शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत सिहोरा परिसरातील गावांना ‘डच्चू’

By admin | Updated: April 12, 2016 00:34 IST

सलग दोन वर्षापासून प्रती एकरी २८० किलो धानाचे उत्पादन घेणाऱ्या सिहोरा परिसरातील गावांना दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत डच्चु देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांत नाराजीचा सूर : एकाही गावांचा समावेश नाहीचुल्हाड (सिहोरा) : सलग दोन वर्षापासून प्रती एकरी २८० किलो धानाचे उत्पादन घेणाऱ्या सिहोरा परिसरातील गावांना दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत डच्चु देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांत नाराजीचा सुर आहे.सिहोरा परिसरात शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. परंतु या प्रकल्पात २०१३ पासून ठिक ठाक नाही. पावसाळ्यात प्रकल्प पाण्याचा उपसा करित आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून निसर्गाने अल्प पावसाची हजेरी लावली आहे. निसर्गाच्या पाण्यावर एरवी चांदपुर जलाशयाने ओव्हरफलो पर्यंत मजल मारली आहे. परंतु नाल्यावर जागो जागी बंधारे बांधकाम करण्यात आल्याने चांदपुर जलाशयात निसर्गाचे पाणी पावसाळ्यात पोहचत नाही. या शिवाय बावनथडी नदी पात्राची अशिच अवस्था आहे. दोन महिने पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारे नदीचे पात्र पाण्यासाठी त्रस्त होत आहे. या आधी वर्षभर या पात्राने पाण्याचा अनुभव घेतला आहे. या नदीवर राजीव सागर धरणात पाणी अडविण्यात आल्याने पात्रात वाहणारे पाण्याचे स्त्रोत बंद झाले आहे.सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प सोबत संलग्नीत असणाऱ्या ३९ गावात शेतकऱ्यांचे चांगभल असल्याचे शासनाच्या नोंदीत दिसून येत आहे. परंतु परिसरात चित्र उलटेच आहे. गेल्या खरीप हंगामात पावसाने दडी मारली असता धानाची रोवणी उशिरा झाली. रोवणी करणारा कालावधी ओलांडल्याने उत्पादनाचा परिणाम शेतकऱ्यांना भोवला. प्रती एकरी २८० किलो धानाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले. यामुळे पाठबंधारे विभागाची पाणी पट्टी कराची वसुली प्रभावित झाली. विविध सेवा सहकारी संस्थाची क्राप लोन देण्यासाठी शेतकऱ्यांनी पायरी चढली नाही. शेतकरी मोठ्या संख्येने थकबाकी दार झाले. या शेतकऱ्यांना वर्षभर पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दिल्ली व मुंबई दरबारात नियोजन तयार करण्यात येत नाही. (वार्ताहर)परिसरात सलग दोन वर्षापासून शेतीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून सावरण्यासाठी पाणीपट्टी कराच्या वसुलीत सुट दिली पाहिजे. वैनगंगा नदीवर नवीन प्रकल्पाची गरज आहे.-मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघ सिंदपुरी.