शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

चार गावात अडीच कोटीची कामे रखडली

By admin | Updated: December 31, 2014 23:19 IST

सिहोरा परिसरातील चार गावात नाला लगत शेत शिवारात पुलाचे बांधकाम करण्यासाठी तिरोडा उपसा सिंचन प्रकल्पाने सर्व्हेक्षण केलेले आहे. अडीच कोटींचा कृती आराखडा असताना

चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील चार गावात नाला लगत शेत शिवारात पुलाचे बांधकाम करण्यासाठी तिरोडा उपसा सिंचन प्रकल्पाने सर्व्हेक्षण केलेले आहे. अडीच कोटींचा कृती आराखडा असताना निधी अभावी ही प्रक्रिया खोळंबली आहे. यामुळे शेत शिवारात ये जा करताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. सिहोरा परिसरातील वैनगंगा नदी काठालगत असलेल्या चुल्हाड, देवरी (देव), गोंडीटोला, सुकळी (नकुल), बपेरा, देवसर्रा गावातील शेत शिवारात नाले नदीला जोडणारी आहेत. कवलेवाडा धरणात पाणी अडविण्यात आल्याने नाले पाण्याने तुंबली आहेत. या नाल्यात पाच-सहा फुट पाणी आहे. यामुळे नाल्यातून शेत शिवारात ये जा करताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. एकट्या देवरी (देव) गावात ५० हेक्टर आर हून अधिक शेती खरिप आणि रब्बी हंगामात उत्पादन घेताना प्रभावित ठरत आहे. अन्य गावात हीच स्थिती आहे. या गावांच्या नदी काठालगत शेतशिवारात तिरोडा उपसा सिंचन प्रकल्पाने पुल बांधकामाचे सर्व्हेक्षण केले आहे. त्या प्रमाणे ग्रामसभेतून ग्रामपंचायतीनी ठराव दिलेला आहे. जानेवारी २०१४ मध्ये पुल बांधकाम आणि मंजुरीचा अंदाज पत्रक तयार करण्यात आलेले आहे. यात ७० लक्ष खर्चाचे एक पूल तथा प्रत्येकी १० लक्ष खर्चाचे पाच पूल असे नियोजन आखण्यात आले आहे. अन्य गावातील शेत शिवारात सव्वा कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहेत. या अंदाजपत्रकांना तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात या योजनेची सूत्र हलविण्यात येत आहेत. यामुळे या परिसरात शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी भंडारा जिल्हा प्रशासनाची नाही. स्थानिक जिल्हा प्रशासन दलात निर्माण करू शकतो. तिरोडा तालुक्यातील अदानी वीज प्रकल्प आणि धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी कवलेवाडा मांडवी गावानजीक धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणात पाणी अडविण्यात आल्याने सिहोरा परिसरातील शेती प्रभावित झाली आहे. नालालगत असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात आलेला असून ५०० मीटर अंतरपर्यंत बांधकाम करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. परंतु निर्धारित अंतरपेक्षा लांब असणाऱ्या शेतकऱ्यांना कसलीही मदत देण्यात आली नाही. या शेतकऱ्यांची शेती बुडीत नसल्याने आर्थिक मदतीकरिता ओरड नाही. परंतु आता हेच शेतकरी अडचणीत आलेली आहे. नाला ओलांडून शेत शिवारात ये जा करताना कसरत होत आहे. दरम्यान धरण बांधकामात अदानी वीज प्रकल्पाने निधीची गुंतवणूक केली होती. या प्रकल्पाला पाण्याची गरज असल्याने ही गुंतवणूक केली होती. परंतु धरण पूर्ण होताच अन्य बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. धरणामुळे शेती प्रभावित होत आहे. परंतु पूल बांधकामाची समस्या निकाली काढण्यात येत नाही. (वार्ताहर)