शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

धुळवडीला आष्टीत भरणार ‘गरदेवा’ची यात्रा

By admin | Updated: March 24, 2016 01:21 IST

गत शंभर वर्ष जुनी परंपरेनुसार मेघनाथ, वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी धुळवडीच्या दिवशी गरदेवाची पूजा करण्याबरोबरच

राहुल भुतांगे ल्ल तुमसर गत शंभर वर्ष जुनी परंपरेनुसार मेघनाथ, वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी धुळवडीच्या दिवशी गरदेवाची पूजा करण्याबरोबरच यात्रेलाही महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी लगतच्या मध्यप्रदेशासह दूरवरून भाविकांचे यात्रेसाठी येणे सुरु झाले आहे.विविध ठिकाणी विशेष उत्सवाचे औचित्य साधून यात्रेचे आयोजन होत असले तरी तालुक्यातल्या आष्टी येथे मरणाऱ्या गरदेवाची यात्रा ही आपल्या विशेषत्वाने प्रसिद्ध आहे. मेघनाथ वरूण राजाला प्रसन्न ठेवण्यासाठी ही यात्रा भरविण्यात येते, अशी समजूत आहे. बावनथडी नदीच्या काठावर वसलेल्या समृद्ध अशा आष्टी गावात सातत्याने कोरडा दुष्काळ पडला. त्यामुळे वरूण राजाची कृपादृष्टी सदैव राहावी म्हणून मेघनाथाची म्हणजेच गरदेवाची पूजा धुळवडीच्या दिवशी आष्टीवासीयांनी केली.ती परंपरा आजही जोपसली आहे. या यात्रेचे वैशिष्ट्ये म्हणजे गरजदेवाला लागणारी अखंड लाकडे आहेत. ती लाकडे लगतच्या व परिसरातील जंगलातून दर चार चार वर्षांनी शंभर ते दीडशे बैलजोड्याच्या माध्यमातून आणले जातात. यातील लाकूड तर मादी प्रजातीचे आहेत हे आपसूकच पुजारी व गावकरी ओळखतात. जंगलातील सांडापैकी एकमेकांची सावली एकमेकांवर पडत असेल अशाच झाडांची निवड गरदेवाच्या पूजेसाठी केली जाते. अशी झाडे जंगलात शोधणे जरा कठीणच आहे. मात्र गरदेवाच्या पुजाऱ्याला नेमकी जागा व झाडे दिसत असल्याने नेमक्या त्याच ठिकाणातून गरदेवाच्या पूजेकरिता लाकडे दर चार चार वर्षांनी शंभर दीडशे बैल जोड्याच्या सहाय्याने ओढत आणतात. लाकुड आणत असताना ते लाकूड चांगल्या रस्त्यावर कुठेही अडून पडले की नारळ फोडल्या जाते व नंतरच ते लाकूड पुढे सरकत असते. असे त्या लाकडांचे महत्व असून याच लाकडांना वांगा लावला असतो. त्या वांग्याचे पूजारी चार फोडी करून चारही बाजूला फेकण्यात येते. असा प्रकार प्राचीन काळापासून सुरूच आहे. त्यामुळे दूरवरून भाविक याठिकाणी येत असतात. भाविकांचे मनोरंजन व्हावे याकरिता यात्रेचेही आयोजन होत असते. याठिकाणी टुरिंग टॉकीज, सर्कस, मौत का कुआ जादूगर आदी यात्रेत येत असल्याने ही यात्रा जवळपास सव्वा महिना चालत असे. मात्र कालांतराने यात्रेचे स्वरुप लहान जरी झाले असले तरी गरदेव, मेघनाथच्या पूजेला महत्व प्राप्त झाल्याने भाविकांची रिघ या ठिकाणी लागते.मानेगावात दर्शनासाठी गर्दी४मानेगाव (बाजार) येथे होळी सणानिमित्त गरदेवाची यात्रा भरणार असून भाविकांची गर्दी उसळणार आहे. गावाला रघुजी राजे भोसले यांचे वास्तव्य लाभलेले असल्याने त्यांच्या काळापासून हा उत्सव अविरतपणे येथील नागरिकांनी जोपासला आहे. येथील हनुमान मंदिर आजही प्राचीन कलेची साक्ष देत आहे. मंदिराच्या पूर्व दिशेला निसर्गरम्य ठिकाण गरदेव आहे. दोन खांब उभे असलेली ही प्रतिकृती लोकांचे लक्ष वेधून घेते. धुळवडीच्या दिवशी दुपारी ३ वाजतापासून उत्सवाला सुरुवात होत असते. या उत्सवात सर्व जातीधर्माचे नागरिक सहभाग होत असून एकात्मतेची भावना जोपासली जात आहे.