शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

चार गावात अडीच कोटीची कामे रखडली

By admin | Updated: December 31, 2014 23:19 IST

सिहोरा परिसरातील चार गावात नाला लगत शेत शिवारात पुलाचे बांधकाम करण्यासाठी तिरोडा उपसा सिंचन प्रकल्पाने सर्व्हेक्षण केलेले आहे. अडीच कोटींचा कृती आराखडा असताना

चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील चार गावात नाला लगत शेत शिवारात पुलाचे बांधकाम करण्यासाठी तिरोडा उपसा सिंचन प्रकल्पाने सर्व्हेक्षण केलेले आहे. अडीच कोटींचा कृती आराखडा असताना निधी अभावी ही प्रक्रिया खोळंबली आहे. यामुळे शेत शिवारात ये जा करताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. सिहोरा परिसरातील वैनगंगा नदी काठालगत असलेल्या चुल्हाड, देवरी (देव), गोंडीटोला, सुकळी (नकुल), बपेरा, देवसर्रा गावातील शेत शिवारात नाले नदीला जोडणारी आहेत. कवलेवाडा धरणात पाणी अडविण्यात आल्याने नाले पाण्याने तुंबली आहेत. या नाल्यात पाच-सहा फुट पाणी आहे. यामुळे नाल्यातून शेत शिवारात ये जा करताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. एकट्या देवरी (देव) गावात ५० हेक्टर आर हून अधिक शेती खरिप आणि रब्बी हंगामात उत्पादन घेताना प्रभावित ठरत आहे. अन्य गावात हीच स्थिती आहे. या गावांच्या नदी काठालगत शेतशिवारात तिरोडा उपसा सिंचन प्रकल्पाने पुल बांधकामाचे सर्व्हेक्षण केले आहे. त्या प्रमाणे ग्रामसभेतून ग्रामपंचायतीनी ठराव दिलेला आहे. जानेवारी २०१४ मध्ये पुल बांधकाम आणि मंजुरीचा अंदाज पत्रक तयार करण्यात आलेले आहे. यात ७० लक्ष खर्चाचे एक पूल तथा प्रत्येकी १० लक्ष खर्चाचे पाच पूल असे नियोजन आखण्यात आले आहे. अन्य गावातील शेत शिवारात सव्वा कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहेत. या अंदाजपत्रकांना तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात या योजनेची सूत्र हलविण्यात येत आहेत. यामुळे या परिसरात शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी भंडारा जिल्हा प्रशासनाची नाही. स्थानिक जिल्हा प्रशासन दलात निर्माण करू शकतो. तिरोडा तालुक्यातील अदानी वीज प्रकल्प आणि धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी कवलेवाडा मांडवी गावानजीक धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणात पाणी अडविण्यात आल्याने सिहोरा परिसरातील शेती प्रभावित झाली आहे. नालालगत असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात आलेला असून ५०० मीटर अंतरपर्यंत बांधकाम करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. परंतु निर्धारित अंतरपेक्षा लांब असणाऱ्या शेतकऱ्यांना कसलीही मदत देण्यात आली नाही. या शेतकऱ्यांची शेती बुडीत नसल्याने आर्थिक मदतीकरिता ओरड नाही. परंतु आता हेच शेतकरी अडचणीत आलेली आहे. नाला ओलांडून शेत शिवारात ये जा करताना कसरत होत आहे. दरम्यान धरण बांधकामात अदानी वीज प्रकल्पाने निधीची गुंतवणूक केली होती. या प्रकल्पाला पाण्याची गरज असल्याने ही गुंतवणूक केली होती. परंतु धरण पूर्ण होताच अन्य बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. धरणामुळे शेती प्रभावित होत आहे. परंतु पूल बांधकामाची समस्या निकाली काढण्यात येत नाही. (वार्ताहर)