सूर्यभान खोब्रागडे : कन्हाळगावमध्ये जंगल अधिकार परिषदपवनी : विस्तार हक्काद्वारे ािळालेल्या अधिकारामुळे जंगलाचे व्यवस्थापन गावानेच करावे, त्याची राखण व संवर्धन गावाने करावे, त्यामुळे जंगल हिरवेगार व वनराईने समृद्ध झालेले दिसेल. या उलट सरकारी राखीव जंगले ओसाड दिसतील. जंगल व पर्यावरणाचे रक्षण करण्याकरिता गावात जनजागृती करून संगठन करण्याचे आवाहन जल, जंगल, जमीन, खनीज गावाच्या मालकीचे आहे. ही पंचायत राज कायद्याची संकल्पना मांडून प्रत्यक्षात राज्यात सर्वप्रथम सुरु करणाऱ्या सायगाटा गावाचे सूर्यभान खोब्रागडे यांनी केले.पवनी तालुका विकास परिषद तर्फे कन्हाळगाव येथे आयोजित जंगल अधिकार परिषदेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते.जंगल अधिकार परिषदेत प्रमुख अतिथीमध्ये जबरान ज्योत आंदोलनाचे नेते दामोधर वाढवे, मच्छीमारांचे नेते प्रकाश पचारे, माजी जि.प. अध्यक्षा किसना भानारकर, गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे, पत्रकार लक्ष्मीकांत तागडे, सरपंच माया बावनथडे आदी उपस्थित होते.परिषदेतील चर्चेत सहभाग होताना जबरानजोत आंदोलनाचे नेते दामोधर वाढवे यांनी सांगितले की, पारंपारिक जंगल, पशुपक्ष्यांच्या हक्काचे जंगल सरकार नष्ट करीत आहे. जंगलाचा संबंध पशुपक्षी मानव यांच्याशी आहे. जंगल वाचविणे गरजेचे आहे. जंगल वाचले तर आपले जीवन वाचेल. वनाचे अधिकार गावकऱ्यांना प्राप्त झाले आहे. मच्छीमारांचे नेते प्रकाश पचारे यांनी सांगितले की, चारं, बोर, सिरन्या आदी रानमेव्यावर गावकऱ्यांचा अधिकार आहे. गावकऱ्यांना जल, जंगल, जमीन यावर अधिकार मिळावा, जमिनीचे पट्टे मिळावे, येणारा काळ धोक्याचा असल्यामुळे सतर्क राहावे.विलास भोंगाडे यांनी गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांकरिता २२ वर्षापासून लढत असलेल्या संघर्षाचा इतिहास सांगून तालुक्यात पर्यटन वाढीला सर्व काही असूनही येथील पर्यटन वाढीची गरज असल्याचे सांगितले. प्रकल्पग्रस्तांचे, मच्छीमारांचे, शेतकऱ्यांचे, विणकरांचे, जबरान जोतधारकांचे प्रश्न कशारितीने सोडविले जातील. यावर विचार करण्याचे आवाहन केले. पत्रकार लक्ष्मीकांत तागडे यांनी उमरेड, कऱ्हांडला अभयारण्यामुळे तालुक्यातील गावावर कशा प्रकारचे बंधने आल्याची माहिती सांगून वेळ पडल्यास येथील जंगल ही राखीव होणार असल्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले.प्रास्ताविक किसनाताई भानारकर यांनी केले, संचालन गुलाब मेश्राम व आभार प्रदर्शन सरपंच मायाताई बावनथडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
जंगलाचे संवर्धन गावकऱ्यांनी करावे
By admin | Updated: April 25, 2016 00:32 IST