शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आता वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

तिरोडा : बदलत्या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम शेतीवर होत आहे. त्याच त्याच पिकांची लागवड केल्यामुळे उत्पादनात सुद्धा घट होत ...

तिरोडा : बदलत्या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम शेतीवर होत आहे. त्याच त्याच पिकांची लागवड केल्यामुळे उत्पादनात सुद्धा घट होत आहे. तर जमिनीची सुपीकता सुद्धा खालावत चालली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती केल्यास उत्पादन वाढीसाठी त्याचा निश्चितच फायदा होईल, असे मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी पी. पी. खंडाईत यांनी केले.

कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत तिरोडा तालुक्यातील पांजरा येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजेंद्र चामट हे होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हिराकुमार गोमासे, छाया पटले, सुनीता वाळूलकर, अरविंद उपवंशी, उमेश सोनेवाने, एस.जी. चव्हाण उपस्थित होते. कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा समतोल वापर, गांडूळ खत, हिरवळीचे खत, सेंद्रिय खते यांचा वापर करणे तसेच युरिया ब्रिकेटसचा वापर यावर मार्गदर्शन केले. संचालन एल. के. रहांगडाले केसालवाडा यांनी केले, तर आभार घनश्याम चौधरी यांनी मानले.