शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

पेसा अंतर्गत गावांच्या हिशेबाचा पत्ताच नाही, ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायतीला टाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 01:44 IST

मायखोप ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत झांजरोली, बंदाठे आणि रोठे या पेसा अंतर्गत तीन गावांना शासनाकडून येणाऱ्या निधीचा आणि जमाखर्चाचा हिशेब सरपंच तसेच ग्रामसेवकांकडून पेसा कमिटीला सादर केला जात नाही.

पालघर - मायखोप ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत झांजरोली, बंदाठे आणि रोठे या पेसा अंतर्गत तीन गावांना शासनाकडून येणाऱ्या निधीचा आणि जमाखर्चाचा हिशेब सरपंच तसेच ग्रामसेवकांकडून पेसा कमिटीला सादर केला जात नाही. यानिषेधार्थ ग्रामस्थांनी शुक्रवारी ग्रामपंचायतीला टाळे ठोकून आपला संताप व्यक्त केला.तालुक्यातील मायखोप ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत बंदाठे, झांझरोली आणि रोठे ही तीन पेसा गावे आहेत. बंदाठे ग्रामसभा अध्यक्ष म्हणून संजय रिंजड तर झांझरोली ग्रामसभा अध्यक्ष म्हणून वरखंडे या महिलेची निवड झाली आहे. मागील आर्थिक वर्षात झालेल्या सभेत सरपंच करुणा पाटील आणि ग्रामसेवकाने मागील पेसा निधीचा जमाखर्च आमच्याजवळ सादर केलेला नाही. ३१ मार्च २०१९ ला आर्थिक वर्ष संपल्यानंतरही आजतागायत पेसाच्या निधीचा जमाखर्च आम्हाला दिला नसल्याने ही आदिवासी समाजाची घोर फसवणूक असल्याचे तक्र ारदार संजय रिंजड यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने आम्हाला दिलेल्या पेसाच्या अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवण्याचा डाव असल्याचेही तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले आहे. सरपंचांवर ग्रामपंचायत अधिनियम ३२(१) खाली मंत्रालयात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र सरपंच सत्ताधारी पक्षामध्ये असल्याने राजकीय दडपण आणून त्या तक्र ारीची सुनावणी प्रलंबित ठेवत असल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे.ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार चालत असल्याने आमच्या गावचा विकास खुंटला असून दुसरीकडे मात्र अनधिकृत बांधकामाला ग्रामपंचायत अभय देत आहे. आमच्या पेसा कार्यक्षेत्रात ग्रामपंचायतीला कुठलाच अधिकार नसताना अनधिकृत चाळी, इमारत बांधकाम परवानगी कोणाकडून दिल्या गेल्या आहेत, याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. पेसा अंतर्गत गावांमध्ये सुरू असलेली सर्व अनधिकृत कामे बंद करून पेसा ग्रामसभेच्या परवानगीशिवाय कुठलीच बांधकामे आम्ही आता सुरू ठेवू देणार नाही, असेही उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.घरकूल योजना आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत आलेल्या शौचालयाच्या यादीमध्ये देखील घोळ असून त्याची माहिती देखील पेसा ग्रामसभेला दिली जात नाही. १४ व्या वित्त आयोग निधी खर्चाच्या बाबत अनियमतिता झाल्याचे निदर्शनास आले असून त्यासाठी सरपंच तसेच ग्रामसेवकांनी १ लाख ३० हजारांचा दंडही भरल्याचे सरपंचांनी ‘लोकमत’शी बोलताना मान्य केले आहे. मात्र अन्य आरोपांमध्ये कुठल्याही प्रकारची तथ्यता नसल्याने पंचायत समिती, जिल्हापरिषद आणि आयुक्त कोकणभवन यांनी मला क्लीनचिट दिल्याचे सरपंच करुणा पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शासन पातळीवरून आमच्यावर अन्याय केला जात असल्याने तसेच मायखोप ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. याप्रकरणी आपण उपसरपंच चेतन गावड आणि अन्य लोकांविरोधात सफाळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले.या ग्रामपंचायतीचा मी पाचवा ग्रामसेवक असून प्रत्येक ग्रामसभेत हा विषय चर्चेला असतो. सन २०१५-१६, १६-१७,१७-१८ सालचा जमाखर्च सादर केला जातो, मात्र तो अमान्य केला जातो.- टी बी.भुजबळ,ग्रामसेवक, मायखोप

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतVasai Virarवसई विरार