शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
2
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
4
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
5
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
6
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
7
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
8
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
9
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
10
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
11
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
12
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
13
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
14
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
15
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
16
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
17
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
18
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
19
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
20
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करा

By admin | Updated: June 8, 2015 01:10 IST

मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरणाचे योग्य संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड व त्याची जोपासणा करणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा सल्ला : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मार्गदर्शनगोंदिया : मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरणाचे योग्य संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड व त्याची जोपासणा करणे आवश्यक आहे. आजच्या विज्ञान युगात मोठ्या प्रमाणात मानव भौतिक सुखाच्या आहारी गेला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. सूर्यवंशी बोलत होते. अध्यक्षस्थानी न्या. के.आर. सिंघल, तर अतिथी म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी कातोरे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक दिलीप देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.न्या.सिंघल म्हणाले, पर्यावरण संतूलन राखण्यासाठी वृक्षलागवड व त्याची जोपासणा करणे महत्वाचे आहे. पर्यावरणाचे फायदे व कायद्याबाबतची माहितीही त्यांनी दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या आशा ठाकूर, लागवड अधिकारी युवराज कुंभलकर, पुरुषोत्तम कावळे यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते जारुळ, निंब, सप्तपर्णी आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाला वन्यजीव रक्षक सावन बहेकार, डॉ.राजेंद्र जैन, रंजित जस्सानी, सहायक वनसंरक्षक अश्विन ठक्कर, गोंदिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्यासह वनविभाग, सामाजिक वनीकरण वन्यजीव विभाग, निसर्ग मंडळाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक उपवनसंक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी तर आभार सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक दिलीप देशमुख यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)वृक्ष भेट देऊन सत्कारपर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील वनसंरक्षण समितीला संत तुकाराम महाराज वनग्राम पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष व सरपंच, फुलचूर येथील विजय कावळे, नर्मदा भजन मंडळाचे माधव गारसे यांना वनश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल, पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्याबद्दल पोलीस विभागाचे प्रतिनिधी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांना मान्यवरांच्या हस्ते वृक्ष भेट देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येकाच्या घरी असावे तुळशीचे झाडन्या.सिंघल म्हणाले, पर्यावरणात तुळशीच्या वृक्षाचे अनन्यसाधारण महत्व आहे. तुळशीच्या वृक्षापासून मोठ्या प्रमाणात आॅक्सिजन मिळते व औषधी म्हणून तुळशीच्या पानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. प्रत्येकाने घरी तुळशीचे झाड लावले पाहिजे. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, दैनंदिन वापरामध्ये पॉलिथिनचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. परंतु पॉलिथिन ही वस्तू नष्ट होणारी नसल्यामुळे त्याचे अनेक दुष्परिणाम आज दिसून येत आहेत. पॉलिथिनच्या वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. टाकाऊ साड्यापासून पिशव्या तयार करुन त्याचा दैनंदिन वापर करावा. महिला बचतगटाच्या माध्यमातून पिशव्या तयार करण्यात याव्यात. त्यामुळे बचतगटाला रोजगार आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मदत होईल. वृक्ष लागवड केल्यास पर्यावरण संरक्षण आणि वृक्षांपासून औषध निर्मिती सुद्धा करता येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.