शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाची प्रतीक्षा

By admin | Updated: December 15, 2015 00:50 IST

मागील काही वर्षापासून शेतकरी आर्थिक संकटात आहे. कधी नैसर्गिक तर कधी राजकीय संकटांचा पारा सहन करीत आहे.

करडी (पालोरा) : मागील काही वर्षापासून शेतकरी आर्थिक संकटात आहे. कधी नैसर्गिक तर कधी राजकीय संकटांचा पारा सहन करीत आहे. या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर झालेला दिसत आहे. संसाराची घडी विस्कटली असून कर्जबाजारीपण वाढले आहे. दुसरीकडे उत्पादनातील वाढती घट, पैशाची चिंता यामुळे राबता शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे. परंतु त्याचे दु:ख कुणालाही दिसत नाही, मात्र ज्यांनी मागणी केली नाही. कमी पगार मिळतो म्हणून आत्महत्या केल्या नाही, त्यांच्यासाठी सातवा वेतन आयोग लावण्याची चिंता शासनाला दिसत आहे.शेतकरी सध्या कीड व रोगांनी आलेल्या दुष्काळाच्या झळा सोसत आहे. विविध पिकांच्या उत्पादनात मागील काही वर्षापासून सातत्याने घट येत आहे. यावर्षी विविध कारणांनी उत्पादन घटले. तुलनेने शेतमालांचा बाजार भाव वाढलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. मात्र सरकार व त्यांचे प्रशासन आपल्याच तालात आहेत. राजकीय लोकांना जनमताची कदर नसल्याचेच दिसत आहे. अच्छे दिनचे नारे देणाऱ्या सरकार कडून अगोदर डॉ.स्वामीनाथन आयोगाची घोषणा करण्याची मागणी होत आहे. परंतु शासन प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात पूर्ण ताकत पणाला लावत आहे. शासन शेतकऱ्यांचे नाव समोर करून विविध योजनांचे गाजर दाखविले. परंतु त्या योजना खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचतात की नाही हे पाहण्याचे कधी सौजन्य दाखविले नाही, असा नाराजीचा सूर शेतकऱ्यांत आहे. त्यांचे म्हणणे समजून उपाययोजना आखण्याची गरज आहे. नोकरदार व दलाल मधल्या मधेच योजना कागदोपत्री दाखवून गहाळ करीत सुटले आहेत. परंतु शासनाचे यांच्यावर कोणतेही अंकुश नाही. लबाडी करताना सापडले तरी कारवाईच्या नावावर तात्पुरते निलंबन दाखवून पुन्हा कामावर घेतले जाते. शेतकरी मात्र नशिबाला दोष देताना दिसतात.शेतात हिरवेगारपणा दिसत असले तरी तुळीच्या शेंगांमध्ये दाणे दिसत नाही. धानाचे तणकट व लोंबा पांढऱ्या पडल्या. रब्बीतील गहू, हरभरा, वटाणा, जवस, मुंग आदी व अन्य पीक वातावरणातील लहरीपणाचा मार सहन करीत आहेत. जवळचा पैसा निघून गेला आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे. शेतकरी शासनाकडे आस लावून आहेत. त्यातच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करावे, अशी मागणी करीत आहेत. (वार्ताहर)