शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

जंगलाचे संवर्धन गावकऱ्यांनी करावे

By admin | Updated: April 25, 2016 00:32 IST

विस्तार हक्काद्वारे ािळालेल्या अधिकारामुळे जंगलाचे व्यवस्थापन गावानेच करावे, त्याची राखण व संवर्धन गावाने करावे,

सूर्यभान खोब्रागडे : कन्हाळगावमध्ये जंगल अधिकार परिषदपवनी : विस्तार हक्काद्वारे ािळालेल्या अधिकारामुळे जंगलाचे व्यवस्थापन गावानेच करावे, त्याची राखण व संवर्धन गावाने करावे, त्यामुळे जंगल हिरवेगार व वनराईने समृद्ध झालेले दिसेल. या उलट सरकारी राखीव जंगले ओसाड दिसतील. जंगल व पर्यावरणाचे रक्षण करण्याकरिता गावात जनजागृती करून संगठन करण्याचे आवाहन जल, जंगल, जमीन, खनीज गावाच्या मालकीचे आहे. ही पंचायत राज कायद्याची संकल्पना मांडून प्रत्यक्षात राज्यात सर्वप्रथम सुरु करणाऱ्या सायगाटा गावाचे सूर्यभान खोब्रागडे यांनी केले.पवनी तालुका विकास परिषद तर्फे कन्हाळगाव येथे आयोजित जंगल अधिकार परिषदेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते.जंगल अधिकार परिषदेत प्रमुख अतिथीमध्ये जबरान ज्योत आंदोलनाचे नेते दामोधर वाढवे, मच्छीमारांचे नेते प्रकाश पचारे, माजी जि.प. अध्यक्षा किसना भानारकर, गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे, पत्रकार लक्ष्मीकांत तागडे, सरपंच माया बावनथडे आदी उपस्थित होते.परिषदेतील चर्चेत सहभाग होताना जबरानजोत आंदोलनाचे नेते दामोधर वाढवे यांनी सांगितले की, पारंपारिक जंगल, पशुपक्ष्यांच्या हक्काचे जंगल सरकार नष्ट करीत आहे. जंगलाचा संबंध पशुपक्षी मानव यांच्याशी आहे. जंगल वाचविणे गरजेचे आहे. जंगल वाचले तर आपले जीवन वाचेल. वनाचे अधिकार गावकऱ्यांना प्राप्त झाले आहे. मच्छीमारांचे नेते प्रकाश पचारे यांनी सांगितले की, चारं, बोर, सिरन्या आदी रानमेव्यावर गावकऱ्यांचा अधिकार आहे. गावकऱ्यांना जल, जंगल, जमीन यावर अधिकार मिळावा, जमिनीचे पट्टे मिळावे, येणारा काळ धोक्याचा असल्यामुळे सतर्क राहावे.विलास भोंगाडे यांनी गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांकरिता २२ वर्षापासून लढत असलेल्या संघर्षाचा इतिहास सांगून तालुक्यात पर्यटन वाढीला सर्व काही असूनही येथील पर्यटन वाढीची गरज असल्याचे सांगितले. प्रकल्पग्रस्तांचे, मच्छीमारांचे, शेतकऱ्यांचे, विणकरांचे, जबरान जोतधारकांचे प्रश्न कशारितीने सोडविले जातील. यावर विचार करण्याचे आवाहन केले. पत्रकार लक्ष्मीकांत तागडे यांनी उमरेड, कऱ्हांडला अभयारण्यामुळे तालुक्यातील गावावर कशा प्रकारचे बंधने आल्याची माहिती सांगून वेळ पडल्यास येथील जंगल ही राखीव होणार असल्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले.प्रास्ताविक किसनाताई भानारकर यांनी केले, संचालन गुलाब मेश्राम व आभार प्रदर्शन सरपंच मायाताई बावनथडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)