शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

भंडारेकरांना मिळेना दोन वेळचे पाणी

By admin | Updated: May 25, 2014 23:18 IST

वैनगंगेच्या काठावर वसलेल्या भंडारा शहरातील नागरिकांना दिवसातून दोन वेळा पिण्याचे पाणी मिळत नाही. जुनी जलवाहिनी, वाढती मागणी आणि तांत्रिक समस्या यामुळे पाणी पुरवठाविभाग प्रयत्न करूनही हतबल दिसत आहे.

उपाययोजनांची वाट : वसुली मात्र नियमित, नदी असूनही उपयोग काय?

भंडारा : वैनगंगेच्या काठावर वसलेल्या भंडारा शहरातील नागरिकांना दिवसातून दोन वेळा पिण्याचे पाणी मिळत नाही. जुनी जलवाहिनी, वाढती मागणी आणि तांत्रिक समस्या यामुळे पाणी पुरवठाविभाग प्रयत्न करूनही हतबल दिसत आहे. मुलभूत सुविधांमुळे आवश्यक असलेल्या पाण्याचा मुद्दा नगरपालिका प्रशासन निकाली काढू शकली नाही.

इंग्रज काळात नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून शहरातील नागरिकांच्या आवश्यक गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर आली आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य, सुविधा पुरविण्यासाठी नगरपालिकेकडे स्वतंत्र विभाग आहे. बारमाही वाहणार्‍या वैनगंगेच्या काठावरील भंडारा शहरात पूर्वी अनेक कारणांमुळे पाणी टंचाई निर्माण होत होती. त्यावेळी नदीत पाणी नाही. भारनियमन, तांत्रिक बिघाड अशी कारणे सांगून वेळ मारून नेली जात होती. वैनगंगेच्या पात्रात भूमिगत चेतन बंधारा बांधण्यात आला. लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. तरीही शहरवासियांना पिण्याचे पाणी मिळाले नाही. भारनियमनाचा त्रास होऊ नये म्हणून वीज वितरण कंपनीकडून एक्सप्रेस फिडरचीजोडणी करण्यात आली. २४ तास वीज पुरवठा करूनही नागरिकांना पाण्यापासून दूरापास्त व्हावे लागले.

जीर्ण जलवाहिनी असल्यामुळे वारंवार लिकेजची समस्या सुटता सुटली नाही. त्याचबरोबर फेसाळयुक्त दुषित पाणी अनेक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करीत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्याची समस्याही शहरातील अनेक भागात पहावयास मिळते. वॉर्डातील अनेक भागात पिण्याचा पाण्याचा थेंब मिळत नाही. पाणी कराची वसुली मात्र नियमितपणे केली जाते. (शहर प्रतिनिधी)