शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

विठ्ठल नामाचा गजर :

By admin | Updated: July 16, 2016 00:34 IST

आषाढी एकादशीनिमित्त पवनी येथे भाविकांनी दिंडी काढली. ताळ व मुदृंगाच्या गजरात विठ्ठल...... विठ्ठल....विठ्ठल

कोल्हापूर : गेले पाच दिवस संपूर्ण राज्यात अडतीवरून फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा मार्केटमध्ये झालेली कोंडी अखेर शुक्रवारी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत व खासदार राजू शेट्टी यांच्या मध्यस्थीमुळे फुटली. आज, शनिवारपासून सौदे सुरू करण्याचा निर्णय कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी घेतला असून, सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत अडत भरण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. नियमनमुक्त व सहा टक्के अडत व्यापाऱ्यांकडून वसुलीबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात सोमवार (दि. ११) पासून व्यापाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. शुक्रवारी सकाळी सदाभाऊ खोत व राजू शेट्टी यांनी बाजार समितीत व्यापारी, शेतकऱ्यांशी चर्चा केली. नियमन हे व्यापाऱ्यांबरोबर समितीलाही मारक आहे. अडत व्यापाऱ्यांकडून वसुली केली तर त्यांचा बोजा ग्राहकांवर पडणार; तरीही सरकारच्या विरोधात व्यापारी जाणार नसल्याचे नंदकुमार वळंजू यांनी सांगितले. आर. वाय. पाटील, राजेंद्र लायकर, जयवंत वळंजू यांनी बाजू मांडली. दुष्काळ व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे निसर्गाच्या तावडीतून राहिलेला माल सडून निघाल्याचे सांगत जगाच्या पाठीवर केवळ शेतीमालच लिलावात विकला जातो. आमचा लिलाव तर करताच; पण त्यात वेठीस धरू नका. परवडत असेल तर माल घ्या. अडतीचा मुद्दा प्रतिष्ठेचा करणे योग्य नाही. अडतीचे पैसे वजा करूनच तुम्ही दर बोलणार; त्यामुळे यात शेतकऱ्यांचाच तोटा होणार आहे. अनेक वर्षांच्या लढाईला यश आले. आठमुठे धोरण न घेता संप मागे घेण्याची विनंती शेट्टी यांनी केली. दहा वर्षांपूर्वी आघाडी सरकारने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी आता सुरू असली तरी इतर राज्यांत तो कसा राबविला जातो, याच्या अभ्यासासाठी समितीची नेमली असून कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा उद्देश नाही. समितीच्या अहवालात त्रुटी असल्या तरी त्यांच्यावर चर्चेस सरकार तयार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन संप मागे घेत शनिवारपासून सौदे सुरू करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे, सभापती परशराम खुडे, उपसभापती विलास साठे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शेट्टी यांनी बारामती येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या एक रुपया पट्टीचे उदाहरण दिले. यावर कोल्हापुरात असे होत नसल्याचे वळंजू यांनी सांगितले. त्यांना रोखत ‘सगळे चांगले सांगू नका; शंभर पोती फ्लॉवर विकून भाडेसुद्धा हातात पडत नसल्याचे एका शेतकऱ्याने बैठकीत सांगितल्याने गोंधळ उडाला. अखेर शेतकऱ्यांना शांत करीत ते व्यासपीठ वेगळे असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. पिस्तूल घेऊन बैठकीला येणारी ‘बांडगुळे’व्यापाऱ्यांना बांडगुळे, कसाई म्हटले जाते; पण आमच्यामुळेच परिवर्तन घडल्याचे व्यापारी आर. वाय. पाटील यांनी शेट्टी यांना उद्देशून सांगितले. ‘बांडगुळे’ हा शब्द कोल्हापूरमधील व्यापाऱ्यांबद्दल वापरला नाही; तर कमरेला पिस्तूल लावून बैठकीला येणाऱ्या व्यापाऱ्यांबद्दल बोललो. असा वर्ग व्यापाऱ्यांमध्ये असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. ‘टीडीएस’बाबत वित्तमंत्र्यांना भेटणारयावर याबाबत शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र घेऊन आपण स्वत: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.अडत व्यापाऱ्यांनी दिली तर त्यावर पाच टक्के ‘टीडीएस’ द्यावा लागणार असल्याचे सदानंद कोरगावकर यांनी निदर्शनास आणून दिले.