शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार! सप्टेंबरचे १५०० रुपये लवकरच मिळणार, तारीख आली समोर
2
"क्या बड़ा तो सबसे दम बड़ा, राग आला की...", गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
3
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण केली, लाखो रुपये पळवले
4
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
5
जर्मनीपासून एक पाऊल दूर! ट्रम्प यांच्या निकटवर्तीयानंही मान्य केली भारताची ताकद, भागीदारीसाठी हात पुढे
6
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
7
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
8
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
9
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
10
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
11
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
12
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
13
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
14
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
15
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
16
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
17
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
18
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
19
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
20
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला

वैनगंगा पुलावर तरुणीसह दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:27 IST

लग्न जुळलेल्या पत्नीच्या मैत्रीणीला पाहुणचार करुन गावी पोहोचून देत असताना भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने तरुणीसह दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना येथील वैनगंगा नदी पुलावर मंगळवारी दुपारी २ वाजता घडली. सदर तरुणीचे लग्न १४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे आयोजित होते. मात्र काळाने घाला घालून तिला हिरावून नेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देट्रेलरची धडक : १४ फेब्रुवारीला होते तरुणीचे लग्न

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लग्न जुळलेल्या पत्नीच्या मैत्रीणीला पाहुणचार करुन गावी पोहोचून देत असताना भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने तरुणीसह दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना येथील वैनगंगा नदी पुलावर मंगळवारी दुपारी २ वाजता घडली. सदर तरुणीचे लग्न १४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे आयोजित होते. मात्र काळाने घाला घालून तिला हिरावून नेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.मंजूषा एकनाथ ठवकर (२२) रा. टेकेपार माडगी ता. भंडारा आणि हरीचंद तुळशीदास इनवते (३२) रा. खराडी ता. भंडारा अशी मृतांची नावे आहेत. हरीचंदच्या पत्नीची मैत्रीण मंजूषा ठवकर हिचे लग्न जुळले होते. पत्नीच्या माहेरी राहणारी आणि बालपणाची मैत्रीण असल्याने तिला मंगळवारी खराडी येथे पाहुणचारासाठी बोलाविण्यात आले होते. पाहुणचार आटोपल्यानंतर मंजुषाला गावी सोडण्यासाठी हरीचंद तिला घेऊन आपल्या दुचाकीने टेकेपारकडे निघाला होता. दुपारी २ वाजता भंडारा शहरातील वैनगंगा नदीचा पुला पार करत असतांना समोरुन आलेल्या ट्रेलरने (एम एच ३४ एएम ५९७१) दुचाकीला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, हरिचंदचा जागीच मृत्यू झाला. जखमी अवस्थेत मंजुषाला भंडाराच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापुर्वीच तिचाही मृत्यू झाला.मंजुषा ठवकर ही पुणे येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला होती. तिचे लग्न १४ फेब्रुवारीला पुणे येथेच आयोजित होते. भावी आयुष्याचे स्वप्न रंगवित असतांना ती आपल्या बालमैत्रिणीच्या घरी पाहुणचारासाठी आली होती. मात्र काळाने बेसावधपणे डाव साधला आणि तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती घरच्यांना होताच आसमंत भेदून टाकणारा टाहो फोडला. तर हरीचंद हा नागपूरजवळचा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. चार वर्षापुर्वीच त्याचे टेकेपार येथील तरुणीशी लग्न झाले होते. त्याच्या मागे पत्नी, मुलगी, आई, दोन भाऊ असा आप्त परिवार आहे. खराडी येथे अपघाताचे वृत्त येऊन धडकताच प्रत्येकजण हळहळ व्यक्त करतांना दिसत होता.अर्ध्यावरती डाव मोडला...मंजुषा ठवकर ही टेकेपारची तरुणी. पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरीला होती. घरच्यांनी योग्य स्थळ शोधून तिचे लग्न जुळविले होते. १४ फेब्रुवारीला लग्न निश्चित झाले होते. या लग्नाची तयारी तिच्या घरी जोरात सुरु होती. पत्रिका वाटप करणे सुरु होते. अशातच ती आपल्या बालमैत्रिणीच्या घरी पाहुणचारासाठी गेली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. सुखी संसाराचे स्वप्न एका क्षणात उध्वस्त झाले आणि अर्ध्यावरती डाव मोडला.