाचे फलक लावण्यात आले आहे. परंतु कुणी ऐकत नाहीत, यामुळे भागातील डोहात अनेकांचा हकनाक जीव गेला आहे. सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. आता अनुचित घटना टाळण्यासाठी धरण मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून निगराणी ठेवण्यात येत आहे.

बॉक्स

रस्त्यावर खड्डेच खड्डे

सिहोरा ते तिरोडा १३ किमी अंतराच्या मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. धरणावरून तिरोडा कडे जाणारा मार्ग पूर्णतः उखडला आहे. पायदळ चालनेही कठीण होत आहे. यामुळे वाढते अपघात आहेत. या रस्त्यावरून वाढती वर्दळ राहत असल्याने खड्डेमय झाला आहे. प्रशासनाने रस्ता दुरुस्ती करीता लक्ष घालण्याची गरज आहे. तत्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी भाजपचे युवा नेते किशोर राहगडाले, भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष विनोद पटले, गोंडीटोला ग्रामपंचायत सदस्य शितल चिंचखेडे, धनेगावच्या सरपंच सुषमा पारधी यांनी केली आहे.