शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाची प्रतीक्षा

By admin | Updated: December 15, 2015 00:50 IST

मागील काही वर्षापासून शेतकरी आर्थिक संकटात आहे. कधी नैसर्गिक तर कधी राजकीय संकटांचा पारा सहन करीत आहे.

करडी (पालोरा) : मागील काही वर्षापासून शेतकरी आर्थिक संकटात आहे. कधी नैसर्गिक तर कधी राजकीय संकटांचा पारा सहन करीत आहे. या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर झालेला दिसत आहे. संसाराची घडी विस्कटली असून कर्जबाजारीपण वाढले आहे. दुसरीकडे उत्पादनातील वाढती घट, पैशाची चिंता यामुळे राबता शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे. परंतु त्याचे दु:ख कुणालाही दिसत नाही, मात्र ज्यांनी मागणी केली नाही. कमी पगार मिळतो म्हणून आत्महत्या केल्या नाही, त्यांच्यासाठी सातवा वेतन आयोग लावण्याची चिंता शासनाला दिसत आहे.शेतकरी सध्या कीड व रोगांनी आलेल्या दुष्काळाच्या झळा सोसत आहे. विविध पिकांच्या उत्पादनात मागील काही वर्षापासून सातत्याने घट येत आहे. यावर्षी विविध कारणांनी उत्पादन घटले. तुलनेने शेतमालांचा बाजार भाव वाढलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. मात्र सरकार व त्यांचे प्रशासन आपल्याच तालात आहेत. राजकीय लोकांना जनमताची कदर नसल्याचेच दिसत आहे. अच्छे दिनचे नारे देणाऱ्या सरकार कडून अगोदर डॉ.स्वामीनाथन आयोगाची घोषणा करण्याची मागणी होत आहे. परंतु शासन प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात पूर्ण ताकत पणाला लावत आहे. शासन शेतकऱ्यांचे नाव समोर करून विविध योजनांचे गाजर दाखविले. परंतु त्या योजना खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचतात की नाही हे पाहण्याचे कधी सौजन्य दाखविले नाही, असा नाराजीचा सूर शेतकऱ्यांत आहे. त्यांचे म्हणणे समजून उपाययोजना आखण्याची गरज आहे. नोकरदार व दलाल मधल्या मधेच योजना कागदोपत्री दाखवून गहाळ करीत सुटले आहेत. परंतु शासनाचे यांच्यावर कोणतेही अंकुश नाही. लबाडी करताना सापडले तरी कारवाईच्या नावावर तात्पुरते निलंबन दाखवून पुन्हा कामावर घेतले जाते. शेतकरी मात्र नशिबाला दोष देताना दिसतात.शेतात हिरवेगारपणा दिसत असले तरी तुळीच्या शेंगांमध्ये दाणे दिसत नाही. धानाचे तणकट व लोंबा पांढऱ्या पडल्या. रब्बीतील गहू, हरभरा, वटाणा, जवस, मुंग आदी व अन्य पीक वातावरणातील लहरीपणाचा मार सहन करीत आहेत. जवळचा पैसा निघून गेला आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे. शेतकरी शासनाकडे आस लावून आहेत. त्यातच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करावे, अशी मागणी करीत आहेत. (वार्ताहर)