शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडीतने ग्रामस्थांमध्ये रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:42 IST

भंडारा : महावितरण कंपनीचे वीज बिल थकीत असल्यामुळे येथील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने महिनापासून गावांमध्ये रात्रीच्या वेळेस ...

भंडारा : महावितरण कंपनीचे वीज बिल थकीत असल्यामुळे येथील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने महिनापासून गावांमध्ये रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पथदिव्यांच्या विजेचे बिल भरण्याकरिता जिल्हा परिषद ग्रामपंचायतीकडे बोट दाखवीत असल्याने खुटसावरी परिसरातील ग्रामपंचायत अडचणीत आली आहे.

भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथील ग्रामपंचायत परिसरामधून नावाजलेली ग्रामपंचायत आहे. कोरोना विषाणूच्या महामारीने ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. विकासाच्या कामांना ब्रेक लागला आहे. अशातच विद्युत वितरण कंपनीने ग्रामपंचायतीला थकीत पथदिव्यांचे बिल भरणा करण्यासंबंधी नोटीस बजावून पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पथदिव्यांच्या बिलासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून जिल्हा परिषदेकडे वर्ग करीत असे. या प्राप्त झालेल्या निधीतून जिल्हा परिषद पथदिव्यांच्या बिलाचा भरणा करण्याची प्रचलित पद्धत सुरू होती; परंतु आता सदर पथदिव्यांच्या वीज बिलाचा भरणा करण्यासाठी जिल्हा परिषदेने हात झटकल्यामुळे बिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर आली आहे. कोरोना विषाणूच्या महामारीने गावातील विकासकामे प्रभावित झाली आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या निधीतून पथदिव्यांच्या विजेचा बिल भरणा करावा, असे सांगून जिल्हा परिषदेने आपले हात झटकले आहेत; परंतु या निधीचा विनियोग करण्यासाठी एक वर्षापासून नियोजन करून शासनाच्या मंजुरीकरिता पाठविण्यात आले आहे. त्या मंजुरी प्रस्तावात पथदिव्यांच्या विद्युत बिलाचा समावेश नाही. शासनाने पंधराव्या वित्त आयोगाचा निधी गाव विकासासाठी ठेवून पथदिव्यांच्या विजेचा बिल भरण्यासाठी स्वतंत्र निधी द्यावा, अशी मागणी खुटसावरीचे सरपंच मनीषा वासनिक, उपसरपंच संदीप खंडाते, सदस्य ज्याेती नंदेश्वर, प्रियंका सार्वे व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ग्रामस्थांमध्ये अपघाताचा धोका बळावला

पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. अशातच वीज बिल थकीतचे कारण पुढे करून महावितरणने वीज पुरवठा खंडित केला. परिणामी रात्रीला अंधार असतो. त्या अंधारातून सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढला आहे. अंधारामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. अशात शासनाने ग्रामपंचायतीचा वीज देयकाचा भरणा करून ग्रामस्थांना दिलासा देण्याची गरज आहे. एकीकडे शासन गावविकासाच्या बाता करीत असले तरी दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास देत असल्याने सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

महावितरण कंपनीने खुटसावरी परिसरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला असून, कोरोना संकटामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. ग्रामपंचायतीला एवढ्या थकीत रकमेचे विद्युत बिल भरणे शक्य नाही. जिल्हा परिषदेने या विद्युत बिलाचा भरणा करण्याची गरज आहे.

-भागवत मस्के, सामाजिक कार्यकर्ता