शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

कोरोना काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन, चालकांना ९९ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:23 IST

भंडारा : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. मात्र आता नियमांत शिथिलता मिळाल्याने गेल्या ...

भंडारा : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. मात्र आता नियमांत शिथिलता मिळाल्याने गेल्या काही दिवसांत अनेकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने वाहतूक शाखेतर्फे वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. यात सर्वाधिक सीटबेल्ट न लावलेल्या चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. सीट बेल्ट न लावणाऱ्या चालकांना ०९ लाख १३ हजार दोनशे रुपयांचा दंड केला आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाने भीषण परिस्थिती निर्माण केली होती. अनेकांना रुग्‍णालयांत बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत होती. अनेकांना नागपूरला जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. यावेळी वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक संचारबंदसह, कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले होते. अशातच वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये ट्रिपलसीट, विनापरवाना वाहन चालविणे, धोकादायक वाहन चालविणे, फॅन्सीनंबर प्लेट, विनालायसन्स, ओव्हरस्पीड, नो पार्किंग, विनाहेल्मेट अशा विविध कारणांमुळे त्यांच्यावर दंड आकारण्यात आला आहे. कोरोना संसर्ग कमी झाला असला तरीही वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहनही वाहतूक शाखेतर्फे करण्यात येत आहे.

बॉक्स

ट्रिपलसीट जाणाऱ्या १९५५ जणांवर कारवाई

जिल्हा वाहतूक शाखेतर्फे ट्रिपलसीट प्रवास करणाऱ्या १०५५ जणांवर कारवाई करून तीन लाख ९१ हजार दंड आकारला आहे. तर विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या १७७३ जणांवर नो पार्किंग १३९५, मोबाइलवर बोलणारे २०५, तर विनानंबर प्लेट ३१५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

बॉक्स

ओवर स्पीडने जाणाऱ्या १३३० जणांना दंड

राष्ट्रीय महामार्गावरून वाहने भरधाव वेगाने धावतात. अशा वेळी वाहनधारकांना लक्षातही येत नाही. मात्र वाहतुकीचे नियंत्रण व्हावे, अपघात कमी व्हावे यासाठी ओव्हर स्पीडने वाहणे चालवणाऱ्या १३३० वाहनांवर कारवाई करून १३ लाख ३० हजार रुपये दंड आकारला आहे. या व्यतिरिक्त धोकादायक वाहन चालविणाऱ्या २१४ वाहनांवर दोन लाख १४ हजार रुपयांचा दंड आकारला आहे.

बॉक्स

कोरोना काळात ३६ हजार वाहनांवर कारवाई

भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असला तरी जिल्ह्यातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग व जिल्ह्याला लाभलेले नैसर्गिक वैभव यामुळे भंडारा जिल्ह्यातून नेहमीच वाहतुकीची वर्दळ सुरू असते. वेग नियंत्रित करून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे आतापर्यंत ३६ हजार वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना घाबरत आहेत.