शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

धुळवडीला आष्टीत भरणार ‘गरदेवा’ची यात्रा

By admin | Updated: March 24, 2016 01:21 IST

गत शंभर वर्ष जुनी परंपरेनुसार मेघनाथ, वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी धुळवडीच्या दिवशी गरदेवाची पूजा करण्याबरोबरच

राहुल भुतांगे ल्ल तुमसर गत शंभर वर्ष जुनी परंपरेनुसार मेघनाथ, वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी धुळवडीच्या दिवशी गरदेवाची पूजा करण्याबरोबरच यात्रेलाही महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी लगतच्या मध्यप्रदेशासह दूरवरून भाविकांचे यात्रेसाठी येणे सुरु झाले आहे.विविध ठिकाणी विशेष उत्सवाचे औचित्य साधून यात्रेचे आयोजन होत असले तरी तालुक्यातल्या आष्टी येथे मरणाऱ्या गरदेवाची यात्रा ही आपल्या विशेषत्वाने प्रसिद्ध आहे. मेघनाथ वरूण राजाला प्रसन्न ठेवण्यासाठी ही यात्रा भरविण्यात येते, अशी समजूत आहे. बावनथडी नदीच्या काठावर वसलेल्या समृद्ध अशा आष्टी गावात सातत्याने कोरडा दुष्काळ पडला. त्यामुळे वरूण राजाची कृपादृष्टी सदैव राहावी म्हणून मेघनाथाची म्हणजेच गरदेवाची पूजा धुळवडीच्या दिवशी आष्टीवासीयांनी केली.ती परंपरा आजही जोपसली आहे. या यात्रेचे वैशिष्ट्ये म्हणजे गरजदेवाला लागणारी अखंड लाकडे आहेत. ती लाकडे लगतच्या व परिसरातील जंगलातून दर चार चार वर्षांनी शंभर ते दीडशे बैलजोड्याच्या माध्यमातून आणले जातात. यातील लाकूड तर मादी प्रजातीचे आहेत हे आपसूकच पुजारी व गावकरी ओळखतात. जंगलातील सांडापैकी एकमेकांची सावली एकमेकांवर पडत असेल अशाच झाडांची निवड गरदेवाच्या पूजेसाठी केली जाते. अशी झाडे जंगलात शोधणे जरा कठीणच आहे. मात्र गरदेवाच्या पुजाऱ्याला नेमकी जागा व झाडे दिसत असल्याने नेमक्या त्याच ठिकाणातून गरदेवाच्या पूजेकरिता लाकडे दर चार चार वर्षांनी शंभर दीडशे बैल जोड्याच्या सहाय्याने ओढत आणतात. लाकुड आणत असताना ते लाकूड चांगल्या रस्त्यावर कुठेही अडून पडले की नारळ फोडल्या जाते व नंतरच ते लाकूड पुढे सरकत असते. असे त्या लाकडांचे महत्व असून याच लाकडांना वांगा लावला असतो. त्या वांग्याचे पूजारी चार फोडी करून चारही बाजूला फेकण्यात येते. असा प्रकार प्राचीन काळापासून सुरूच आहे. त्यामुळे दूरवरून भाविक याठिकाणी येत असतात. भाविकांचे मनोरंजन व्हावे याकरिता यात्रेचेही आयोजन होत असते. याठिकाणी टुरिंग टॉकीज, सर्कस, मौत का कुआ जादूगर आदी यात्रेत येत असल्याने ही यात्रा जवळपास सव्वा महिना चालत असे. मात्र कालांतराने यात्रेचे स्वरुप लहान जरी झाले असले तरी गरदेव, मेघनाथच्या पूजेला महत्व प्राप्त झाल्याने भाविकांची रिघ या ठिकाणी लागते.मानेगावात दर्शनासाठी गर्दी४मानेगाव (बाजार) येथे होळी सणानिमित्त गरदेवाची यात्रा भरणार असून भाविकांची गर्दी उसळणार आहे. गावाला रघुजी राजे भोसले यांचे वास्तव्य लाभलेले असल्याने त्यांच्या काळापासून हा उत्सव अविरतपणे येथील नागरिकांनी जोपासला आहे. येथील हनुमान मंदिर आजही प्राचीन कलेची साक्ष देत आहे. मंदिराच्या पूर्व दिशेला निसर्गरम्य ठिकाण गरदेव आहे. दोन खांब उभे असलेली ही प्रतिकृती लोकांचे लक्ष वेधून घेते. धुळवडीच्या दिवशी दुपारी ३ वाजतापासून उत्सवाला सुरुवात होत असते. या उत्सवात सर्व जातीधर्माचे नागरिक सहभाग होत असून एकात्मतेची भावना जोपासली जात आहे.