शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

रोजी गेली तरी दोन लक्ष ३१ हजार कुटुंबांना मिळणार रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST

इंद्रपाल कटकवार लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राज्य शासनाने पुन्हा दुसऱ्यांदा पंधरा दिवसांचा लाॅकडाऊन घोषित केला आहे. या ...

इंद्रपाल कटकवार

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : राज्य शासनाने पुन्हा दुसऱ्यांदा पंधरा दिवसांचा लाॅकडाऊन घोषित केला आहे. या काळात गरीब, गरजू व लाभार्थ्यांची मोठी कुचंबणा होते. अशा स्थितीत कुठलाही लाभार्थी अन्नधान्याशिवाय राहू नये, यासाठी राज्य शासनाने एक महिना नि:शुल्क धान्य वितरणाची घोषणा केली आहे. त्या अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील दोन लक्ष ३१ हजार १८ शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण केले जाणार आहे.

कोरोना महामारीच्या रूपाने अनेक देशांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यात कित्येक गरीब कुटुंबे भरडली गेली आहेत. अशा कुटुंबांना लाॅकडाऊन काळात किमान रोजी नव्हे, तर किमान रोटी तरी उपलब्ध व्हावी, या हेतूने राज्य सरकारने नि:शुल्क धान्य देण्याचा निर्णय घेतला.

भंडारा जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांची संख्या दोन लाख ३१ हजार १८ इतकी असून, त्यात सात लाख ३८ हजार ९८३ युनिटधारक आहेत. या कार्डधारकांना सदर धान्याचे वितरण केले जाणार आहे.

काय मिळणार तांदूळ गहू तांदूळ गहू

राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे लॉकडाऊन काळात दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना तांदूळ आणि गहू देण्यात येणार आहे. यात अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना येत्या एक महिन्यासाठी प्रती व्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. रेशन कार्ड असलेल्या आणि नसलेल्या व्यक्तींना देखील त्याचा लाभ दिला जाणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सदर स्धा्स धान्य दुकानातून धान्य दिले जाणार आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण दोन लाख ५७ हजार ६१२ शिधापत्रिका धारकांची संख्या आहेत.

लॉकडाऊनमुळे रोजगारावर परिणाम जाणवतो. राज्य शासनाने घोषणा केली असली तरी वेळेवर धान्य उपलब्ध झाले पाहिजे. आधीच महागाईने कंबरडे मोडले आहे..

- अश्विन साखरे, भंडारा

अन्नधान्य मिळत असले तरी लाॅकडाऊन नको. काहीजण नियमांचे पालन करीत नाहीत. यामुळे कठोर पावले उचलली जातात. याचा भुर्दंड गरिबांनाच सहन करावा लागतो.

-अनिल वासनिक ,खुटसावरी

अन्नधान्यासोबतच अन्य मदत मिळायला हवी. १५ दिवसांनी रोजगार परत मिळणार का याची हमी दिसून येत नाही. रोज कमविणे व खाणे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मदत आवश्यक आहे.

- ईश्वर भिवगडे, पिंपळगाव