शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

कोरोना नियमांचे उल्लंघन, आता दुप्पट दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST

भंडारा : जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा दुपटीने वाढत असून, नागरिक कोरोना नियमांचे पालन करीत असल्याचे दिसत नाही. आता ...

भंडारा : जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा दुपटीने वाढत असून, नागरिक कोरोना नियमांचे पालन करीत असल्याचे दिसत नाही. आता अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दुप्पट दंड ठोठावला जाणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक आदेश निर्गमित केला आहे. त्यात मास्कसह गृहविलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पथक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भंडारा जिल्ह्यात गत आठवडाभरापासून कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. मात्र, नागरिक सर्व नियम पायदळी तुडवून भटकंती करताना दिसत आहेत. अनेक जण मास्क न लावता शहरात फिरताना दिसतात. तसेच गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. हा प्रकार लक्षात येताच जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी यापूर्वी असलेल्या दंडामध्ये तब्बल दुप्पट वाढ केली आहे. पूर्वी मास्क न लावणाऱ्या सर्वांना १०० रुपये दंड ठोठावला जात होता. परंतु आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा दंड लावला जाणार आहे. आस्थापना, दुकान, संस्था, प्रतिष्ठानांच्या संचालकांनी मास्क न लावल्याचे आढळल्यास त्यांना ५०० रुपये दंड, आस्थापनेत कार्यरत खासगी कर्मचाऱ्यांना २०० रुपये दंड, हाॅटेल, बार व खाद्यपदार्थ सेवा देणाऱ्या संस्थांमधील कर्मचारी, वेटर यांना २०० रुपये दंड, लाॅन, सभागृह, नाट्यगृह, मंगल कार्यालयात आदींच्या मालक संचालकांना ५०० रुपये, तर कार्यरत कर्मचाऱ्यांना २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावलेल्या व्यक्तिंना २०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या वेळेस उल्लंघन केल्यास व दंड न भरल्यास संबंधित आस्थापना सात दिवसांसाठी सील करण्याचे निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.

बाॅक्स

मंगल कार्यालयांना १० हजार दंड

लाॅन, सभागृह, मंगल कार्यालये, हाॅल या ठिकाणी एकाच वेळी ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळून आल्यास आस्थापना मालक - संचालकांना १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. पूर्वी हा दंड पाच हजार रुपये होता. यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीत मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे, सॅनिटायझरची व्यवस्था नसणे, यासाठी बाजार समिती सचिवाला दहा हजार रुपये, दुकानदार व विक्रेत्याला २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच मिरवणुका, लग्नकार्य, वरात, घरगुती कार्यक्रम या ठिकाणी ५०पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास आयोजकांवर दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

बाॅक्स

गृह विलगीकरणाचा भंग केल्यास संस्थात्मक विलगीकरण

कोरोना संसर्ग झाल्यानंतर अनेकजण गृह विलगीकरणात आहेत. मात्र, त्यातील काही जण नियमांचे उल्लंघन करुन भटकंती करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा संबंधित व्यक्तिंना दहा हजार रुपये दंडासह त्यांची रवानगी संस्थात्मक विलगीकरण केंद्रात करण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.