शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

कृषी योजनांच्या लाभाची प्रतीक्षा

By admin | Updated: January 14, 2016 00:49 IST

पवनी तालुक्यातील कोंढा व कोसरा दोन्ही गावे मध्यवर्ती गावे असून या गावांची लोकसंख्या १२ हजारच्या आसपास आहे.

कोंढा (कोसरा) : पवनी तालुक्यातील कोंढा व कोसरा दोन्ही गावे मध्यवर्ती गावे असून या गावांची लोकसंख्या १२ हजारच्या आसपास आहे. पण या गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा गेल्या खरीप, रब्बी हंगामात लाभ मिळाला नाही. त्यामुळे विभागाचा उपयोग काय, असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत.तालुका कृषि अधिकारी, कार्यालय पवनी येथे आहे. प्रत्येक मोठ्या गावासाठी कृषी पर्यवेक्षक कृषी विभागाचे आहे. तसेच मंडळ कृषी अधिकारी, कार्यालय कोंढा येथे आहे. सध्या हे कार्यालय पालोरा चौ. येथे स्थलांतरीत झाले आहे. दोन कृषी पर्यवेक्षक कोंढा १ व कोंढा २ यांच्या नेतृत्वात कृषी सहायक गावासाठी आहेत. पण खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिक घेण्यासाठी कोणतेच मार्गदर्शन झाले नाही. कृषी सहायक फक्त कागदी रेकॉर्ड रंगविण्यात धन्यता मानत असल्याने शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही, असा आरोप कोंढा येथील शेतकऱ्यांनी केला आहे. कोंढा, कोसरा येथील कृषी सहायक पद अनेक दिवसापासून रिक्त आहे. इ.डी. पाकमोडे यांचेकडे अतिरिक्त कार्यभार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे दुष्काळी परिस्थितीमुळे कंबरडे मोडले. रब्बी हंगामात कोंढा, कोसरा येथील शेतकऱ्यांना बि-बियानाची मदत मिळाली नाही. पण याचा लाभ कोणालाच मिळाला नाही म्हणून कृषी विभागाविषयी प्रचंड असंतोष शेतकऱ्यात आहे. खरीप हंगामात धानाला अनेक रोग लागले. याची माहिती शेतकरी कृषी केंद्र मालकाकडून घेवून औषधी खरेदी घेवून औषधाची फवारणी करताना दिसले. कोंढा केंद्रात गेल्या ३ वर्षात एकाही शेतकऱ्यांना शासनाच्या बि-बियाणे याची मदत मिळाली नाही. अशावेळी १२ हजार लोकवस्तीचे गाव कृषी विभागाच्या योजनापासून वंचित आहे. कृषी विभाग हा पांढरा हत्ती शेतकऱ्यांसाठी ठरला आहे. शेतकऱ्यांच्या विभागावर प्रचंड नाराजी असल्याने या विभागाने शेतकऱ्यांना शासनाच्या कृषीसंबंधी योजनाची माहिती देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)