स्वातंत्र्याचा अर्थ कागदावरच : विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक संख्यालक्ष्मीकांत तागडे - गोसेस्वातंत्र्यानंतर आज सर्व समाजाने प्रगती केली. संगणक, इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन माहिती मिळू लागल्याने विकासाची भरमसाट झाली. तरीही भटक्या जमातीतील वडार समाज, आपल्या भटकंतीत जाती पाती राबवत आहे तसेच भांड्याच्या मोबदल्यात केस विकत घेण्याचा व्यवसाय करीत आहे. त्यांच्यावर शिक्षणाची सुर्याची किरणे अजुनपर्यंत पडली नसल्यामुळे हा समाज अजुनही शिक्षणापासून वंचित आहे.भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या पूर्व विदर्भातील जिल्ह्यातील गावामध्ये भटक्या जमातीतील वडार समाज इतर भटक्या जाती प्रमाणे वर्षातील सात महिने पोटासाठी भटकत असतो. या समाजाचा मुख्य व्यवसाय जाती पाटी तयार करणे, टाचवणे हाचआहे. या समाजाच्या महिला भटकंती करून गावात फिरून भांड्यावर केस विकत घेणे हाच आहे. या अगोदर याच महिला फुग्यावर केस विकत घेत होत्या. या वडार समाजाची गडचिरोली जिल्ह्यातील कुरूड गावात मोठी वस्ती आहे. पण त्यांचे जीवन हे भटकंतीतच वर्षभर जाते. भटक्या समाजाचे वडार जातीचे हे महिला पुरूष आपले कुटूंब उपयोगी भांडी घेवून प्रत्येक गावात ८ ते १० दिवस मुक्काम करून नंतर पुढच्या मुक्कामाला दुसऱ्या गावाला जात असतात. या समाजातील लोकांना ना घर आहे ना शेती. मुक्कामाच्या गावी त्यांचे आकाश छत आहे तर झोपायला धरती आहे. या समाजातील भटक्यांवर शिक्षणाचा सुर्यप्रकाशाची किरणे अजूनपर्यंत पडली नाही. शिक्षण काय आहे हे त्यांना माहित नाही. मुलांना शिकविण्यास ही भटकी समाज असमर्थ आहे. या समाजाला शिक्षणाप्रती जागृक करणे गरजेचे आहे. वडार समाजाला गुरूपोर्णिमेशिवाय कोणताही सण माहित नाही गुरूपोर्णिमेच्या दिवशी आपल्या देवाला कोंबडा कापने हाच त्यांचा मोठा सण आहे. भांडी देवून केस विकत घेणाऱ्या वडार समाजाच्या महिला घेतलेले केस नागपूरला प्रती किलो ७०० रूपये किलो भावाने विकतात एक महिला साधारण पणे १५० ग्रॅम केस एका दिवसात जमा करते. या वडार समाजाला समाजाच्या मुख्य धारेत आणण्याकरीता अनेक वर्ष लागतील तरीही शासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी या समाजाची प्रगती करण्याकरीता प्रयत्न करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
वडार समाज विकासापासून कोसो दूर
By admin | Updated: June 23, 2014 23:41 IST