शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

वैनगंगा शुद्धीकरणाला आणखी चार वर्षे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:40 IST

एकेकाळी भंडारा जिल्ह्यासाठी ‘जीवनदायिनी’ ठरलेली वैनगंगा नदीचे पात्र ‘जीवघेणे’ ठरत आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे : शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू, तरीही लागणार वेळ

आॅनलाईन लोकमतभंडारा : एकेकाळी भंडारा जिल्ह्यासाठी ‘जीवनदायिनी’ ठरलेली वैनगंगा नदीचे पात्र ‘जीवघेणे’ ठरत आहे. नागपूरच्या नागनदीचे सांडपाणी लाखो हेक्टर जमिन सिंचित करणाऱ्या गोसेखुर्द धरणात सोडले जात आहे. त्यामुळे वैनंगगा नदी प्रदूषित झाली आहे. या नदीच्या शुद्धीकरणासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले तरी ही नदी शुद्धीकरणासाठी आणखी चार वर्षे लागणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे यांनी सांगितले.पालकमंत्री झाल्यानंतर दर शनिवारला भंडाऱ्यात येण्याचे जाहीर केल्यानंतर ते जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आले होते. तत्पूर्वी विश्रामगृहात पत्रकारांकडून जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा केली. यावेळी एका प्रश्नावर त्यांनी ही माहिती दिली.यावेळी ना.बावनकुळे म्हणाले, नागनदीचे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. आतापर्यंत केवळ ७० टक्के पाणी कोराडी, मौदा येथे रोखण्याचे काम झाले आहे. उर्वरित ३० टक्के पाणी वैनगंगा नदीत येत आहे. हे पाणी पूर्णत रोखण्यासाठी उमरेडकडे वळवावे लागणार आहे. त्यासाठी आणखी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दूषित पाण्याची समस्या तूर्तास तरी दूर होण्याची शक्यता नाही.भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे वाढीव २५ कोटी रूपयांची मागणी आपण केली असून त्या निधीतून रखडलेली कामे मार्गी लावण्यात येतील. याशिवाय जिल्हा नियोजनातून कपात केलेला ३० टक्के निधीही परत आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे या जिल्ह्याची जबाबदारी असल्यामुळे आता भंडारा जिल्ह्यातील विकास दिसू लागेल, याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.केव्हा संपणार या यातना?नागपूर शहरातील सांडपाणी नाग नदीतून जाते. त्यामुळे ही नदी दूषित झाली आहे. आता या नदीतील पाणी गोसेखुर्द धरणात जावून मिळत आहे. एकीकडे जलस्तर वाढविण्यासाठी गोसेखुर्दचे पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे बॅकवॉटरमुळे धरण ते भंडारापर्यंत जलस्तर वाढला आहे. त्याचा फटका नदी काठावर वसलेल्या भंडारा शहरासह अनेक गावांना बसत आहे. परिणामी नदी काठावरील पाणीपुरवठा योजनाही प्रभावित झाली आहे.