शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

वैनगंगा पुलावर तरुणीसह दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:27 IST

लग्न जुळलेल्या पत्नीच्या मैत्रीणीला पाहुणचार करुन गावी पोहोचून देत असताना भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने तरुणीसह दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना येथील वैनगंगा नदी पुलावर मंगळवारी दुपारी २ वाजता घडली. सदर तरुणीचे लग्न १४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे आयोजित होते. मात्र काळाने घाला घालून तिला हिरावून नेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देट्रेलरची धडक : १४ फेब्रुवारीला होते तरुणीचे लग्न

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लग्न जुळलेल्या पत्नीच्या मैत्रीणीला पाहुणचार करुन गावी पोहोचून देत असताना भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने तरुणीसह दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना येथील वैनगंगा नदी पुलावर मंगळवारी दुपारी २ वाजता घडली. सदर तरुणीचे लग्न १४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे आयोजित होते. मात्र काळाने घाला घालून तिला हिरावून नेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.मंजूषा एकनाथ ठवकर (२२) रा. टेकेपार माडगी ता. भंडारा आणि हरीचंद तुळशीदास इनवते (३२) रा. खराडी ता. भंडारा अशी मृतांची नावे आहेत. हरीचंदच्या पत्नीची मैत्रीण मंजूषा ठवकर हिचे लग्न जुळले होते. पत्नीच्या माहेरी राहणारी आणि बालपणाची मैत्रीण असल्याने तिला मंगळवारी खराडी येथे पाहुणचारासाठी बोलाविण्यात आले होते. पाहुणचार आटोपल्यानंतर मंजुषाला गावी सोडण्यासाठी हरीचंद तिला घेऊन आपल्या दुचाकीने टेकेपारकडे निघाला होता. दुपारी २ वाजता भंडारा शहरातील वैनगंगा नदीचा पुला पार करत असतांना समोरुन आलेल्या ट्रेलरने (एम एच ३४ एएम ५९७१) दुचाकीला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, हरिचंदचा जागीच मृत्यू झाला. जखमी अवस्थेत मंजुषाला भंडाराच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापुर्वीच तिचाही मृत्यू झाला.मंजुषा ठवकर ही पुणे येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला होती. तिचे लग्न १४ फेब्रुवारीला पुणे येथेच आयोजित होते. भावी आयुष्याचे स्वप्न रंगवित असतांना ती आपल्या बालमैत्रिणीच्या घरी पाहुणचारासाठी आली होती. मात्र काळाने बेसावधपणे डाव साधला आणि तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती घरच्यांना होताच आसमंत भेदून टाकणारा टाहो फोडला. तर हरीचंद हा नागपूरजवळचा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. चार वर्षापुर्वीच त्याचे टेकेपार येथील तरुणीशी लग्न झाले होते. त्याच्या मागे पत्नी, मुलगी, आई, दोन भाऊ असा आप्त परिवार आहे. खराडी येथे अपघाताचे वृत्त येऊन धडकताच प्रत्येकजण हळहळ व्यक्त करतांना दिसत होता.अर्ध्यावरती डाव मोडला...मंजुषा ठवकर ही टेकेपारची तरुणी. पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरीला होती. घरच्यांनी योग्य स्थळ शोधून तिचे लग्न जुळविले होते. १४ फेब्रुवारीला लग्न निश्चित झाले होते. या लग्नाची तयारी तिच्या घरी जोरात सुरु होती. पत्रिका वाटप करणे सुरु होते. अशातच ती आपल्या बालमैत्रिणीच्या घरी पाहुणचारासाठी गेली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. सुखी संसाराचे स्वप्न एका क्षणात उध्वस्त झाले आणि अर्ध्यावरती डाव मोडला.