शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदी धरण मार्गावर सीसीटीव्हीचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST

रंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा) : गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगा नदी धरण मार्गावर होणाऱ्या अनुचित घटना ...

रंजित चिंचखेडे

चुल्हाड (सिहोरा) : गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगा नदी धरण मार्गावर होणाऱ्या अनुचित घटना आणि आत्महत्या रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. पर्यटकांची वाढती गर्दी होत असल्याने नियंत्रण ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु चौकशी करताना पोलीस कानावर हात ठेवत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प, अदानी वीज प्रकल्प, खैरबंधा जलाशयात वैनगंगा नदीतील पाणी उपसा करण्यासाठी कवलेवाडा वांगी गावांचे शेजारी धरणांचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरण बांधकामामुळे गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील गावे थेट जोडण्यात आली आहेत. तिरोडा शहरात पोहाेचण्यासाठी सिहोरा परिसरातील नागरिकांना तुमसर गाठून जावे लागते. ४० किमी अंतराचा अतिरिक्त फेरा होत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत होता. धरण बांधकाम झाल्याने या अंतरमध्ये मोठी कपात झाली आहे. सिहोरा आणि तिरोडा शहराला जोडणारे अंतर १३ किमी झाले आहे. या शिवाय सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळाली आहे. भाजीपाला विक्री करीता शेतकरी तिरोडा शहर गाठत आहेत. अदानी व अन्य प्रकल्प आल्याने रोजगाराची साधने निर्माण झाले आहेत.

दरम्यान धरणात पाणी अडविण्यात आले आहेत. पाणी अडविण्यात आल्याने १८ किमी अंतरापर्यंत वैनगंगा नदी पात्रात पाणी आहे. नदी पात्रात पाणी अडविण्यात आल्याने सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. एरवी उन्हाळ्यात विहिरीची पाण्याची खोलवर जाणाऱ्या पातळीला ब्रेक लागला आहे. विहिरी, तलाव, बोरवेल्स, बोड्या, नाले, पाण्याने तुडुंब भरले आहेत. धरणात पाणी अडविण्यात आल्याने विहंगम दृश्य पर्यटकांना भुरळ घालत आहेत. यामुळे पर्यटकांची वाढती गर्दी राहत आहे. याच धरणाचे लगत खुल्या मैदानात ओल्या पार्टी होत आहेत. प्रशासनाने धरण व परिसराला प्रतिबंध क्षेत्र घोषित केला आहे. या आशयाचे फलक लावण्यात आले आहे. परंतु कुणी ऐकत नाहीत, यामुळे भागातील डोहात अनेकांचा हकनाक जीव गेला आहे. सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. आता अनुचित घटना टाळण्यासाठी धरण मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून निगराणी ठेवण्यात येत आहे.

बॉक्स

रस्त्यावर खड्डेच खड्डे

सिहोरा ते तिरोडा १३ किमी अंतराच्या मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. धरणावरून तिरोडा कडे जाणारा मार्ग पूर्णतः उखडला आहे. पायदळ चालनेही कठीण होत आहे. यामुळे वाढते अपघात आहेत. या रस्त्यावरून वाढती वर्दळ राहत असल्याने खड्डेमय झाला आहे. प्रशासनाने रस्ता दुरुस्ती करीता लक्ष घालण्याची गरज आहे. तत्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी भाजपचे युवा नेते किशोर राहगडाले, भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष विनोद पटले, गोंडीटोला ग्रामपंचायत सदस्य शितल चिंचखेडे, धनेगावच्या सरपंच सुषमा पारधी यांनी केली आहे.