शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल नामाचा गजर :

By admin | Updated: July 16, 2016 00:34 IST

आषाढी एकादशीनिमित्त पवनी येथे भाविकांनी दिंडी काढली. ताळ व मुदृंगाच्या गजरात विठ्ठल...... विठ्ठल....विठ्ठल

कोल्हापूर : गेले पाच दिवस संपूर्ण राज्यात अडतीवरून फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा मार्केटमध्ये झालेली कोंडी अखेर शुक्रवारी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत व खासदार राजू शेट्टी यांच्या मध्यस्थीमुळे फुटली. आज, शनिवारपासून सौदे सुरू करण्याचा निर्णय कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी घेतला असून, सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत अडत भरण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. नियमनमुक्त व सहा टक्के अडत व्यापाऱ्यांकडून वसुलीबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात सोमवार (दि. ११) पासून व्यापाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. शुक्रवारी सकाळी सदाभाऊ खोत व राजू शेट्टी यांनी बाजार समितीत व्यापारी, शेतकऱ्यांशी चर्चा केली. नियमन हे व्यापाऱ्यांबरोबर समितीलाही मारक आहे. अडत व्यापाऱ्यांकडून वसुली केली तर त्यांचा बोजा ग्राहकांवर पडणार; तरीही सरकारच्या विरोधात व्यापारी जाणार नसल्याचे नंदकुमार वळंजू यांनी सांगितले. आर. वाय. पाटील, राजेंद्र लायकर, जयवंत वळंजू यांनी बाजू मांडली. दुष्काळ व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे निसर्गाच्या तावडीतून राहिलेला माल सडून निघाल्याचे सांगत जगाच्या पाठीवर केवळ शेतीमालच लिलावात विकला जातो. आमचा लिलाव तर करताच; पण त्यात वेठीस धरू नका. परवडत असेल तर माल घ्या. अडतीचा मुद्दा प्रतिष्ठेचा करणे योग्य नाही. अडतीचे पैसे वजा करूनच तुम्ही दर बोलणार; त्यामुळे यात शेतकऱ्यांचाच तोटा होणार आहे. अनेक वर्षांच्या लढाईला यश आले. आठमुठे धोरण न घेता संप मागे घेण्याची विनंती शेट्टी यांनी केली. दहा वर्षांपूर्वी आघाडी सरकारने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी आता सुरू असली तरी इतर राज्यांत तो कसा राबविला जातो, याच्या अभ्यासासाठी समितीची नेमली असून कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा उद्देश नाही. समितीच्या अहवालात त्रुटी असल्या तरी त्यांच्यावर चर्चेस सरकार तयार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन संप मागे घेत शनिवारपासून सौदे सुरू करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे, सभापती परशराम खुडे, उपसभापती विलास साठे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शेट्टी यांनी बारामती येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या एक रुपया पट्टीचे उदाहरण दिले. यावर कोल्हापुरात असे होत नसल्याचे वळंजू यांनी सांगितले. त्यांना रोखत ‘सगळे चांगले सांगू नका; शंभर पोती फ्लॉवर विकून भाडेसुद्धा हातात पडत नसल्याचे एका शेतकऱ्याने बैठकीत सांगितल्याने गोंधळ उडाला. अखेर शेतकऱ्यांना शांत करीत ते व्यासपीठ वेगळे असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. पिस्तूल घेऊन बैठकीला येणारी ‘बांडगुळे’व्यापाऱ्यांना बांडगुळे, कसाई म्हटले जाते; पण आमच्यामुळेच परिवर्तन घडल्याचे व्यापारी आर. वाय. पाटील यांनी शेट्टी यांना उद्देशून सांगितले. ‘बांडगुळे’ हा शब्द कोल्हापूरमधील व्यापाऱ्यांबद्दल वापरला नाही; तर कमरेला पिस्तूल लावून बैठकीला येणाऱ्या व्यापाऱ्यांबद्दल बोललो. असा वर्ग व्यापाऱ्यांमध्ये असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. ‘टीडीएस’बाबत वित्तमंत्र्यांना भेटणारयावर याबाबत शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र घेऊन आपण स्वत: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.अडत व्यापाऱ्यांनी दिली तर त्यावर पाच टक्के ‘टीडीएस’ द्यावा लागणार असल्याचे सदानंद कोरगावकर यांनी निदर्शनास आणून दिले.