शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाची प्रतीक्षा

By admin | Updated: December 15, 2015 00:50 IST

मागील काही वर्षापासून शेतकरी आर्थिक संकटात आहे. कधी नैसर्गिक तर कधी राजकीय संकटांचा पारा सहन करीत आहे.

करडी (पालोरा) : मागील काही वर्षापासून शेतकरी आर्थिक संकटात आहे. कधी नैसर्गिक तर कधी राजकीय संकटांचा पारा सहन करीत आहे. या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर झालेला दिसत आहे. संसाराची घडी विस्कटली असून कर्जबाजारीपण वाढले आहे. दुसरीकडे उत्पादनातील वाढती घट, पैशाची चिंता यामुळे राबता शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे. परंतु त्याचे दु:ख कुणालाही दिसत नाही, मात्र ज्यांनी मागणी केली नाही. कमी पगार मिळतो म्हणून आत्महत्या केल्या नाही, त्यांच्यासाठी सातवा वेतन आयोग लावण्याची चिंता शासनाला दिसत आहे.शेतकरी सध्या कीड व रोगांनी आलेल्या दुष्काळाच्या झळा सोसत आहे. विविध पिकांच्या उत्पादनात मागील काही वर्षापासून सातत्याने घट येत आहे. यावर्षी विविध कारणांनी उत्पादन घटले. तुलनेने शेतमालांचा बाजार भाव वाढलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. मात्र सरकार व त्यांचे प्रशासन आपल्याच तालात आहेत. राजकीय लोकांना जनमताची कदर नसल्याचेच दिसत आहे. अच्छे दिनचे नारे देणाऱ्या सरकार कडून अगोदर डॉ.स्वामीनाथन आयोगाची घोषणा करण्याची मागणी होत आहे. परंतु शासन प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात पूर्ण ताकत पणाला लावत आहे. शासन शेतकऱ्यांचे नाव समोर करून विविध योजनांचे गाजर दाखविले. परंतु त्या योजना खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचतात की नाही हे पाहण्याचे कधी सौजन्य दाखविले नाही, असा नाराजीचा सूर शेतकऱ्यांत आहे. त्यांचे म्हणणे समजून उपाययोजना आखण्याची गरज आहे. नोकरदार व दलाल मधल्या मधेच योजना कागदोपत्री दाखवून गहाळ करीत सुटले आहेत. परंतु शासनाचे यांच्यावर कोणतेही अंकुश नाही. लबाडी करताना सापडले तरी कारवाईच्या नावावर तात्पुरते निलंबन दाखवून पुन्हा कामावर घेतले जाते. शेतकरी मात्र नशिबाला दोष देताना दिसतात.शेतात हिरवेगारपणा दिसत असले तरी तुळीच्या शेंगांमध्ये दाणे दिसत नाही. धानाचे तणकट व लोंबा पांढऱ्या पडल्या. रब्बीतील गहू, हरभरा, वटाणा, जवस, मुंग आदी व अन्य पीक वातावरणातील लहरीपणाचा मार सहन करीत आहेत. जवळचा पैसा निघून गेला आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे. शेतकरी शासनाकडे आस लावून आहेत. त्यातच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करावे, अशी मागणी करीत आहेत. (वार्ताहर)