शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख मजुरांना मिळाला रोजगार

By admin | Updated: August 16, 2014 23:18 IST

जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १२६ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत ८२७ रुग्णांना लाभ देण्यात आला असून रोजगार हमी

रोहयोत भंडारा देशात सातवा : पालकमंत्री मुळक यांचे प्रतिपादनभंडारा : जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १२६ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत ८२७ रुग्णांना लाभ देण्यात आला असून रोजगार हमी योजनेअंतर्गत २ लाख ४ हजार १३० मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले असून जिल्हा राज्यात प्रथम तर देशात सातव्या क्रमांकावर असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. राजेंद्र मुळक यांनी केले.भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी परेडचे निरीक्षण केले. पोलीस, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्रसेना, स्काऊट आणि गाईड यांनी परेड संचलन करुन राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी पुढे बोलताना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात दोन लाख ४ हजार १३० मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, तर देशात सातव्या क्रमांकावर आहे.राज्यातील गारपीटग्रस्तांना ४ कोटीची मदत राज्य शासनाने केली आहे. सिंदपुरी येथे खाजगी मालगुजारी तलावाची पाळ फुटल्याने १०१ कुटुंबातील ४४५ व्यक्तींना सुरक्षीत ठिकाणी पोहचविले व त्यांना तात्काळ मदत दिली. राजीव गांधी जीवनदायीनी योजनेअंतर्गत १ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील ८२७ रुग्णांना त्याचा लाभ देण्यात आला. यासाठी शासनाने २ कोटी ४४ लाख ४८ हजार ८२० रुपये खर्च केले. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ६ हजार २५६ मातांना लाभ देण्यात आला. त्याचबरोबर प्रसुती मातांना रुग्णालयीन सेवा देण्याकरीता मदत करण्यासाठी ६ हजार ३०९ आशांना त्याच्या कामाचा मोबदला देण्यात आला. सुवर्ण राजस्व अभियान अंतर्गत ई-मोजणी जलद गतीने होण्याच्या दृष्टीने जिह्यात सातही तालुक्यात यंत्राच्या सहाय्याने मोजणीची सुरुवात करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात ५ लाख ७ हजार ८९७ सातबाराचे संगणकीकरण करण्यात आले. २ हजार ९६२ गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले असून २८ पैकी १५ गावठाणांना १ आॅगस्टपासून स्वतंत्र महसुली गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. बावनथडी प्रकल्पांतर्गत जमिनीवरील विक्री, वाटणी व हस्तांतरणावरील निर्बंंध उठविण्यात आल्याची माहिती दिली. ध्वजारोहण समारंभाला जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी, जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक कैलास कणसे, जिल्हा होमगार्ड समादेशक डॉ.श्रीकांत वैरागडे आदी उपस्थित होते. संचालन निलकंठ रणदिवे, रोहिणी मोहरील यांनी केले. (शहर प्रतिनिधी)