शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

घर बांधकामात, सळाखी ऐवजी बांबूंचा वापर

By admin | Updated: June 22, 2014 23:53 IST

आधुनिक युगात घर बांधकामासाठी अभियंते शक्कल लढवित असताना एका खेडे गावातील शेतकऱ्याने मागील १५ वर्षांपासून सलाखीऐवजी बांबूंचा वापर करून उसनभर घरे बांधून दिली.

लाखो रूपयांची बचत : १५ वर्षांपासून प्रयोग सुरूचलाखांदूर : आधुनिक युगात घर बांधकामासाठी अभियंते शक्कल लढवित असताना एका खेडे गावातील शेतकऱ्याने मागील १५ वर्षांपासून सलाखीऐवजी बांबूंचा वापर करून उसनभर घरे बांधून दिली. तालुक्यात व तालुक्याबाहेर हा प्रयोग सुरू असून बांधकाम चिरकाल टिकणार असा ठाम विश्वास जगण पिलारे यांनी व्यक्त केला.म्हणतात ना, घर पहावे बांधून, या म्हणीला तोड म्हणून घर बांधकामाचा अर्धा अधिक खर्च कमी करण्याचा नवीन फंडा तालुक्यातील खैरीपट या छोट्याशा खेडेगावातील जगन पिलारे या व्यक्तीने शोधून काढला आहे. मागील १५ वर्षापासून त्यांचा हा प्रयोग सुरू असून अर्जुनी/मोर लाखांदूर तालुक्यात चर्चेचा झाला आहे. एकूणच घर बांधकामाचा बजेट कमी करण्याचा त्याचा हा प्रयत्न अनेकांनी कृतीत उतरविला आहे.पिलारे यांनी सर्वप्रथम खैरीपट येथे आपले राहते घर सलाखी ऐवजी बांबुचा वापर करून तयार केले. एकूण घर बांधकामाच्या खर्चात २५ टक्के बचत होत असल्याचा अंदाज स्वत:चे दोन मजली इमारत बांधून पूर्ण केला. दोन मजली घरात हजारो क्विंटल धान्य साठवून ठेवणाऱ्या बकाऱ्या तयार केल्या. मात्र घराला अद्याप तडा गेला नाही. सध्या परिस्थितीत तिसरा माळा उभत्तरण्याचा त्यांचा मानस असून बांधकाम प्रगती पथावर आहे. आधुनिक युगात घर बांधकाम करण्यापूर्वी एका चांगल्या नामवंत अभियंत्याचा शोध घेतला जातो. सलाख सिमेंटचा बजेट तपासल्या जातो. यातच घर बांधकाम करणाऱ्याचे बजेट अवलंबून असते. मात्र यावर तोडगा जगण पिलारे यांनी काढला. अर्जुनी/मोर येथे दोन मजली बांबुचा वापर केलेली मोठी इमारत कौलाने उभी आहे. लाखांदूर येथे सुद्धा अनेक इमारती याच पद्धतीने बांधलेल्या आहेत. नव्हे तालुक्यात अनेक गावात अभियंत्याची भूमिका पार पाडत आतापर्यंत पंधरा ते वीस इमारतीचे बांधकाम पिलारे यांनी करून दाखविले. घर बांधकामातील सलाख एकदाची जंगले मात्र बांबु चिरकाव टिकत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पिलारे यांचा बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय असून नवीन घर बांधकाम करणाऱ्यांना बांबुचा वापर कसाकरावयाचा यावर ते मार्गदर्शन करत असतात. काहींना ते पटते. मात्र काहींना ते पटत नाही. फुंडे पेट्रोलपंप वडसा रोडवर असून येणारे जाणारे नवल म्हणून थांबतात व बांबुचावापर कसा केला जातो ते बघतात. बांबुचा वापर केलेला घर चिरकाल टिकतो का असा उलट प्रश्न करून पुढच्या मार्गाला लागतात. मात्र मागील पंधरा वर्षापासून बांबुचा वापर केलेल्या घरात अनेकाचे कुटूंब वास्तव्यात असून कुठलाच धोका अद्याप झाला नसल्याचा पिलारे यांनी सांगितले. घराचे बांधकाम करताना पायव्या पासून कॉलम, बिम, सज्जा, अखेर स्लॅबला सुद्धा पूर्णता बांबुच्या भांब्याचा पुर्णत: वापर केला जातो. कमी खर्चात घर बांधकामाचा वापर करून बजेट कमी करण्याचा आपला प्रयत्न असून नवीन घर बांधणाऱ्यांनी एकदा सलाखी ऐवजी बांबुचा वापर करावा म्हणून सांगून गेले. (तालुका प्रतिनिधी)